शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

महिला बचत गटांना मार्केटिंग तंत्रज्ञानाची आवश्यकता

By admin | Updated: March 12, 2016 02:23 IST

आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण उत्पादित मालाला अधिक मागणी आहे. बाजारपेठेची ती गरज झाली आहे.

चित्रा रणनवरे : तीन दिवसीय वर्धिनी महोत्सवाचा थाटात शुभारंभवर्धा : आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण उत्पादित मालाला अधिक मागणी आहे. बाजारपेठेची ती गरज झाली आहे. त्यामुळे महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादित माल तयार करून काळानुरुप मार्केटिंगचे बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून जागतिक बाजारपेठेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या संयुक्तपणे न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर आयोजित तीन दिवसीय वर्धिनी महोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती चेतना मानमोडे, सदस्य वीरेंद्र उर्फ राणा रणनवरे, सुनीता ढवळे, मीना वाळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोदकुमार पवार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम. खळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांची उपस्थिती होती. चित्रा रणनवरे यांनी महिला बचत गटाची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात येत असून या उपक्रमांचा बचत गटांनी लाभ घ्यावा. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध महिलांनी जिल्ह्यात यश मिळविलेले आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रांचा वापर आजच्या बचतगटांनी करावा, विपणन तंत्रांचा अवलंब करावा, असेही त्या म्हणाल्या. लोकांना आवश्यक असणाऱ्या लोकोपयोगी वस्तुंची निर्मिती करून बाजारपेठ काबीज करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जि.प. उपाध्यक्ष कांबळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध असून महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. तसेच कर्जाच्या व्याजाची रक्कम शासन भरेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रस्ताव सादर करण्यात यावा. जिल्ह्यातील महिलांनी बचत गट चळवळ अधिक सक्षमपणे पुढे नेली असून त्यांचा माल गुणवत्तापूर्ण आहे; परंतु त्याला मार्केटिंगची जोड मिळाल्यास जागतिक बाजारपेठेत मालाची मागणी वाढेल त्यासाठी प्रशिक्षण केंद्र आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महिलांनी गुणवत्तापूर्ण दर्जेदार उत्पादनाची निर्मिती करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असेही कांबळे यावेळी म्हणाले. यावेळी सभापती चेतना मानमोडे, सुनीता यांनीही वर्धिनी महोत्सवाबाबत विचार मांडले. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच कवठा रेल्वे येथील स्थानिक संसाधन व्यक्ती वंदना महल्ले यांनीही मनोगत व्यक्त केले. वैयक्तिक शौचालय वापरणाऱ्या महिला बचत गटांच्या निर्मलग्राम महिला संघाचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सावंगी मेघेच्या एकता, नाचणगावच्या संगिनी, वाघोलीच्या दीप, अांतरगावच्या सृष्टी महिला संघाचा समावेश होता. चित्रा रणनवरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक पवार यांनी केले. संचालन सचिन घोडे यांनी केले तर आभार अविनाश गोहड यांनी मानले. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी जिल्हाभरातून दाखल झालेल्या ६२ दालनांमधील विविध वस्तूंची पाहणी केली.(प्रतिनिधी)