शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आता लाभार्थ्यांना मिळेल आयडी, फोटोही होणार क्लिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

शिवभोजन योजनेसाठी जिल्ह्याकरिता २०० थाळींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गरजूंना अत्यल्प दराज भोजन मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना महाविकास आघाडी सरकारने कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतो का हे पाहण्यासाठी योजना सुरू झाल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून आॅनलाईन मॉनिटरिंग केले जाणार आहे.

ठळक मुद्देशिवभोजन योजना । आजपासून जिल्ह्यात होणार प्रारंभ

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजूंना अवघ्या दहा रुपयांत जेवण देण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेला प्रजातसत्ताकदिनी २६ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. गरजू लोकांपर्यंतच या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवली जाणार आहे.शिवभोजन योजनेसाठी जिल्ह्याकरिता २०० थाळींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गरजूंना अत्यल्प दराज भोजन मिळावे आणि त्यांची परवड होऊ नये म्हणून ही योजना महाविकास आघाडी सरकारने कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतो का हे पाहण्यासाठी योजना सुरू झाल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून आॅनलाईन मॉनिटरिंग केले जाणार आहे. थाळीचा लाभ घेण्यासाठी शिवभोजन केंद्राच्य काउंटरवर लाभार्थ्यांचे फोटो क्लिक करून संपूर्ण माहिती संगणकात फीड केली जाणार आहे. त्यानंतर ही संपूर्ण माहिती शासनाने दिलेल्या लिंक कंट्रोलकडे जाईल आणि तेथूनच संबंधितांचा आयडी क्रमांक जनरेट होईल. तसेच त्यानंतर शासनाने दिलेल्या केंद्राच्या संगणकावर संबंधितांचा आयडी क्रमांक जनरेट झाल्यानंतरच व्यक्तीला शिवभोजनाचा लाभ मिळणार आहे. शासकीय कर्मचारी आणि सधन व्यक्तींसाठी ही योजना नसून केवळ गरजूंसाठी ही योजना अंमलात आणण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रायोगिक स्तरावर किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी गरीब किंवा मजुरांची वर्दळ अधिक असेल अशा ठिकाणी शिवभोजन थाळी विक्री होणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर, बाजारपेठ आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी शिवभोजन थाळी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत संबंधित भोजनालयांमध्येच दुपारी १२ ते २ या कालावधीत गरजूंना शिवभोजनाचा लाभ घेता येणार आहे. या कालावधीत लाभार्थ्याना राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भोजनालय मालकाची असणार आहे. भोजनालयात एकावेळी किमान २५ व्यक्तींची भोजनाची व्यवस्था राहणार आहे. भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी करून त्यासंदर्भातील प्रमाणपत्र दर्शनी भागात भोजनालय चालकाला लावावे लागणार आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय