शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

महात्मा गांधींच्या साक्षीने अन्नत्याग आंदोलन

By admin | Updated: March 20, 2017 00:41 IST

नापिकी, शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर यातून वाढत असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सुरू झालेले सत्र आजही कायम आहे.

वर्धा : नापिकी, शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर यातून वाढत असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सुरू झालेले सत्र आजही कायम आहे. राज्यात पहिल्या आत्महत्येला आज ३१ वर्षे पूर्ण होत आहे. या घटनेची स्मृती आणि शासनाच्या शेतकऱ्यांविरोधी असलेले धोरण या विरोधात रविवारी वर्धेत महात्मा गांधी यांच्या पुजळ्याजवळ तथा सेवाग्राम आश्रमासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. शिवाय जनमंच, आम्ही वर्धेकर यासह विविध संघटनांच्या सदस्यांची यात उपस्थिती होती. यावेळी शेतमालाला रास्त भाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात वर्धेसह इतर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या घटनेची स्मृती आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अन्नत्याग आंदोलनाला ठरल्याप्रमाणे आज सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. ठरलेले ठिकाण महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकेक करीत शेतकरी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य गोळा झाले. या आंदोलनाला वर्धेतील अनेक सामाजिक संस्थांनी पाठींबा दिल्याने त्यांचीही येथे गर्दी होऊ लागली. उन्हाचा पारा चढत असल्याने आंदोलकांनी त्यांचे स्थळ बदलवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या झाडाच्या सावलीत नेले. येथे एकत्र आलेल्या आंदोलकांनी महात्मा गांधी यांची जीवनचरित्राचे आणि त्यांच्या इतर पुस्तकाचे वाचन केले. प्रत्येकाकडून महात्मा गांधींच्या जीवनचरित्राचे वाचन समस्या शेतकऱ्यांच्या असो वा इतर कोणत्याही, त्या सोडविण्याकरिता महत्मा गांधी यांचे विचार व त्यांची जीवनी यातूनच मार्ग मिळतो. राज्यकर्त्यांना याचीच जाणीव व्हावी याकरिता अन्नत्याग आंदोलनात सहभागी प्रत्येकाने महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे वाचन केल्याचे बोलले जात आहे.