शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पुतण्याने केली काकूची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:43 IST

येथील यशवंतनगरातील दीपा खियानी (३५) यांची त्यांचाच पुतण्या वीरेंद्र गोपीचंद खियानी (२४) याने हत्या केली. ही घटना मंगळवारी घडली असून आरोपीने दीपाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर दीपाचा मृत्यू झाला. मृत दीपा डेकोरेशन व्यावसायीक सुनील खियानी यांच्या पत्नी होत. या प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

ठळक मुद्देयशवंतनगरातील घटना : घरगुती वाद गेला विकोपाला

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील यशवंतनगरातील दीपा खियानी (३५) यांची त्यांचाच पुतण्या वीरेंद्र गोपीचंद खियानी (२४) याने हत्या केली. ही घटना मंगळवारी घडली असून आरोपीने दीपाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर दीपाचा मृत्यू झाला. मृत दीपा डेकोरेशन व्यावसायीक सुनील खियानी यांच्या पत्नी होत. या प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.पोलीस सूत्रानुसार, दुपारी १२ वाजताच्या सुमारास दीपा हिचा पती सुनील खियानी हे संत कंवरराम सभागृहात कामानिमित्त गेले होते. त्यांना पुतण्या सचिनने काकुला मार लागला असून त्या पडल्याची माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना पत्नी दीपा ही रक्ताचे थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. त्यानंतर दीपाला कुटुंबीयांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपाला मृत घोषित केले. मृत दीपा आणि आरोपी वीरेंद्र यांच्यात घरातील रस्त्याच्या कारणावरून वाद झाला. शिवाय तो वाद विकोपाला जाऊन शाब्दिक चकमकीचे हाणामारीत रुपांतरण झाले. यातच वीरेंद्र याने दीपा हिला लोखंडी रॉडने मारहाण करून तिला गतप्राण केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सत्यवीर बंडीवार आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळवरून काही नमूने आणि साहित्य जप्त घेतले आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सूरू होती. पुढील तपास पीएसआय जीतेश कानपूरे करीत आहे.एक मजली इमारतीत तीन भावांचे वास्तव्ययशवंतनगरातील एक मजली इमारतीत खियानी कुटुंबातील तीन भावांचा परिवार वास्तव्याला आहे. तळ मजल्यात गोविंद खियानी तर पहिल्या मजल्यावर सुनील खियानी आणि गोपीचंद खियानी यांचे कुटुंब राहते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांना एकच रस्ता आहे. याच घरातील रस्त्याच्या कारणावरून नेहमी खटके उडत होते. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी दीपा हिने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते; पण त्यानंतर तिला समज देत परत आणण्यात आले. मात्र, आज हा वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे वास्तव असल्याची चर्चा परिसरात होत होती.दीपा मुलींना नुकतीच शाळेत पोहोचवून आली होतीमृत दीपा हिला दोन मुली आहेत. लहान मुलगी सहावीत तर मोठी आठवीचे शिक्षण घेत आहे. सदर घटनेच्या काही मिनिटांपूर्वी दीपा ही दोन्ही मुलींना शाळेत पोहोचून आली होती. शिवाय, घटनेच्या वेळी ती घरी एकटी होती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.