शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

जीवित हानी टाळण्यासाठी हेल्मेट वापरणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:59 IST

गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देदत्तात्रय गुरव : २३ एप्रिलपासून सक्ती नव्हे, सुरक्षित प्रवासाच्या दिशेने पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४०० व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी एकानेही सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे २३ एप्रिलपासून प्रत्येक दुचाकी चालकाने वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.गुरव पुढे म्हणाले, ‘सडक सुरक्षा...जीवन की सुरक्षा’ या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून रस्ता सुरक्षा पंधरवाडा २३ एप्रिल पासून राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्याच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सोमवारी सकाळी ७.३० वाजता शहरातून हेल्मेट बाबत जनजागृती करणारी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहे. सोमवार २३ रोजीपासून दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येकाला न्यायालयाच्या निर्देशानुसार हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य आहे. २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत प्रारंभी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हेल्मेटचा वापर न करताना आढळून आलेल्या व्यक्तींना सुचना पत्र देणार आहे. परंतु, सुचना पत्र देऊनही त्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर न केल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ७ मे पासून जो व्यक्ती हेल्मेटचा वापर न करताना आढळून येईल त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. २३ एप्रिलपासून हेल्मेट वापराबाबत वाहतूक नियंत्रण शाखा सक्ती नव्हे तर सुरक्षीत प्रवासाच्या दिशेने एक पाऊल टाकत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.शासकीय कार्यालयांशी पत्र व्यवहार१ एप्रिलपासून दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हेल्मेटचा वापर करावा या हेतूने पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात विविध शासकीय कार्यालयातील प्रमुखांशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे वकिलांनीही हेल्मेटचा वापर करावा या उद्देशाने न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही पत्र व्यवहार करण्यात आला असल्याचे गुरव यांनी सांगितले.