शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 23, 2015 01:55 IST

केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. असे असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना वर्धा नगर पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात असल्याचे शहरातील अस्वच्छतेवरून दिसते.

वर्धा : केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. असे असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना वर्धा नगर पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात असल्याचे शहरातील अस्वच्छतेवरून दिसते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येबाबत माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, पालिकेवर राकाँ-भाजप युतीची सत्ता आहे.त्यांनी शासनाच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करून अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देण्याची मागणी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने केंद शासनाने स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. तर राज्य शासनाने या अभियानात योगदान देताना नगर पालिकांना मार्गदर्शक सूचना केल्या. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वर्धा नगर पालिकेने शासनाच्या अभियानास व निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांना दाद दिलेली दिसत नाही. नगराध्यक्ष व मुख्याधिकारे यांना या संदर्भात वारंवार विचारणा केली असता केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोणतीच कारवाई न.प.द्वारे करण्यात आली नाही. गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा भूमीत स्वच्छता मोहिमेचा अशा रीतीने फज्जा उडणे ही अतिशय लाजीरवाणी बाब असल्याचा आरोप केला आहे. परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य, राहणीमान उंचावण्यास तसेच भारताची सभ्यता, संस्कृती व सुचिता जीवनात प्रभावीपणे अंगीकारणारे सदर स्वच्छ भारत अभियान मार्गदर्शक तत्वानुसार राबविण्यात यावे, असे आदेश नगर पालिकेला द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना शिष्टमंडळ अनिल धोटे, प्रकाश खंडाते, योगेश भुंबर, आशिष दोडे, अमित पांडे, दिनेश डकरे, स्वप्निल गोटे यांच्यासह आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.(स्थानिक प्रतिनिधी)