शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची जगाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:06 IST

गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे.

ठळक मुद्देसामाजिक न्यायमंत्री : बोरधरण आणि केळझर येथील ५ कोटींची पर्यटन विकास कामे

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे. जागतिक दहशतवादाच्या, आक्रमतेच्या, निराशेच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणात गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.यावेळी पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पंचायत समितीच्या सभापती सुनिता खोडे, भन्ते सदानंद, सियाराम लोहकरे, सरपंच रेखा लोंढे, उपसरपंच फारुख शेख उपस्थित होते.बोरधरण येथील बगीचा, केळझर येथील गणेश मंदिर परिसराचा विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचा विकास, हजरत पीरबाबा टेकडी परिसर विकास अशा एकूण ५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार आणि राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्यामुळे माणसाला माणसासारखे वागवले जाते. पण त्याहीपेक्षा त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा धम्माची ओळख समाजाला करून दिली. शोषित वर्गाचे हित साधल्याशिवाय देशाची उन्नती साधली जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.७० वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानावर संसदेत चर्चा घडवून आणली हे सांगताना खा. रामदास तडस म्हणाले, बाबासाहेबांचा विचार आज घरा-घरापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. पहिल्यांदा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येतोय. त्यात पुन्हा पर्यटन विकास कामांची भर पडली आहे.केळझरला तिनही धर्माचे उत्कृष्ट आणि नावाजलेले धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे केळझरला अ वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळावा अशी मागणी आमदार पंकज भोयर यांनी प्रसंगी केली. आमदार कुणावार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.सांस्कृतिक ठेवा जपण्याची आवश्यकता - मदन येरावारआजच्या पिढीसमोर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देण्याची गरज आहे. केळझरच्या भूमीवरून गत ४० वर्षांपासून धम्म परिषद आयोजित करून हा संदेश पोहचविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे या परिसराचा विकास करण्यासाठी आणखी निधी देऊ असे मदन येरावार म्हणाले. आज संपूर्ण जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा शांतीचा संदेश देणाºया बुद्धाची आठवण होते. युद्ध नको बुद्ध हवा, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. आपल्या पुर्वजांनी संस्कृतीचा ठेवा पुस्तक रूपात जतन केला आहे. त्यामुळे या पुस्तकांसाठी सुसज्ज ग्रंथालय याच कामात निर्माण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच या सर्व विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे आमदार पंकज भोयर यांचे कौतुकही केले.