शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत असहकार आंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

समाजवादी पार्टीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्रभर रॅली काढली आहे. या रॅलीची सुरुवात नागपुरातून झाली असून रविवारी दुपारी ही रॅली वर्ध्यात पोहोचली. यादरम्यान त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर चांगलीच तोफ डागली. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात विविध थोर महात्म्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले.

ठळक मुद्देअबू आझमी : नागरिकत्व कायद्याच्या विरोधात केंद्र सरकावर डागली तोफ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाचे पंतप्रधान नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून जातिवाद पसरविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे कश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत अशांतता माजली आहे. या कायद्याला समाजवादी पार्टीचा विरोध असून वारंवार हा कायदा रद्द करण्याची मागणी करीत आहोत. हा कायदा रद्द झाला नाही तर इंग्रजांप्रमाणेच केंद्रसरकारच्या विरुद्ध असहकार आंदोलन उभारले जाईल, असा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.समाजवादी पार्टीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्रभर रॅली काढली आहे. या रॅलीची सुरुवात नागपुरातून झाली असून रविवारी दुपारी ही रॅली वर्ध्यात पोहोचली. यादरम्यान त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर चांगलीच तोफ डागली. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात विविध थोर महात्म्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा गांधीजींचे नेतृत्व मान्य करणारे भारतात तर मोहम्मद जिना यांचे नेतृत्व स्वीकारणारे पाकिस्तानमध्ये गेले. जे भारतात आहे त्यांच्याकडे आधारकार्ड व मतदान कार्ड असतानाही त्यांचे नागरिकत्व नाकारण्याचा खटाटोप चालविला आहे. ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न न करता इंग्रजांचे तळवे चाटले तेच आता गांधीचीच्या स्वप्नाला मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घाणाघाती आरोपही आमदार अबू आझमी यांनी केला. सोबतच हिंदू-मुस्लिमध्ये वाद निर्माण करुन आरक्षण संपविण्याचा हा घाट असल्याने संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी केले. पत्रपरिषदेला सपचे प्रदेश सचिव इजहार अली, कामठीच्या माजी नगराध्यक्ष माया चवरे, जिल्हाध्यक्ष आसिफ शेख, परवेज सिद्दीकी व मुस्ताक खान आदींची उपस्थिती होती.व्यापारी राजा बनू शकत नाहीदेशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून जेडीपीही कमी होत आहे.बांगलादेशापेक्षाही भारताची आर्थिक बाजू कमकुवत झाली. मात्र याकडे लक्ष न देता जातीच्या नावावर भडकविण्याचे काम सुरु आहे. व्यापारी कधीही राजा होऊ शकत नाही. त्यामुळे देशाचे संविधान वाचविण्यासाठी व्यापाऱ्यांना हकलून लावा, असेही ते म्हणाले.उद्धव ठाकरे यांचे मानले आभारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी देवेंद्र फडणवीस यांचा साथ सोडला. अन्यथा महाराष्ट्रातही युपीसारखी परिस्थिती असती. उत्तरप्रदेशात पोलिसांकडून गुंडागर्दी चालविली जात असून योगी सरकार चुकीच्या पद्धतीने आंदोलनातील नुकसान भरपाई वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. युपीमध्ये पोलीस व शासकीय कर्मचारी भाजपा व आरएसएसचे कामगार झाले आहे. जर महाराष्ट्रातही भाजप सरकार असते तर परिस्थिती युपीसारखी झाली असती, असेही आ. अबू आझमी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमी