शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या साक्षीने अन्नत्याग आंदोलन

By admin | Updated: March 20, 2017 00:41 IST

नापिकी, शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर यातून वाढत असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सुरू झालेले सत्र आजही कायम आहे.

वर्धा : नापिकी, शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर यातून वाढत असलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सुरू झालेले सत्र आजही कायम आहे. राज्यात पहिल्या आत्महत्येला आज ३१ वर्षे पूर्ण होत आहे. या घटनेची स्मृती आणि शासनाच्या शेतकऱ्यांविरोधी असलेले धोरण या विरोधात रविवारी वर्धेत महात्मा गांधी यांच्या पुजळ्याजवळ तथा सेवाग्राम आश्रमासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. शिवाय जनमंच, आम्ही वर्धेकर यासह विविध संघटनांच्या सदस्यांची यात उपस्थिती होती. यावेळी शेतमालाला रास्त भाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात वर्धेसह इतर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या घटनेची स्मृती आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्याकरिता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अन्नत्याग आंदोलनाला ठरल्याप्रमाणे आज सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. ठरलेले ठिकाण महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकेक करीत शेतकरी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य गोळा झाले. या आंदोलनाला वर्धेतील अनेक सामाजिक संस्थांनी पाठींबा दिल्याने त्यांचीही येथे गर्दी होऊ लागली. उन्हाचा पारा चढत असल्याने आंदोलकांनी त्यांचे स्थळ बदलवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या झाडाच्या सावलीत नेले. येथे एकत्र आलेल्या आंदोलकांनी महात्मा गांधी यांची जीवनचरित्राचे आणि त्यांच्या इतर पुस्तकाचे वाचन केले. प्रत्येकाकडून महात्मा गांधींच्या जीवनचरित्राचे वाचन समस्या शेतकऱ्यांच्या असो वा इतर कोणत्याही, त्या सोडविण्याकरिता महत्मा गांधी यांचे विचार व त्यांची जीवनी यातूनच मार्ग मिळतो. राज्यकर्त्यांना याचीच जाणीव व्हावी याकरिता अन्नत्याग आंदोलनात सहभागी प्रत्येकाने महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्राचे वाचन केल्याचे बोलले जात आहे.