शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

‘नोटा’ बदलवू शकतो अनेकांच्या मतांचा ‘कोटा’

By admin | Updated: October 9, 2014 23:05 IST

आठ तालुके मिळून असलेल्या चारही विधानसभा क्षेत्रात रिंगणात असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अंकगणितातून आपल्या मतांचा कोटा ठरविला आहे. हा कोटा ठरविताना मात्र त्यांना ‘नोटा’ (नकाराधिकार)चा विसर

रूपेश खैरी - वर्धाआठ तालुके मिळून असलेल्या चारही विधानसभा क्षेत्रात रिंगणात असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अंकगणितातून आपल्या मतांचा कोटा ठरविला आहे. हा कोटा ठरविताना मात्र त्यांना ‘नोटा’ (नकाराधिकार)चा विसर पडल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना त्यांची नाराजी व्यक्त करण्याकरिता असलेल्या नोटाचा वापर झाला होता. विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे याचा वापर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आघाडीत झालेली बिघाडी व युतीत झालेला काडीमोड यामुळे आतापर्यंत एकमत असलेले अनेक कार्यकर्ते दुखावले. अशात उमेदवारी देताना झालेली घाई व काही ठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे पक्षाचे खंदे कार्यकर्ते नाराज झालेत. त्यांची नाराजी ते प्रचारातून दाखवित नसताना दिसून येत आहे. हा मतदार उमेदवारांना मते देतो वा नकाराधिकाराचा वापर करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे उमेदवारांकडून वर्तविली जाणारी भाकितेही बदलण्याची शक्यता आहे. सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारासह अनेकांनी रिंगणात उड्या घेतल्या आहेत. चारही मतदार संघातून एकूण ६९ उमेदवार रिंगणात आले आहेत. यात कधी राजकीय मित्र म्हणून सोबत बसणारे समोरासमोर आले आहेत. उमेदवारांच्या या भाऊगर्दीत मतदारही विचलीत होत आहे. शिवाय होत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रचारातून स्थानिक मुद्यांना तिलांजली देण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकाही उमेदवाराने स्थानिक विकासाकरिता काय करणार याचा कुठलाही खुलासा केला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे मतदारही विचारात पडला आहे.असाच प्रकार लोकसभेच्या निवडणुकीत झाला होता. यामुळे अनेक मतदारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या ‘नोटा’ या बटनाचा वापर करून आपली नाराजी दर्शविली होती. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात असलेल्या आठही तालुक्यात दोन हजार १९० मतदारांनी याचा वापर केला होता. यात आर्वी विधानसभा क्षेत्रात ४००, देवळीत ४७४, हिंगणघाट ५४३ तर वर्धेत सर्वाधिक ७७३ मतदारंनी नकाराधिकाराचा वापर केला होता. विधानसभा निवडणुकीतही या बटनाचा वापर करण्याची मुभा आहे. यामुळे त्याचा परिणाम कोणत्या विधानसभा क्षेत्रात अधिक होईल हे मतदानानंतरच कळेल.