शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

निशीगंधा वाड होणार जि.प. शिक्षण विभागाच्या ‘सदिच्छादूत’

By admin | Updated: July 6, 2017 01:01 IST

अभिनयासह साहित्य व शिक्षण क्षेत्रातही रूची असलेल्या सिनेतारका निशीगंधा वाड यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेला भेट दिली.

जिल्हा परिषदेला दिली भेट : शिक्षणाच्या दर्जा वाढीबाबत चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अभिनयासह साहित्य व शिक्षण क्षेत्रातही रूची असलेल्या सिनेतारका निशीगंधा वाड यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेला भेट दिली. याप्रसंगी जि.प. शिक्षण विभागाच्या ‘सदिच्छादूत’ होण्यास त्यांनी होकार दर्शविला. शिवाय जि.प. शाळांच्या दर्जावाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करीत नाविण्यपूर्ण उपक्रमाचे कौतुकही केले. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांची सिनेतारका निशीगंधा वाड यांच्याशी नागपूर येथे भेट झाली. त्यांनी जि.प. प्राथमिक शाळा तसेच तेथील शिक्षणाचा दर्जा वाढीसाठी काय करता येईल, असा प्रश्न त्यांना केला होता. शिवाय जिल्हा परिषदेला भेट देण्याचे सूचविले होते. यावरून वाड यांनी आज जिल्हा परिषदेला भेट दिली. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आली. यात जिल्ह्यातील ९२७ पैकी सुमारे ७०० शाळा डिजिटल झालेल्या आहेत. उर्वरित शाळाही डिजिटल करायच्या आहे. यासाठी कशी मदत मिळू शकेल, यावरही चर्चा केली. पालकांचे जि.प. शाळांकडे आकर्षण वाढावे, प्राथमिक शिक्षणात सुधारणेसाठी जि.प. शिक्षण विभागाच्या ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर’ व्हावे, असे त्यांना सूचविले. यावर त्यांनी होकार दर्शविला. यामुळे त्यांना जि.प. शिक्षण विभागाचे सदिच्छादूत करण्यावर विचार विनिमय करण्यात येणार आहे. शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती व पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर यावर निर्णय घेणार असल्याचे जि.प. अध्यक्ष मडावी यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण उपक्रमाचे केले कौतुक वर्धा जिल्हा परिषदेद्वारे ग्रामीण भागातील महिला, मुलींकरिता सॅनिटरी नॅप्कीन पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे. याबाबत निशीगंधा वाड यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी नाविण्यपूर्ण योजना संबोधित कौतुक केले. ही योजना राज्यातील काहीच गावांत राबविली जाते. जिल्ह्याच्या सर्व गावांत ही योजना राबविणारी वर्धा जिल्हा परिषद एकमेव ठरणार आहे. हे नॅप्कीन ग्रामीण महिला, मुलींना केवळ पाच रुपयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही अध्यक्ष नितीन मडावी यांनी सांगितले.