शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

आता लाभार्थ्यांना मिळेल आयडी, फोटोही होणार क्लिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

शिवभोजन योजनेसाठी जिल्ह्याकरिता २०० थाळींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गरजूंना अत्यल्प दराज भोजन मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना महाविकास आघाडी सरकारने कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतो का हे पाहण्यासाठी योजना सुरू झाल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून आॅनलाईन मॉनिटरिंग केले जाणार आहे.

ठळक मुद्देशिवभोजन योजना । आजपासून जिल्ह्यात होणार प्रारंभ

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजूंना अवघ्या दहा रुपयांत जेवण देण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेला प्रजातसत्ताकदिनी २६ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. गरजू लोकांपर्यंतच या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवली जाणार आहे.शिवभोजन योजनेसाठी जिल्ह्याकरिता २०० थाळींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गरजूंना अत्यल्प दराज भोजन मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना महाविकास आघाडी सरकारने कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतो का हे पाहण्यासाठी योजना सुरू झाल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून आॅनलाईन मॉनिटरिंग केले जाणार आहे. थाळीचा लाभ घेण्यासाठी शिवभोजन केंद्राच्य काउंटरवर लाभार्थ्यांचे फोटो क्लिक करून संपूर्ण माहिती संगणकात फीड केली जाणार आहे. त्यानंतर ही संपूर्ण माहिती शासनाने दिलेल्या लिंक कंट्रोलकडे जाईल आणि तेथूनच संबंधितांचा आयडी क्रमांक जनरेट होईल. तसेच त्यानंतर शासनाने दिलेल्या केंद्राच्या संगणकावर संबंधितांचा आयडी क्रमांक जनरेट झाल्यानंतरच व्यक्तीला शिवभोजनाचा लाभ मिळणार आहे. शासकीय कर्मचारी आणि सधन व्यक्तींसाठी ही योजना नसून केवळ गरजूंसाठी ही योजना अंमलात आणण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी गरीब किंवा मजुरांची वर्दळ अधिक असेल अशा ठिकाणी शिवभोजन थाळी विक्री होणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर, बाजारपेठ आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी शिवभोजन थाळी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत संबंधित भोजनालयांमध्येच दुपारी १२ ते २ या कालावधीत गरजूंना शिवभोजनाचा लाभ घेता येणार आहे. या कालावधीत लाभार्थ्याना राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भोजनालय मालकाची असणार आहे. भोजनालयात एकावेळी किमान २५ व्यक्तींची भोजनाची व्यवस्था राहणार आहे. भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करून त्यासंदर्भातील प्रमाणपत्र दर्शनी भागात भोजनालय चालकाला लावावे लागणार आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय