शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

१,४७५ उमेदवारांना नोटीस

By admin | Updated: July 30, 2016 00:27 IST

जिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी विहीत कालावधीत निवडणुकीचा खर्च सादर केला नव्हता.

निवडणुकीचा खर्च दाखविलाच नाही : जिल्हा प्रशासनाकडून सुनावणी वर्धा : जिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी विहीत कालावधीत निवडणुकीचा खर्च सादर केला नव्हता. या विरोधात जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील एकूण १ हजार ४७५ उमेदवारांना नोटीस बजावले. नोटीस मिळालेल्या उमेदवारांकरिता येथील विकास भवनात दोन दिवस सुनावणी आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी वर्धा, हिंगणघाट व समुद्रपूर या तालुक्यातील एकूण १२१ तर शुक्रवारी कारंजा (घाडगे), आष्टी (शहीद), देवळी, सेलू तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीमधील उमेदवारांनी येथे येऊन आपले म्हणणे सादर केले. यात ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी येत आपली कागदपत्रे सादर करून उत्तर सादर केले. ही कागदपत्रे तपासून आठ दिवसानंतर या प्रकरणात काय ती कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. सन २०१४-१५ मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक निकालाच्या ३० दिवसांत त्यांचा खर्च संबधित विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास अशा उमेदवारांवर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील १४ (ख) (१) अन्वये अपात्र ठरविण्याची कारवाई करणे शक्य आहे. या नियमानुसार जिल्ह्यातील १ हजार ४७५ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नसल्याचे समोर आले आहे. अशा उमेदवारांना त्याचे म्हणणे सादर करण्याकरिता विकास भवनात गुरूवारी व शुक्रवारी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी या उमेदवारांचे म्हणणे ऐकून त्यांना त्यांचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या. या उमेदवारांनी सादर केलेल्या त्यांच्या म्हणण्यानुसार चौकशी करून त्यांच्यावर काय ती कारवाई करण्यात येणार आहे. यावर येत्या सात दिवसांत कार्यवाही करण्यात येणार असून यात १,४७५ पैकी किती उमेदवारांवर कारवाई होते व किती उमेदवार यातून बचावतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार १९ नोव्हेंबर २०१० नुसार ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रितीने सादर करणे आवश्यक आहे. असे न केल्यास अशा व्यक्तीला आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्याबाबत मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार कलम १४(ख)(१) मध्ये तरतुद करण्यात आली आहे.