शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

४८ तासानंतरही निलंबनाच्या कारवाईला बगल

By admin | Updated: July 10, 2015 00:19 IST

रेती व्यावसायिक मृत्यूप्रकरण : तहसीलमध्ये पोलीस बंदोबस्त

आष्टी (श.) : गोदावरी येथील श्रीकृष्ण भुयार यांचा तलाठ्याच्या जाचामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणात तलाठ्याचे त्वरित निलंबन करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात पाच तास मृतदेह ठेवला. यावेळी ४८ तासांत कारवाई केली जाईल, असे एसडीओंनी सांगितले; पण त्यानंतरही कारवाई केली नाही. यामुळे मृतकाच्या भावाने अस्थिकलश एसडीओ कार्यालयात नेत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिल्याने वातावरण तापले.उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांनी ४८ तासांत निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता. आज ५८ तास संपले; पण कारवाई झाली नाही. कारवाई इतक्या लवकर होणार नाही, असे एसडीओ आंधळे यांनी सांगितले. आता या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. काँग्रेसच्या निलंबन मागणीवर भाजपाने तलाठी जगताप अत्यंत कर्तव्यदक्ष असून त्यांचे निलंबन त्वरित मागे घेण्याची मागणी केली. यामुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. अकिाऱ्यांनी स्वत: ग्रामस्थांना तक्रार देण्यास भाग पाडल्याची माहिती मृतक श्रीकृष्ण यांचा भाऊ नंदकिशोर भुयार यांनी दिली. अद्यापही कारवाई न झाल्याने मृतकाच्या भावाने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय आर्वी येथे अस्थिकलश घेऊन जात कारवाई होईस्तोवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. परिणामी, तहसील कार्यालयातच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. या प्रकारामुळे उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. यातच तलाठी जगताप यांना त्वरित निलंबित करावे, या मागणीसाठी युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव सचिन वैद्य जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची भेट घेणार आहे. त्वरित कारवाई न झाल्यास एसडीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून तणावाच्या भीतीनेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे प्रशासनाविरूद्ध वातावरण तापले आहे. उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांना विचारणा केली असता इतक्या लवकर कारवाई शक्य नाही. तहसीलदार यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करू असे सांगितले. या प्रकरणी राजकारण होत असल्याने संवेदनशील घटनेत हस्तक्षेप न करण्याचे आवाहन तहसीलदार मोरे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)