शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

समग्र विकासासाठी समाजवादी विचारांची गरज

By admin | Updated: July 25, 2015 02:21 IST

विविध जाती, धर्म, वर्ण पंथाचे स्थान असलेल्या भारत देशात विविध भौगोलिक व पर्यावरणीय स्थिती आहेत.

वर्धा : विविध जाती, धर्म, वर्ण पंथाचे स्थान असलेल्या भारत देशात विविध भौगोलिक व पर्यावरणीय स्थिती आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक समग्र विकासाच्या समाजवादी विचारांची वाढ झाल्याशिवाय देशाचा समग्र विकास होणार नाही, असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी व्यक्ता केले किसान अधिकार अभियानच्या वतीने आयोजित बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अभियानचे अध्यक्ष सुदाम पवार तर अतिथी म्हणून मुख्य प्रेरक अरविंद काकडे, उपस्थित होते. मार्गदर्शन करताना सुराणा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर राष्ट्र निर्माणाचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. देशात गरिबी, अस्पृश्यता, जातीयता, धर्मांधता, अशिक्षितपणा, जमीनदारी प्रथा मोठ्या प्रमाणात होत्या. प्रत्येकाच्या हाताला काम, सर्वांना शिक्षण, जमिनीचे समान वाटप, शेती व उद्योगांचा विकास, सिंचन प्रकल्पांची निर्मिती हे आव्हान तत्कालीन प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात देशाने स्वीकारले होते. जवाहरलाल नेहरूचे भारताच्या निर्मितीसाठी असलेले योगदान आपण विसरू शकत नाही. शेतीच्या विकासासोबतच उद्योगांच्या विकासाला चालना देणे त्यावेळी आवश्यक होते.ग्राम विकासासाठी सिंचन प्रकल्पांचा विकास, शेतीसाठी कर्जाची उपलब्धता व सामाजिक विकासाचे पंचवार्षिक नियोजन नेहरू यांनी केले. जमीनदारी नष्ट करण्यासाठी घटनेत कलम नऊमध्ये तरतूदही त्यांनी करवून घेतली.पुढील काळात आपल्याला निवडणूक सुधारणा, प्रमाणशीर, प्रतिनिधित्व, समग्र विकासाचे धोरण, सामाजिक समता, जागतिकीकरणाला विरोध व सामाजिक सहकारी तत्वांच्या विकासाच्या आधारे योजना व धोरण आखूनच देशाचा विकास करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. काकडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ते म्हणाले, शेतकरी व असंघटीत क्षेत्रातील नागरिकांवर वाढत असलेले अन्याय व शोषण भीषण आहे. धर्मनिरपेक्ष विचारांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असून न्याय व्यवस्था वेशीला टांगून धर्माध, भ्रष्टाचार, गुंडागर्दी, चोऱ्या व बलात्कार करणाऱ्यांना सध्या वाव मिळत आहे. शासन व्यवस्था अन्याचाच्या बाजूने झुकलेली आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात सामाजिक चेतना जागविण्याची व लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी संघर्षाची गरज असल्याचे ते म्हणाले. पवार यांनीही हक्कासाठी संघर्ष करणाची गरज व्यक्त केली. शेतकरी वर्गाची स्थिती सध्या खूप नाजूक आहे. शासनाकडून शेतमालाला भाव न मिळणे व निसर्गाचा बेभरवशीपणा यामुळे शेतकरी हिताची भूमिका शासनाने घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीत जगदीश चरडे, बाबाराव ठाकरे, मंदा ठाकरे, किरण राऊत, मंगेश शेंडे, ज्ञानेश्वर ढगे, पांडूरंग डहाके, भाऊराव काकडे, विनायक तेलरांधे, गोविंदा पेटकर, प्रमोद नरसेकर, दुर्गाप्रसाद मेहेरे, सुनील सावध, किशोर जगताप, राजेश्वर ताजणे, मयुर राऊत, अमर काकडे उपस्थिती होते.(शहर प्रतिनिधी)