शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

‘नोटा’ बदलवू शकतो अनेकांच्या मतांचा ‘कोटा’

By admin | Updated: October 9, 2014 23:05 IST

आठ तालुके मिळून असलेल्या चारही विधानसभा क्षेत्रात रिंगणात असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अंकगणितातून आपल्या मतांचा कोटा ठरविला आहे. हा कोटा ठरविताना मात्र त्यांना ‘नोटा’ (नकाराधिकार)चा विसर

रूपेश खैरी - वर्धाआठ तालुके मिळून असलेल्या चारही विधानसभा क्षेत्रात रिंगणात असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अंकगणितातून आपल्या मतांचा कोटा ठरविला आहे. हा कोटा ठरविताना मात्र त्यांना ‘नोटा’ (नकाराधिकार)चा विसर पडल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना त्यांची नाराजी व्यक्त करण्याकरिता असलेल्या नोटाचा वापर झाला होता. विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे याचा वापर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आघाडीत झालेली बिघाडी व युतीत झालेला काडीमोड यामुळे आतापर्यंत एकमत असलेले अनेक कार्यकर्ते दुखावले. अशात उमेदवारी देताना झालेली घाई व काही ठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे पक्षाचे खंदे कार्यकर्ते नाराज झालेत. त्यांची नाराजी ते प्रचारातून दाखवित नसताना दिसून येत आहे. हा मतदार उमेदवारांना मते देतो वा नकाराधिकाराचा वापर करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे उमेदवारांकडून वर्तविली जाणारी भाकितेही बदलण्याची शक्यता आहे. सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारासह अनेकांनी रिंगणात उड्या घेतल्या आहेत. चारही मतदार संघातून एकूण ६९ उमेदवार रिंगणात आले आहेत. यात कधी राजकीय मित्र म्हणून सोबत बसणारे समोरासमोर आले आहेत. उमेदवारांच्या या भाऊगर्दीत मतदारही विचलीत होत आहे. शिवाय होत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रचारातून स्थानिक मुद्यांना तिलांजली देण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकाही उमेदवाराने स्थानिक विकासाकरिता काय करणार याचा कुठलाही खुलासा केला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे मतदारही विचारात पडला आहे.असाच प्रकार लोकसभेच्या निवडणुकीत झाला होता. यामुळे अनेक मतदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘नोटा’ या बटनाचा वापर करून आपली नाराजी दर्शविली होती. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात असलेल्या आठही तालुक्यात दोन हजार १९० मतदारांनी याचा वापर केला होता. यात आर्वी विधानसभा क्षेत्रात ४००, देवळीत ४७४, हिंगणघाट ५४३ तर वर्धेत सर्वाधिक ७७३ मतदारंनी नकाराधिकाराचा वापर केला होता. विधानसभा निवडणुकीतही या बटनाचा वापर करण्याची मुभा आहे. यामुळे त्याचा परिणाम कोणत्या विधानसभा क्षेत्रात अधिक होईल हे मतदानानंतरच कळेल.