शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

नागरिकांच्या सेवेत नवीन ११ सुसज्ज रुग्णवाहिका

By admin | Updated: September 1, 2014 23:47 IST

आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्यावतीने सर्वसामान्यांना विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्या सुविधा अत्याधुनिक कशा करता येतील याचा प्रयत्न सुरू असताना शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात

शासनाचे आदेश : इमरजन्सी मेडिकल सर्व्हीस सुरूवर्धा : आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्यावतीने सर्वसामान्यांना विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्या सुविधा अत्याधुनिक कशा करता येतील याचा प्रयत्न सुरू असताना शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात इमरजन्सी मेडिकल सर्व्हीस सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना सोयी सुविधा मिळाव्या याकरिता जिल्ह्यात नवीन ११ सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्या अपघात प्रवण स्थळ असलेल्या परिसरातील रुग्णालयात पाहोचत्या करण्यात आल्या आहेत.अपघात झाल्यावर पहिल्या तासाला ‘गोल्डन हवर’ असे वैद्यकीय भाषेत बोलले जाते. या काळात जर रुग्णाला उपचार मिळाला तर त्याचे प्राण वाचविणे शक्य होते. हाच ‘गोल्डण हवर’ हाताळण्याकरिता शासनाच्यावतीने ‘इमरजन्सी मेडिकल सर्व्हीस’ सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता १०८ हा दुरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. यावर भ्रमणध्वनी व दुरध्वनीवरून संपर्क साधल्यास या सेवेचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत ही सुविधा जिल्ह्यात पुरविण्यात येत आहे. या सेवेकरिता तळेगाव (श्यामजीपंत), सेलू (नागपूर-वर्धा मार्ग), हिंगणघाट (नागपूर वर्धा हायवे), समुद्रपूर (जाम-नागपूर हायवे), पुलगाव, खरांगणा (मो.) आर्वी, भिडी, कारंजा (घाडगे) या ठिकाणी बीएलएस (बेसीक लाईफ सेक्युरीटी) तर वडनेर (नागपूर-हैदराबाद महामार्ग) व वर्धा येथे एएलएस (अ‍ॅडव्हान्स लाईफ सेक्युरिटी) सुविधा असलेल्या या रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या जुन्या रुग्णवाहिका साध्या असल्याने त्यातून केवळ रुग्णवाहतूक होत होती. रुग्णावर उपचार करण्यात येत नव्हते. आता रुग्णवाहिकेतच रुग्णावर उपचार करणे शक्य आहे.(प्रतिनिधी)