शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

कृषी केंद्रांवर नऊ भरारी पथकांचा ‘वॉच’

By admin | Updated: June 7, 2017 00:28 IST

जिल्ह्यात कृषी निविष्ठा गुणनियंत्रणाकरिता तसेच कृषी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

बाजारात बोगस बियाणे दाखल : शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कृषी निविष्ठा गुणनियंत्रणाकरिता तसेच कृषी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. तसेच आठही तालुका स्तरावर प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. तक्रार निवारण समितीत बियाणे, खत व किटकनाशक यांचा होणारा काळाबाजार तसेच ज्यादा दराने विक्री, लिकिंग आदी तक्रारींचे निवारण करणार आहे. याकरिता टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला असून शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. जिल्हास्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक, वजनमापे निरीक्षक यांचा भरारी पथकात समावेश असून तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, वजनमापे निरीक्षक यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर असे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून शेतकऱ्यांना यासंदर्भात कोणत्याही तक्रारी असल्यास तक्रार नमूद करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर यांनी केले आहे. आर.आर. किंवा बी.जी.-३ नावाने बोगस बियाणे बाजारात महाशक्ती आर.आर. किवा बी.जी.-३ इत्यादी नावाने बियाणे येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवानी सावधानी बाळगण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. असे बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात आलेले असते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्याचे कोणतेही देयक किवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही.