शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांवर नऊ भरारी पथकांचा ‘वॉच’

By admin | Updated: June 7, 2017 00:28 IST

जिल्ह्यात कृषी निविष्ठा गुणनियंत्रणाकरिता तसेच कृषी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

बाजारात बोगस बियाणे दाखल : शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कृषी निविष्ठा गुणनियंत्रणाकरिता तसेच कृषी केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. तसेच आठही तालुका स्तरावर प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. तक्रार निवारण समितीत बियाणे, खत व किटकनाशक यांचा होणारा काळाबाजार तसेच ज्यादा दराने विक्री, लिकिंग आदी तक्रारींचे निवारण करणार आहे. याकरिता टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला असून शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. जिल्हास्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक, वजनमापे निरीक्षक यांचा भरारी पथकात समावेश असून तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, वजनमापे निरीक्षक यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर असे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून शेतकऱ्यांना यासंदर्भात कोणत्याही तक्रारी असल्यास तक्रार नमूद करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर यांनी केले आहे. आर.आर. किंवा बी.जी.-३ नावाने बोगस बियाणे बाजारात महाशक्ती आर.आर. किवा बी.जी.-३ इत्यादी नावाने बियाणे येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवानी सावधानी बाळगण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. असे बियाणे कोणत्याही प्रकारची चाचणी न होता बाजारात आलेले असते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा अनधिकृत खरेदी केलेल्या बियाण्याचे कोणतेही देयक किवा परवाना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बोगस बियाण्यामुळे नुकसान झाल्यास कोणतीही नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येत नाही.