शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

महात्मा गांधींच्या साक्षीने अन्नत्याग आंदोलन

By admin | Updated: March 20, 2017 00:41 IST

नापिकी, शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर यातून वाढत असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सुरू झालेले सत्र आजही कायम आहे.

वर्धा : नापिकी, शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर यातून वाढत असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सुरू झालेले सत्र आजही कायम आहे. राज्यात पहिल्या आत्महत्येला आज ३१ वर्षे पूर्ण होत आहे. या घटनेची स्मृती आणि शासनाच्या शेतकऱ्यांविरोधी असलेले धोरण या विरोधात रविवारी वर्धेत महात्मा गांधी यांच्या पुजळ्याजवळ तथा सेवाग्राम आश्रमासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. शिवाय जनमंच, आम्ही वर्धेकर यासह विविध संघटनांच्या सदस्यांची यात उपस्थिती होती. यावेळी शेतमालाला रास्त भाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात वर्धेसह इतर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या घटनेची स्मृती आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अन्नत्याग आंदोलनाला ठरल्याप्रमाणे आज सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. ठरलेले ठिकाण महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकेक करीत शेतकरी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य गोळा झाले. या आंदोलनाला वर्धेतील अनेक सामाजिक संस्थांनी पाठींबा दिल्याने त्यांचीही येथे गर्दी होऊ लागली. उन्हाचा पारा चढत असल्याने आंदोलकांनी त्यांचे स्थळ बदलवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या झाडाच्या सावलीत नेले. येथे एकत्र आलेल्या आंदोलकांनी महात्मा गांधी यांची जीवनचरित्राचे आणि त्यांच्या इतर पुस्तकाचे वाचन केले. प्रत्येकाकडून महात्मा गांधींच्या जीवनचरित्राचे वाचन समस्या शेतकऱ्यांच्या असो वा इतर कोणत्याही, त्या सोडविण्याकरिता महत्मा गांधी यांचे विचार व त्यांची जीवनी यातूनच मार्ग मिळतो. राज्यकर्त्यांना याचीच जाणीव व्हावी याकरिता अन्नत्याग आंदोलनात सहभागी प्रत्येकाने महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे वाचन केल्याचे बोलले जात आहे.