शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

ंदर्जेदार उत्पादनाची परंपरा निर्माण करण्याची गरज

By admin | Updated: May 27, 2014 01:03 IST

नैसर्गिक शेती उत्पादनांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. शेतकर्‍यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन घेवून थेट ग्राहकांपर्यंत पोहचावे, असे आवाहन करताना

वर्धा : नैसर्गिक शेती उत्पादनांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. शेतकर्‍यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन घेवून थेट ग्राहकांपर्यंत पोहचावे, असे आवाहन करताना दर्जेदार उत्पादनाची परंपरा जिल्ह्याने निर्माण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी सोमवारी येथे केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सोना बोलत होते. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या महोत्सवात होणार असून २८ मे पर्यंत वर्धेकरांना धान्य तसेच शेतमाल माफक दरात उपलब्ध होणार आहे. धान्य महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सेंद्रीय उत्पादनाची मागणी व भाविष्यातील बाजारपेठ व शेतकर्‍यांनी उत्पादन घेण्याचे आवाहन करतान सोना म्हणाले की, कमीत कमी प्रक्रिया झालेल्या धान्याची जगात मागणी आहे. जिल्ह्याने दर्जेदार उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण करावी तसेच विविध उत्पादनावर प्रक्रिया करणारे कुटीर उद्योग सुरू करावे. प्रारंभी जिल्ह्यातील विविध प्रगतीशील शेतकरी, महिला बचतगट, कुटीर उद्योग आदींनी गहू, ज्वारी, शेंगदाना, पपई, चिकू, आंबा, हळद आदी विविध उत्पादने या धान्य महोत्सवात वर्धेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. शेतकर्‍यांनी तयार केलेली तुरीची दाळ ग्राहकांसाठी अत्यंत अल्प दरात या महोत्सवाचे माध्यमातून उपलब्ध झाली आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी धान्य महोत्सवाचे उद्घाटन केले व शेतकर्‍यांनी धान्य महोत्सवात आणलेल्या विविध उत्पादनांची माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बºहाटे यांनी स्वागत करून धान्य महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी देवळी येथील सतीश दाणी यांचा ऋषीकेश या मुलाला दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. यावेळी प्रकल्प संचालक दीपक पटे, जिल्हा कृषी अधिकारी आर.के. गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एम. शिंदे, अरुण पलसाने, हुमने तंत्र अधिकारी चनशेट्टी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कडू यांनी केले तर आभार रमेश शिंदे यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)