शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची जगाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:06 IST

गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे.

ठळक मुद्देसामाजिक न्यायमंत्री : बोरधरण आणि केळझर येथील ५ कोटींची पर्यटन विकास कामे

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे. जागतिक दहशतवादाच्या, आक्रमतेच्या, निराशेच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणात गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.यावेळी पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पंचायत समितीच्या सभापती सुनिता खोडे, भन्ते सदानंद, सियाराम लोहकरे, सरपंच रेखा लोंढे, उपसरपंच फारुख शेख उपस्थित होते.बोरधरण येथील बगीचा, केळझर येथील गणेश मंदिर परिसराचा विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचा विकास, हजरत पीरबाबा टेकडी परिसर विकास अशा एकूण ५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार आणि राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्यामुळे माणसाला माणसासारखे वागवले जाते. पण त्याहीपेक्षा त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा धम्माची ओळख समाजाला करून दिली. शोषित वर्गाचे हित साधल्याशिवाय देशाची उन्नती साधली जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.७० वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानावर संसदेत चर्चा घडवून आणली हे सांगताना खा. रामदास तडस म्हणाले, बाबासाहेबांचा विचार आज घरा-घरापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. पहिल्यांदा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येतोय. त्यात पुन्हा पर्यटन विकास कामांची भर पडली आहे.केळझरला तिनही धर्माचे उत्कृष्ट आणि नावाजलेले धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे केळझरला अ वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळावा अशी मागणी आमदार पंकज भोयर यांनी प्रसंगी केली. आमदार कुणावार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.सांस्कृतिक ठेवा जपण्याची आवश्यकता - मदन येरावारआजच्या पिढीसमोर गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देण्याची गरज आहे. केळझरच्या भूमीवरून गत ४० वर्षांपासून धम्म परिषद आयोजित करून हा संदेश पोहचविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे या परिसराचा विकास करण्यासाठी आणखी निधी देऊ असे मदन येरावार म्हणाले. आज संपूर्ण जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा शांतीचा संदेश देणाºया बुद्धाची आठवण होते. युद्ध नको बुद्ध हवा, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. आपल्या पुर्वजांनी संस्कृतीचा ठेवा पुस्तक रूपात जतन केला आहे. त्यामुळे या पुस्तकांसाठी सुसज्ज ग्रंथालय याच कामात निर्माण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच या सर्व विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे आमदार पंकज भोयर यांचे कौतुकही केले.