शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

आता सोयाबीन पिकावर पाखरांचे लक्ष

By admin | Updated: September 18, 2014 00:01 IST

अस्मानी संकटांचा सामना करीत मळणीयोग्य स्थितीत आलेल्या सोयाबीनवर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़

घोराड : अस्मानी संकटांचा सामना करीत मळणीयोग्य स्थितीत आलेल्या सोयाबीनवर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़जून महिन्याच्या अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या केल्या व पावसाने दडी मारलेल्या कालावधीत तुषार सिंचनाने ओलित केले, ते सोयाबीनचे पीक मळणी व कापणीयोग्य झाले आहे़ असे पीक फार कमी शेतांमध्ये असल्याने दाणे भरलेल्या शेंगावर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या प्रहारात पाखरांचे थवेच्या थवे या सोयाबीन पिकावर बसत असून आपल्या पोटाची खळगी भरताना पाहायला मिळत आहे. अशा शेतात सकाळपासून ‘पिंप’ वाजविणारा व्यक्ती राखण करीत असला तरी पाखरांना तो आवाज नित्याचा झाला की काय, तर पाखरे या आवाजाने दुसरीकडे जात नसल्याचे शेतकरी सांगतात़ पाखरे पिकावरून शेतातून गेलेल्या विजेच्या तारावर बसून या शेंगांना लक्ष्य बनवित आहे़ यामुळे अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना हातात येणाऱ्या नगदी पिकापासून मुकावे लागण्याची वेळ आली आहे़ हा खरीप हंगाम धोक्याची घंटा वाजवित असल्याचेच यावरून दिसते़सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी झाल्याने एकाच वेळी सर्व शेतात सुगीचा हंगाम आला नाही़ यामुळे असे घडत आहे. आधी रानडुक्कर व रोह्यांच्या कळपाने उभ्या पिकात थैमान घातल्याने बळीराजा मेटाकुटीस आला़ आता पीक मळणीयोग्य असताना पाखरांनी हल्ला केल्याने सोयाबीनच संकटात आले आहे़ यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे़(वार्ताहर)