शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

तांदळाअभावी अंमलबजावणी नाही

By admin | Updated: June 1, 2015 02:15 IST

दुष्काळग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उन्हाळी सुटीच्या दिवसातही पोषण आहाराची खिचडी शिजविण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले.

शासनाचे आदेश : दुष्काळग्रस्त भागातील शाळेत सुट्यांतही खिचडी शिजवा वर्धा : दुष्काळग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उन्हाळी सुटीच्या दिवसातही पोषण आहाराची खिचडी शिजविण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले. या आदेशानुसार जिल्ह्यात काम करण्याकरिता तांदूळच नसल्याने शिक्षकांची पंचाईत होत आहे. यामुळे शिक्षणमंत्र्यांचा हा निर्णय वर्धा जिल्ह्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयात संपर्क साधला आहे. तसा पत्रव्यवहारही झाला आहे. जिल्ह्यात पोषण आहाराच्या तांदळाचा दाणाही नसल्याने ही योजना कुचकामी ठरत असल्याचे पत्रातून कळविले आहे. यावर त्यांच्याकडून तांदूळ येण्यास आणखी आठ दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. योजना राबविण्याचा निर्णय घेत त्याच्या सूचना आल्या, मात्र आवश्यक साधनसामग्री आली नसल्याने निर्णय कागदोपत्रीच ठरत असल्याचे समोर येत आहे.जिल्ह्यात पाण्याने डोळे वटारल्याने दुष्काळ घोषित करण्यात आला. या बिकट परिस्थितीत ग्रामीण भागातील चिमुकल्यांना अन्नाविना राहण्याची वेळ येवू नये हा उदात्त हेतू ठेवत शिक्षणमंत्र्यांनी सुट्यांच्या दिवसातही शाळांत खिचडी शिजविण्याची योजना आखली. तसे पत्र प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. वर्धेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आलेल्या पत्रानुसार प्रत्येक पंचायत समितीला आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्या; मात्र जिल्ह्यात तांदळाचा दाणा नसल्याने पत्राची अंमलबजावणी करण्यास अनेक अडचणी जात असल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. सुट्यांच्या काळात मुलेच शाळेत येत नसल्याने खिचडी कुणाकरिता शिजवावी असाही प्रश्न अनेक शाळांतील शिक्षक करीत आहेत. काही शाळात अहवालाच्या नावावर खिचडी शिजविण्याचा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. यात घोळ होण्याची शक्यता आहे. यामुळे शासनाची ही योजना जिल्ह्यात कुचकामी ठरत असल्याचे समोर येत आहे. हीच अवस्था राज्याचीही असल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या ३९४ शाळांत खिचडी शिजविण्याची सक्तीवर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३९४ शाळा आहेत. शासनाच्या शाळा असल्याने त्यांच्यावर दुष्काळाच्या काळात शाळेत खिचडी शिजविण्याची सक्ती आहेच. या सक्तीनुसार शिक्षक कार्यवाही करीत असले तरी त्यांच्याकडे तांदूळ उपलब्ध नसल्याने खिचडी कशाची शिजवावी या विवंचनेत ते आहेत. केवळ तादूळच नाही तर इतर साहित्याही त्यांना मिळाले नाही. यामुळे आणखीच पंचाईत होत आहे.जिल्हा परिषदेव्यतिरिक्त नगर परिषदेच्या ५४ शाळा आहेत. या व्यतिरिक्त खासगी शाळांचे मोठ जाळे आहे. या शाळांत मुलेच येत नसल्याने या आदेशाची अंमलबजावणी कशी करावी असा प्रश्न जिल्ह्यातील शिक्षकांना पडला आहे. जुना तांदूळही नाही शालेय पोषण आहरातील तांदळाचा एकही दाणा जिल्ह्यात शिल्लक नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. अशात नव्याने ही योजना राबविण्याच्या सूचना आल्या. त्यामुळे खिचडी शिजविण्याची नवी समस्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसमोर उभी आहे.अनेक शाळेत कागदोपत्री खिचडी शासनाच्या सूचना असल्याने त्याचा अहवाल सादर करावा लागणार हे स्पष्ट असल्याने बऱ्याच शिक्षकांनी त्यांच्या शाळेत खिचडी शिजविण्यात येत असल्याच्या नोंदी कागदावर घेणे सुरू केल्याची माहिती आहे. यामुळे येणाऱ्या तांदळात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. याची चौकशी गरजेची झाली आहे. पत्रव्यवहार होऊनही पुरवठा नाही सुट्यांच्या दिवसात खिचडी शिजविण्याच्या आदेशानुसार शिक्षण संचालक कार्यालयाला तांदूळ देण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे; मात्र त्यांच्याकडून अद्याप कुठलेही साहित्य आले नाही. यामुळे योजना राबविणे अडचणीचे जात असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.