शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

सवारी नाही, पैसेही संपले, सांगा कुटुंब चालवू तरी कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने रिकाम्या हाताते घरी जातो, पैसेच नसल्याने तीन मुली व पत्नी यांचे पोषण कसे कारावे याच चिंतेत आहो.

ठळक मुद्देव्यथा रिक्षाचालकांची : उपासमारीचे संकट गडद, पाणावलेल्या डोळ्यांनी रिकाम्या हाताने घरी जाण्याची आली वेळ

पुरूषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तीन दिवसांपासून रिक्षा उभा आहे...एकही सवारी नाही... १० रुपयेही घरी नेऊ शकत नाही...पैसेच नसल्याने पत्नी, मुलांचे शिक्षण...घर खर्च कसा चालवू...अशी व्यथा पाणावलेल्या डोळ्यांनी रिक्षाचालक मांडत आहेत.लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने रिकाम्या हाताते घरी जातो, पैसेच नसल्याने तीन मुली व पत्नी यांचे पोषण कसे कारावे याच चिंतेत आहो. एकही पैसा मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले. सवारी अभावी सायकल रिक्षाचालकांवर आधीच अवकळा आली आहे. काही सवारी आल्याच तर ई-रिक्षावाले त्या अर्ध्या पैशात घेऊन जातात. दोन महिने उलटले परिस्थितीत जैसे थेच आहे. बससेवा बंद असल्याने एकही सवारी मिळत नाही. उद्योगधंदे ठप्प असल्याने कुठे मजुरीही मिळत नाही. सायकल रिक्षाची जागा आता ऑटोरिक्षाने घेतल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्वी शहर मोठी बाजारपेठ असल्याने ग्राहकांची व व्यापाऱ्यांची वर्दळ असते. रिक्षाचालकांना देखील चांगला रोजगार मिळत होता. पूर्वी खेड्यापाड्यातून दही, दूध, ताक तूप घेऊन येणारे गौरी समाजाचे ग्राहक बसस्थानकावर उतरायचे व रिक्षात बसून सोडून देताना ते स्व:खुशीने २० ते ३० रुपये देत होते. पण, लॉकडाऊनमुळे त्यांचे येणे बंद झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे रिक्षाचालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.कोरोनामुळे उदरनिर्वाह करणे झाले कठीणशहरातील विविध भागात जाण्याकरीता रिक्षाचालक २० ते ४० रुपयांपर्यंत दर आकरत असल्याने सुमारे दोनशे ते तीनशे रुपये उत्पन्न मिळत होते. पण, सध्या लॉकडाऊन असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. बसस्थानकातून शहरातील विविध ठिकाणी जाण्याकरता प्रवासी मिळत होते ते आता ई-रिक्षा व ऑटोरिक्षाचालक घेऊन जात असल्याने रिक्षाचालकांला प्रवासी मिळणे कठीण झालेले आहे.गेल्या ४४ वर्षांपासून रिक्षाचालकांवर अशी स्थिती कधीच ओढावली नाही. लॉकडाऊनमुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा ही चिंता आहे. बसस्थानक परिसरातून एकही सवारी मिळत नाही. आम्ही ऊल्हापूर नाक्याचे चाळीस रुपये घेत होतो. पण, पण, त्याच सवारीला ऑटो रिक्षाचालक वीस रुपयांत घेऊन जात असल्याने नागरिकांनीही सायकलरिक्षाकडे पाठ फिरविली आहे.शेख बसिर शेख कादीर, रिक्षाचालक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या