शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ना ग्रामसेवक, ना ग्रामविकास अधिकारी; कोण पार पाडते प्रशासकाची जबाबदारी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 18:38 IST

काही ग्रामसेवकांवर एकाहून अधिक भार : मनुष्यबळाअभावी कामांचा वाढतोय ताण

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या जेवढी आहे तेवढे देखील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी जिल्हा परिषदेला मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींपैकी ३०१ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ग्रामसेवक आपले कर्तव्य पार पाडत आहेत. काही ग्रामसेवकांवर एकाहून अधिक भार असल्याने मनुष्यबळाअभावी कामांचा ताण त्यांच्यावर येतो आहे. अशातच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणारे पुरेसे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकच नसल्याने योजना पोहचविण्यात अडचण निर्माण होत आहे.

सध्या विकासकामांसाठी ग्रामपंचायतींना थेट निधी जमा होत असल्यामुळे पूर्णवेळ ग्रामसेवक ३९ नसलेल्या गावांमध्ये विकासकामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पंचायत राज व्यवस्थेमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून ३७ ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. शिवाय राजकारणातील सुरुवातीचे धडे सुद्धा ग्रामपंचायतींमध्ये गिरवले जातात. या ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून शासन पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या काळात केंद्र शासनाकडून देण्यात येणारा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नेत्यांकडे मारावे लागणारे हेलपाटे बंद झाले आहेत. 

गावाची गरज पाहून विकासकामे करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. मात्र, त्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग दिला जात नाही. ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहतात. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक मिळू शकेल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे याचा परिणाम गावातील कामांवर होत आहे. काही ग्रामसेवकांवर एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने ते कोणालाच न्याय देऊ शकत नाहीत. परिणामी, ग्रामसेवकांविरुद्ध तक्रारी सुरू होतात.

तक्रार आली की अधिकारी देखील कसलाही विचार न करता प्रथमा त्यांच्यावर कार्यवाही करतात. त्यामुळे त्यांचीही काम करण्याची मानसिकता राहत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत तेथे पूर्णवेळ ग्रामसेवक केव्हा मिळणार असा सवाल करण्यात येत आहे.

ग्रामविकास अधिकाऱ्यांची स्थिती

  • मंजूर पदे - ५८
  • कार्यरत पद - ४७
  • रिक्त पदे - ११

जिल्ह्यातील ग्रामसेवकांची स्थिती

  • मंजूर पदे - ३२२
  • कार्यरत पद - २५८
  • रिक्त पदे - ६४

 

जिल्ह्यात कार्यरत ग्रामसेवक अन् ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकजिल्हा                 ग्रामसेवक          ग्रामविकास अधिकारी            जिल्ह्यातील रिक्त ग्रामसेवकांची पदेवर्धा                       ३५                                 १५                                                 १०सेलू                       ३१                                  ०४                                                 ०६देवळी                    ३४                                  ०२                                                 १०आर्वी                      ३९                                  ०९                                                ०९आष्टी                      २०                                  ०२                                                ०७कारंजा                    २७                                 ०३                                                 ०६हिंगणघाट                ३७                                 ०८                                                 ०८समुद्रपूर                  ३५                                  ०४                                                 ०८

एक ग्रामपंचायत, एक ग्रामसेवक धोरण हवेजिल्ह्यात ५२१ ग्रामपंचायती असून केवळ ३२२ ग्रामसेवक आणि ५८ ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २५८ ग्रामसेवक आणि ४७ ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे कार्यरत आहेत. परिणामी, एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. एका ग्रामपंचा- यतीत अनेक गावे येत असल्याने एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक धोरण राबविण्याची गरज आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत