शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गॅसही नाही अन् रॉकेलही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

रेशन दुकाने हा सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ, मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेतून सर्वसामान्यांना गॅस दिला जाणार होता. पण, तीन ते चार महिन्यांपासून हा गॅसही मिळालेला नाही.

ठळक मुद्देउज्ज्वला योजनेचा उद्देशच बाजूला : रेशनकार्डावरील रॉकेल देण्याची मागणी

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोरगरिबांच्या घरातील स्टोव्हसाठी रेशनकार्डावर मिळणारे रॉकेल बंदच झाल्याने त्यांचे हाल होत आहे. परिणामी, नागरिकांना पुन्हा चूल पेटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर देण्याचे स्वप्न सरकारने दाखविले. पण, गॅस भरण्यासाठी पैसेच नसल्याने गरिबांना वर्षाला कसेबसे पाच ते सहा सिलिंडर वापरावे लागत आहे. त्यामुळे योजनेचा मुळ उद्देशच बाजूला पडला आहे. त्यामुळे गॅसही नाही, अन् रॉकेलही नाही, अशी अवस्था झाली आहे. केरोसीनमुक्तीच्या नादात वर्धा जिल्ह्यातील केरोसीनचा पुरवठा निम्म्याहून अधिक घटविण्यात आल्याने रेशनकार्डावरील रॉकेल पुन्हा देण्याची मागणी गरीबांकडून होत आहे.रेशन दुकाने हा सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ, मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेतून सर्वसामान्यांना गॅस दिला जाणार होता. पण, तीन ते चार महिन्यांपासून हा गॅसही मिळालेला नाही. उज्ज्वलाचा गॅसही नाही आणि हक्काचे मिळणारे अनुदानातील रॉकेलही नाही. शहरी भागातील दाट लोकवस्ती आणि झोपडपटी भागात सकाळी आंघोळीचे पाणी तापविणे, जेवण करणे यासाठी सर्रास पुन्हा चुलीचाच वापर केला जातो. किंवा स्टोव्हचा वापर केला जातो. पण, रॉकेल मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.२००९ पासून रॉकेल बंदरेशनकार्डावरील रॉकेल नियंत्रित दराने मिळत होते. प्रत्येक कुटुंबाला ५ ते २४ लिटरप्रमाणे संख्येनुसार रॉकेल मिळत होते. पण, २००९ पासून हे रॉकेल बंद केले आहे. १ गॅस सिलिंडर असणाऱ्यांनाही चार लिटर प्रतिमहिना प्रतिकार्ड रॉकेल दिले जात होते. पण, हे बंदच असल्याने नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहे.‘उज्ज्वला’मुळे ४८ हजार कुटुंबे गॅसधारकजिल्ह्यात उज्ज्वला योजना केंद्र सरकारच्या धोरणानुसार २०१६ मध्ये सुरू झाली. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांकडे मिळून जिल्ह्यात सुमारे ४८ हजार उज्ज्वला योजनेतील कनेक्शन आहेत. या ग्राहकांचा गॅस वापरण्याचे प्रमाण कमी आहे. हे ग्राहक गरीब कुटुंबातील असल्याने उज्ज्वलाचा गॅस ते पर्याय म्हणून वापरतात. त्यामुळे वर्षाला पाच ते सहा सिलिंडरच ते घेतात. त्यामुळे पुन्हा ते चूल अथवा स्टोव्हचा वापर करतात. उज्ज्वलाच्या नव्या गॅस जोडण्याही दोन वर्षांपासून बंद आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजना