शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

तंटामुक्त समितीला महिला अध्यक्षाची गरज

By admin | Updated: August 14, 2014 23:52 IST

गाव पातळीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करून गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या उद्देशाने राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविण्यात येत आहे.

वायगाव (नि.) : गाव पातळीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करून गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या उद्देशाने राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदावर पुरूषाची मक्तेदारी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. महिलांना येथे संधी मिळत नाही. ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देवून महिलांची सरपंचपदी निवड केली जाते. त्याचप्रमाणे येथे आरक्षण देऊन महिलांकडे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जावी. याकरिता शासनाने नियमावली करून तशी तरतूद करण्याची मागणी ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला राज या तत्वावर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान एका गावात तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपद महिलेकडे सोपविण्यात यावे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रारंभ १५ आॅगस्ट २००७ ला करण्यात आला. आगामी १५ आॅगस्ट रोजी या मोहिमेला सात वर्ष पूर्ण होणार आहे. या मोहिमेला गावोगावी उदंड प्रतिसाद मिळत आहे. यातून अनेक गावातील तंटे सोडविण्यात आले. मात्र यात महिलांचा सहभाग कमी असल्याचे दिसून येते. प्रत्येक क्षेत्रात आज महिला अग्रेसर आहे. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून स्वत:च्या कर्तृत्त्वावर महीलांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. याला ही समिती अपवाद ठरत आहे. शासनाने ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून संधी दिली आहे. यामुळे महिला अध्यक्षपदाच्या निवडीकरीता तरतूदीची गरज आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एका गावात याचा समावेश केल्यास भविष्यात ही संख्या वाढू शकते. आज ग्रामीण राजकारणात सुद्धा महिलांच्या सक्रीय सहभाग आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, जि. प. सदस्य, प. सं. सदस्य तर गावपातळीवर सरपंच अशा विविध ठिकाणी महिला सक्रीय आहे. मात्र ग्रामसभेत महिलेची अध्यक्षपदी निवड का केली जात नाही, हा देखील प्रश्न आहे.याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गावपातळीवर ही योजना आणखी सकारात्मक कशी यशस्वी होईल याकरिता महिला अध्यक्षाचा विचार करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. मागील वर्षी अध्यक्षाची निवड करताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसणारा व्यक्ती निवडल्या जावा. त्याचप्रकारे तो स्वत: निर्व्यसनी असणारा असावा. वादापासून अलिप्त असणाऱ्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड केली जावी, अशी नियमावली काढण्यात आली. त्यानुसार गावागावात नियम लागु करण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव देखील आहे. त्यामुळे काही गावातील तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष हेच स्वत: अवैध धंद्याचे जनक आहे. असे असतानाही त्याची निवड केली जात आहे. ही बाब मोहिमेच्या उद्देशाला काळीमा फासणारी ठरत आहे. गावातील नवीन पिढीसमोर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाकडून वाद करणे, दारू पिणे हे प्रकार घडत असेल तर यातून काय संदेश जाईल. अवैध धंद्याला आळा घालण्यात यामुळे योजनेला किती यश मिळणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तुलनेने महिलांमधे व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी आहे. यामुळे या समितीचे महत्त्वाचे पद महिलेकडे सोपविण्याची मागणी आहे.(वार्ताहर)