शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड करून वनक्षेत्र हिरवेगार करणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:54 IST

वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पृथ्वीवरील वातावरणातील बदलाचा अंदाज काही वर्षांपूर्वीच तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, सध्या झपाट्यानेच पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत. हा बदल पाहता जागातील ४० टक्के शहरात २०४० पर्यंत पाणी राहणार नाही. फिलीपिन्स या देशात विद्यार्थ्यांना किमान दहा रोपटे लावून ती जगवून न दाखविल्याशिवाय त्यांना पदवी मिळत नाही.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : मौजा जंगलापूर शिवारात वनमहोत्सवाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पृथ्वीवरील वातावरणातील बदलाचा अंदाज काही वर्षांपूर्वीच तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, सध्या झपाट्यानेच पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत. हा बदल पाहता जागातील ४० टक्के शहरात २०४० पर्यंत पाणी राहणार नाही. फिलीपिन्स या देशात विद्यार्थ्यांना किमान दहा रोपटे लावून ती जगवून न दाखविल्याशिवाय त्यांना पदवी मिळत नाही. भविष्यात चांगले दिवस बघावयाचे असेल तर प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. शिवाय वृक्ष लागवड करून वनक्षेत्र हिरवेगार केले पाहिजे. ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.वनविभागातर्फे वनमहोत्सवाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम नजीकच्या जंगलापूर परिसरात सोमवारी पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यापीठावर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपवनसरंक्षक सुनील शर्मा, तहसीलदार महेंद्र सोनवने, पं.स.सभापती जयश्री खोडे, जि. प. सदस्य विनोद लाखे, सेलूच्या नगराध्यक्षा शारदा माहुरे, महाबळा जंगलापूरच्या सरपंच जोत्सना पोहाणे, केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, शैलेन्द्र दप्तरी, अनिल देवतारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, वृक्ष लागवडीमध्ये लोकसहभाग महत्वाचा आहे. वृक्ष लागवड हा उपक्रम केवळ शासकीय न राहता तो एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जमिनीतील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यावर मात करण्याकरिता वृक्ष लागवड करणे आणि वृक्षाचे संगोपन करणे हे शासनासोबतच प्रत्येक नागरिकांची तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. भविष्यातील संकट लक्षात घेता प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत ही जबाबदारी स्विकारली पाहिजे, असे स्पष्ट केले. सदर कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून वृक्षारोपण केले. या उपक्रमात इंदिरा हायस्कूल महाबळा, यशवंत विद्यालय सेलू, दीपचंद विद्यालय सेलू, न्यू आर्टस् महाविद्यालय वर्धा, विद्याभारती कॉलेज सेलू, अभिनव कृषी तंत्र निकेतन कॉलेज हिंगणी आदी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संदिप पेटारे यांनी केले.जिल्हाधिकाऱ्यांनी लावले रोपटेकार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.८७.५२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट -सुनील शर्मायंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यात ८७.५२ लाख वृक्षलावडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर आजपासून या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. शिवाय वनमहोत्सवाच्या काळात वृक्षलागवड झाल्यानंतर त्याचे आॅडीट होणार असल्याचे याप्रसंगी उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी सांगितले.