शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

स्वच्छता अभियानाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 23, 2015 01:55 IST

केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. असे असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना वर्धा नगर पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात असल्याचे शहरातील अस्वच्छतेवरून दिसते.

वर्धा : केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. असे असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना वर्धा नगर पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात असल्याचे शहरातील अस्वच्छतेवरून दिसते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येबाबत माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, पालिकेवर राकाँ-भाजप युतीची सत्ता आहे.त्यांनी शासनाच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करून अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देण्याची मागणी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने केंद शासनाने स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. तर राज्य शासनाने या अभियानात योगदान देताना नगर पालिकांना मार्गदर्शक सूचना केल्या. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वर्धा नगर पालिकेने शासनाच्या अभियानास व निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांना दाद दिलेली दिसत नाही. नगराध्यक्ष व मुख्याधिकारे यांना या संदर्भात वारंवार विचारणा केली असता केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोणतीच कारवाई न.प.द्वारे करण्यात आली नाही. गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा भूमीत स्वच्छता मोहिमेचा अशा रीतीने फज्जा उडणे ही अतिशय लाजीरवाणी बाब असल्याचा आरोप केला आहे. परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य, राहणीमान उंचावण्यास तसेच भारताची सभ्यता, संस्कृती व सुचिता जीवनात प्रभावीपणे अंगीकारणारे सदर स्वच्छ भारत अभियान मार्गदर्शक तत्वानुसार राबविण्यात यावे, असे आदेश नगर पालिकेला द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना शिष्टमंडळ अनिल धोटे, प्रकाश खंडाते, योगेश भुंबर, आशिष दोडे, अमित पांडे, दिनेश डकरे, स्वप्निल गोटे यांच्यासह आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.(स्थानिक प्रतिनिधी)