शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

स्वयंरोजगारासाठी अंगी कौशल्य गुण गरजेचा

By admin | Updated: February 7, 2017 01:07 IST

केवळ पदवी प्राप्त करून रोजगाराच्या संधी मिळत नाही. यासाठी स्वत:मध्ये कौशल्य गुण आवश्यक आहे. ज्यांच्यात कौशल्य गुण आहे.

शैलेश नवाल : वर्धेत रोजगार मेळावावर्धा : केवळ पदवी प्राप्त करून रोजगाराच्या संधी मिळत नाही. यासाठी स्वत:मध्ये कौशल्य गुण आवश्यक आहे. ज्यांच्यात कौशल्य गुण आहे. त्यांना रोजगाराची संधी हमखास उपलब्ध होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.स्थानिक विकास भवन येथे दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषद आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प.उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, सभापती शबाना परविन, श्रेया देशमुख, नागपूरचे कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील काळबांडे, न. प. च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, जिल्हा अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक वामन कोहाड, अशोक गवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल पुढे म्हणाले, दुसऱ्याची तुलना न करता मनुष्याने जीवनामध्ये ‘मला काय करायचे आहे’ हे ध्येय ठेवून काम केल्यास यश प्राप्त होऊन नावलौकिक होण्यास मदत होईल. शेती तंत्र यासारखे नवनवीन कौशल्य आत्मसात करावे. असे झाल्यास शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करण्यास मदत होऊन आर्थिक लाभ प्राप्त करता येईल, असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी देशात ६५ टक्के तरुण असून या त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा केवळ लाभ न घेता प्रशिक्षितांनी स्वत:चा उद्योग उभारावा यासाठी बॅँकेमार्फत मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले. मार्गदर्शन करताना वामन कोहाड यांनी मुद्रा बॅँक योजना व कॅशलेस व्यवहार या विषयी मार्गदर्शन केले.