शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

स्वयंरोजगारासाठी अंगी कौशल्य गुण गरजेचा

By admin | Updated: February 7, 2017 01:07 IST

केवळ पदवी प्राप्त करून रोजगाराच्या संधी मिळत नाही. यासाठी स्वत:मध्ये कौशल्य गुण आवश्यक आहे. ज्यांच्यात कौशल्य गुण आहे.

शैलेश नवाल : वर्धेत रोजगार मेळावावर्धा : केवळ पदवी प्राप्त करून रोजगाराच्या संधी मिळत नाही. यासाठी स्वत:मध्ये कौशल्य गुण आवश्यक आहे. ज्यांच्यात कौशल्य गुण आहे. त्यांना रोजगाराची संधी हमखास उपलब्ध होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.स्थानिक विकास भवन येथे दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषद आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प.उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, सभापती शबाना परविन, श्रेया देशमुख, नागपूरचे कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील काळबांडे, न. प. च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, जिल्हा अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक वामन कोहाड, अशोक गवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल पुढे म्हणाले, दुसऱ्याची तुलना न करता मनुष्याने जीवनामध्ये ‘मला काय करायचे आहे’ हे ध्येय ठेवून काम केल्यास यश प्राप्त होऊन नावलौकिक होण्यास मदत होईल. शेती तंत्र यासारखे नवनवीन कौशल्य आत्मसात करावे. असे झाल्यास शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करण्यास मदत होऊन आर्थिक लाभ प्राप्त करता येईल, असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी देशात ६५ टक्के तरुण असून या त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा केवळ लाभ न घेता प्रशिक्षितांनी स्वत:चा उद्योग उभारावा यासाठी बॅँकेमार्फत मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले. मार्गदर्शन करताना वामन कोहाड यांनी मुद्रा बॅँक योजना व कॅशलेस व्यवहार या विषयी मार्गदर्शन केले.