शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

आता सोयाबीन पिकावर पाखरांचे लक्ष

By admin | Updated: September 18, 2014 00:01 IST

अस्मानी संकटांचा सामना करीत मळणीयोग्य स्थितीत आलेल्या सोयाबीनवर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़

घोराड : अस्मानी संकटांचा सामना करीत मळणीयोग्य स्थितीत आलेल्या सोयाबीनवर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़जून महिन्याच्या अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या केल्या व पावसाने दडी मारलेल्या कालावधीत तुषार सिंचनाने ओलित केले, ते सोयाबीनचे पीक मळणी व कापणीयोग्य झाले आहे़ असे पीक फार कमी शेतांमध्ये असल्याने दाणे भरलेल्या शेंगावर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या प्रहारात पाखरांचे थवेच्या थवे या सोयाबीन पिकावर बसत असून आपल्या पोटाची खळगी भरताना पाहायला मिळत आहे. अशा शेतात सकाळपासून ‘पिंप’ वाजविणारा व्यक्ती राखण करीत असला तरी पाखरांना तो आवाज नित्याचा झाला की काय, तर पाखरे या आवाजाने दुसरीकडे जात नसल्याचे शेतकरी सांगतात़ पाखरे पिकावरून शेतातून गेलेल्या विजेच्या तारावर बसून या शेंगांना लक्ष्य बनवित आहे़ यामुळे अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना हातात येणाऱ्या नगदी पिकापासून मुकावे लागण्याची वेळ आली आहे़ हा खरीप हंगाम धोक्याची घंटा वाजवित असल्याचेच यावरून दिसते़सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी झाल्याने एकाच वेळी सर्व शेतात सुगीचा हंगाम आला नाही़ यामुळे असे घडत आहे. आधी रानडुक्कर व रोह्यांच्या कळपाने उभ्या पिकात थैमान घातल्याने बळीराजा मेटाकुटीस आला़ आता पीक मळणीयोग्य असताना पाखरांनी हल्ला केल्याने सोयाबीनच संकटात आले आहे़ यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे़(वार्ताहर)