शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वृक्ष लागवड करून वनक्षेत्र हिरवेगार करणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:54 IST

वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पृथ्वीवरील वातावरणातील बदलाचा अंदाज काही वर्षांपूर्वीच तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, सध्या झपाट्यानेच पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत. हा बदल पाहता जागातील ४० टक्के शहरात २०४० पर्यंत पाणी राहणार नाही. फिलीपिन्स या देशात विद्यार्थ्यांना किमान दहा रोपटे लावून ती जगवून न दाखविल्याशिवाय त्यांना पदवी मिळत नाही.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : मौजा जंगलापूर शिवारात वनमहोत्सवाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पृथ्वीवरील वातावरणातील बदलाचा अंदाज काही वर्षांपूर्वीच तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, सध्या झपाट्यानेच पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत. हा बदल पाहता जागातील ४० टक्के शहरात २०४० पर्यंत पाणी राहणार नाही. फिलीपिन्स या देशात विद्यार्थ्यांना किमान दहा रोपटे लावून ती जगवून न दाखविल्याशिवाय त्यांना पदवी मिळत नाही. भविष्यात चांगले दिवस बघावयाचे असेल तर प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. शिवाय वृक्ष लागवड करून वनक्षेत्र हिरवेगार केले पाहिजे. ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.वनविभागातर्फे वनमहोत्सवाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम नजीकच्या जंगलापूर परिसरात सोमवारी पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यापीठावर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपवनसरंक्षक सुनील शर्मा, तहसीलदार महेंद्र सोनवने, पं.स.सभापती जयश्री खोडे, जि. प. सदस्य विनोद लाखे, सेलूच्या नगराध्यक्षा शारदा माहुरे, महाबळा जंगलापूरच्या सरपंच जोत्सना पोहाणे, केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, शैलेन्द्र दप्तरी, अनिल देवतारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, वृक्ष लागवडीमध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे. वृक्ष लागवड हा उपक्रम केवळ शासकीय न राहता तो एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जमिनीतील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यावर मात करण्याकरिता वृक्ष लागवड करणे आणि वृक्षाचे संगोपन करणे हे शासनासोबतच प्रत्येक नागरिकांची तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. भविष्यातील संकट लक्षात घेता प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत ही जबाबदारी स्विकारली पाहिजे, असे स्पष्ट केले. सदर कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून वृक्षारोपण केले. या उपक्रमात इंदिरा हायस्कूल महाबळा, यशवंत विद्यालय सेलू, दीपचंद विद्यालय सेलू, न्यू आर्टस् महाविद्यालय वर्धा, विद्याभारती कॉलेज सेलू, अभिनव कृषी तंत्र निकेतन कॉलेज हिंगणी आदी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदिप पेटारे यांनी केले.जिल्हाधिकाऱ्यांनी लावले रोपटेकार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.८७.५२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट -सुनील शर्मायंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यात ८७.५२ लाख वृक्षलावडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर आजपासून या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. शिवाय वनमहोत्सवाच्या काळात वृक्षलागवड झाल्यानंतर त्याचे आॅडीट होणार असल्याचे याप्रसंगी उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी सांगितले.