शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

स्वस्त धान्य दुकानात गैरकारभार

By admin | Updated: June 11, 2014 00:14 IST

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील गैरकारभाराची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी. तसेच यात दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

सेलू : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील गैरकारभाराची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमावी. तसेच यात दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.प्रत्यक्ष दुकानदाराकडून होणारी मालाची उचल आणि ग्रामस्थांना होणारा पुरवठा पाहता तालुक्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गैरप्रकाराला उधाण आले आहे. याला काही अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. मागील अनेक दिवसांपासून हा सगळा गैरकारभार येथे सुरू आहे. काही दुकानदार कारवाई अभावी अधिकारी आमच्या पाठीशी आहे, त्यांना देणी द्यावी लागते, त्यामुळे आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही, अशाप्रकारची बतावणी ग्राहकांना करीत आहे. या स्वस्त धान्य दुकानाबाबत माहवारी मालाचा पुरवठा नागरिकांना होत नसल्याने आणि सगळे नियम धाब्यावर बसवून येथे हा कारभार राजरोसपणे सुरू असल्याने अनेक गावातील ग्रामस्थ मिळणाऱ्या सोई-सवलतींपासून वंचित झाले. स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांची होणारी फरपट पाहता कारवाई गरजेची झाली आहे. मात्र त्याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. स्वस्त धान्य दुकानदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये होत असलेल्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे येथे हे प्रकरण या स्तरावर दडपण्याचा प्रयत्न होत आहे. अन्नसुरक्षा योजनेही येथे बराच घोळ असून गरिबांना यातून वगळण्यात आले आहे. काही श्रीमंताची नावे या यादीत असल्याने ते याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. एपीएल ग्राहकांना तीन महिन्यांपासून धान्य पुरवठा बंद आहे. हा त्या ग्राहकांवर एकप्रकारे अन्याय आहे.गावागावात राशन दुकानाच्या माध्यमातून होणारा धान्य तथा रॉकेलचा पुरवठा आणि प्रत्यक्ष त्याचा लाभ किती ग्राहकांना मिळाला यासंबंधी राशनकार्डाची तपासणी केल्यास सगळा घोळ उघडकीस येवू शकतो, असाही उल्लेख निवेदनात करण्यात आला. अनेकदा दुकानदार या महिन्याला माल मिळाला नाही, कमी मिळाला, असे सांगून ग्रामस्थांना परतवून लावतात किंवा त्यांना थोडाफार वस्तू देतात. ग्राहकांना शासन नियमानुसार आजही धान्याचे वाटप होत नसून दुकान महिन्यातून दोन-तीन दिवसच उघडल्या जाते.झडशी, कोटंबा, येळाकेळी, मोही ब्राहणी येथील दुकानाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. स्वस्त धान्य दुकानदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने मनोबल वाढले आहे. या सर्व बाबींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या घोटाळ्याची चौकशी करावी. त्रिसदस्यीय समिती नेमण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करुन माहवारी निकषाप्रमाणे धान्य वाटपे करावे, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)