शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
3
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
4
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
5
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
6
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
7
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
8
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
9
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
10
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
11
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
12
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
13
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
14
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
15
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
16
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
17
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
19
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
20
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

सवारी नाही, पैसेही संपले, सांगा कुटुंब चालवू तरी कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने रिकाम्या हाताते घरी जातो, पैसेच नसल्याने तीन मुली व पत्नी यांचे पोषण कसे कारावे याच चिंतेत आहो.

ठळक मुद्देव्यथा रिक्षाचालकांची : उपासमारीचे संकट गडद, पाणावलेल्या डोळ्यांनी रिकाम्या हाताने घरी जाण्याची आली वेळ

पुरूषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तीन दिवसांपासून रिक्षा उभा आहे...एकही सवारी नाही... १० रुपयेही घरी नेऊ शकत नाही...पैसेच नसल्याने पत्नी, मुलांचे शिक्षण...घर खर्च कसा चालवू...अशी व्यथा पाणावलेल्या डोळ्यांनी रिक्षाचालक मांडत आहेत.लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने रिकाम्या हाताते घरी जातो, पैसेच नसल्याने तीन मुली व पत्नी यांचे पोषण कसे कारावे याच चिंतेत आहो. एकही पैसा मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले. सवारी अभावी सायकल रिक्षाचालकांवर आधीच अवकळा आली आहे. काही सवारी आल्याच तर ई-रिक्षावाले त्या अर्ध्या पैशात घेऊन जातात. दोन महिने उलटले परिस्थितीत जैसे थेच आहे. बससेवा बंद असल्याने एकही सवारी मिळत नाही. उद्योगधंदे ठप्प असल्याने कुठे मजुरीही मिळत नाही. सायकल रिक्षाची जागा आता ऑटोरिक्षाने घेतल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्वी शहर मोठी बाजारपेठ असल्याने ग्राहकांची व व्यापाऱ्यांची वर्दळ असते. रिक्षाचालकांना देखील चांगला रोजगार मिळत होता. पूर्वी खेड्यापाड्यातून दही, दूध, ताक तूप घेऊन येणारे गौरी समाजाचे ग्राहक बसस्थानकावर उतरायचे व रिक्षात बसून सोडून देताना ते स्व:खुशीने २० ते ३० रुपये देत होते. पण, लॉकडाऊनमुळे त्यांचे येणे बंद झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे रिक्षाचालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.कोरोनामुळे उदरनिर्वाह करणे झाले कठीणशहरातील विविध भागात जाण्याकरीता रिक्षाचालक २० ते ४० रुपयांपर्यंत दर आकरत असल्याने सुमारे दोनशे ते तीनशे रुपये उत्पन्न मिळत होते. पण, सध्या लॉकडाऊन असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. बसस्थानकातून शहरातील विविध ठिकाणी जाण्याकरता प्रवासी मिळत होते ते आता ई-रिक्षा व ऑटोरिक्षाचालक घेऊन जात असल्याने रिक्षाचालकांला प्रवासी मिळणे कठीण झालेले आहे.गेल्या ४४ वर्षांपासून रिक्षाचालकांवर अशी स्थिती कधीच ओढावली नाही. लॉकडाऊनमुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा ही चिंता आहे. बसस्थानक परिसरातून एकही सवारी मिळत नाही. आम्ही ऊल्हापूर नाक्याचे चाळीस रुपये घेत होतो. पण, पण, त्याच सवारीला ऑटो रिक्षाचालक वीस रुपयांत घेऊन जात असल्याने नागरिकांनीही सायकलरिक्षाकडे पाठ फिरविली आहे.शेख बसिर शेख कादीर, रिक्षाचालक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या