शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

स्वच्छता अभियानाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 23, 2015 01:55 IST

केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. असे असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना वर्धा नगर पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात असल्याचे शहरातील अस्वच्छतेवरून दिसते.

वर्धा : केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. असे असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना वर्धा नगर पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात असल्याचे शहरातील अस्वच्छतेवरून दिसते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येबाबत माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, पालिकेवर राकाँ-भाजप युतीची सत्ता आहे.त्यांनी शासनाच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करून अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देण्याची मागणी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने केंद शासनाने स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. तर राज्य शासनाने या अभियानात योगदान देताना नगर पालिकांना मार्गदर्शक सूचना केल्या. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वर्धा नगर पालिकेने शासनाच्या अभियानास व निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांना दाद दिलेली दिसत नाही. नगराध्यक्ष व मुख्याधिकारे यांना या संदर्भात वारंवार विचारणा केली असता केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोणतीच कारवाई न.प.द्वारे करण्यात आली नाही. गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा भूमीत स्वच्छता मोहिमेचा अशा रीतीने फज्जा उडणे ही अतिशय लाजीरवाणी बाब असल्याचा आरोप केला आहे. परिणामी येथील नागरिकांचे आरोग्य, राहणीमान उंचावण्यास तसेच भारताची सभ्यता, संस्कृती व सुचिता जीवनात प्रभावीपणे अंगीकारणारे सदर स्वच्छ भारत अभियान मार्गदर्शक तत्वानुसार राबविण्यात यावे, असे आदेश नगर पालिकेला द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना शिष्टमंडळ अनिल धोटे, प्रकाश खंडाते, योगेश भुंबर, आशिष दोडे, अमित पांडे, दिनेश डकरे, स्वप्निल गोटे यांच्यासह आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.(स्थानिक प्रतिनिधी)