शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत असहकार आंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

समाजवादी पार्टीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्रभर रॅली काढली आहे. या रॅलीची सुरुवात नागपुरातून झाली असून रविवारी दुपारी ही रॅली वर्ध्यात पोहोचली. यादरम्यान त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर चांगलीच तोफ डागली. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात विविध थोर महात्म्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले.

ठळक मुद्देअबू आझमी : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात केंद्र सरकावर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाचे पंतप्रधान नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून जातिवाद पसरविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे कश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत अशांतता माजली आहे. या कायद्याला समाजवादी पार्टीचा विरोध असून वारंवार हा कायदा रद्द करण्याची मागणी करीत आहोत. हा कायदा रद्द झाला नाही तर इंग्रजांप्रमाणेच केंद्रसरकारच्या विरुद्ध असहकार आंदोलन उभारले जाईल, असा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.समाजवादी पार्टीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्रभर रॅली काढली आहे. या रॅलीची सुरुवात नागपुरातून झाली असून रविवारी दुपारी ही रॅली वर्ध्यात पोहोचली. यादरम्यान त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर चांगलीच तोफ डागली. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात विविध थोर महात्म्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा गांधीजींचे नेतृत्व मान्य करणारे भारतात तर मोहम्मद जिना यांचे नेतृत्व स्वीकारणारे पाकिस्तानमध्ये गेले. जे भारतात आहे त्यांच्याकडे आधारकार्ड व मतदान कार्ड असतानाही त्यांचे नागरिकत्व नाकारण्याचा खटाटोप चालविला आहे. ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न न करता इंग्रजांचे तळवे चाटले तेच आता गांधीचीच्या स्वप्नाला मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घाणाघाती आरोपही आमदार अबू आझमी यांनी केला. सोबतच हिंदू-मुस्लिमध्ये वाद निर्माण करुन आरक्षण संपविण्याचा हा घाट असल्याने संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी केले. पत्रपरिषदेला सपचे प्रदेश सचिव इजहार अली, कामठीच्या माजी नगराध्यक्ष माया चवरे, जिल्हाध्यक्ष आसिफ शेख, परवेज सिद्दीकी व मुस्ताक खान आदींची उपस्थिती होती.व्यापारी राजा बनू शकत नाहीदेशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून जेडीपीही कमी होत आहे.बांगलादेशापेक्षाही भारताची आर्थिक बाजू कमकुवत झाली. मात्र याकडे लक्ष न देता जातीच्या नावावर भडकविण्याचे काम सुरु आहे. व्यापारी कधीही राजा होऊ शकत नाही. त्यामुळे देशाचे संविधान वाचविण्यासाठी व्यापाऱ्यांना हकलून लावा, असेही ते म्हणाले.उद्धव ठाकरे यांचे मानले आभारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी देवेंद्र फडणवीस यांचा साथ सोडला. अन्यथा महाराष्ट्रातही युपीसारखी परिस्थिती असती. उत्तरप्रदेशात पोलिसांकडून गुंडागर्दी चालविली जात असून योगी सरकार चुकीच्या पद्धतीने आंदोलनातील नुकसान भरपाई वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. युपीमध्ये पोलीस व शासकीय कर्मचारी भाजपा व आरएसएसचे कामगार झाले आहे. जर महाराष्ट्रातही भाजप सरकार असते तर परिस्थिती युपीसारखी झाली असती, असेही आ. अबू आझमी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमी