शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

जीवित हानी टाळण्यासाठी हेल्मेट वापरणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:59 IST

गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देदत्तात्रय गुरव : २३ एप्रिलपासून सक्ती नव्हे, सुरक्षित प्रवासाच्या दिशेने पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे २३ एप्रिलपासून प्रत्येक दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.गुरव पुढे म्हणाले, ‘सडक सुरक्षा...जीवन की सुरक्षा’ या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून रस्ता सुरक्षा पंधरवाडा २३ एप्रिल पासून राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्याच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सोमवारी सकाळी ७.३० वाजता शहरातून हेल्मेट बाबत जनजागृती करणारी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहे. सोमवार २३ रोजीपासून दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येकाला न्यायालयाच्या निर्देशानुसार हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य आहे. २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत प्रारंभी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हेल्मेटचा वापर न करताना आढळून आलेल्या व्यक्तींना सुचना पत्र देणार आहे. परंतु, सुचना पत्र देऊनही त्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर न केल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ७ मे पासून जो व्यक्ती हेल्मेटचा वापर न करताना आढळून येईल त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. २३ एप्रिलपासून हेल्मेट वापराबाबत वाहतूक नियंत्रण शाखा सक्ती नव्हे तर सुरक्षीत प्रवासाच्या दिशेने एक पाऊल टाकत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.शासकीय कार्यालयांशी पत्र व्यवहार१ एप्रिलपासून दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हेल्मेटचा वापर करावा या हेतूने पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात विविध शासकीय कार्यालयातील प्रमुखांशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे वकिलांनीही हेल्मेटचा वापर करावा या उद्देशाने न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार करण्यात आला असल्याचे गुरव यांनी सांगितले.