शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ंदर्जेदार उत्पादनाची परंपरा निर्माण करण्याची गरज

By admin | Updated: May 27, 2014 01:03 IST

नैसर्गिक शेती उत्पादनांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. शेतकर्‍यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन घेवून थेट ग्राहकांपर्यंत पोहचावे, असे आवाहन करताना

वर्धा : नैसर्गिक शेती उत्पादनांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. शेतकर्‍यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन घेवून थेट ग्राहकांपर्यंत पोहचावे, असे आवाहन करताना दर्जेदार उत्पादनाची परंपरा जिल्ह्याने निर्माण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी सोमवारी येथे केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सोना बोलत होते. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या महोत्सवात होणार असून २८ मे पर्यंत वर्धेकरांना धान्य तसेच शेतमाल माफक दरात उपलब्ध होणार आहे. धान्य महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सेंद्रीय उत्पादनाची मागणी व भाविष्यातील बाजारपेठ व शेतकर्‍यांनी उत्पादन घेण्याचे आवाहन करतान सोना म्हणाले की, कमीत कमी प्रक्रिया झालेल्या धान्याची जगात मागणी आहे. जिल्ह्याने दर्जेदार उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण करावी तसेच विविध उत्पादनावर प्रक्रिया करणारे कुटीर उद्योग सुरू करावे. प्रारंभी जिल्ह्यातील विविध प्रगतीशील शेतकरी, महिला बचतगट, कुटीर उद्योग आदींनी गहू, ज्वारी, शेंगदाना, पपई, चिकू, आंबा, हळद आदी विविध उत्पादने या धान्य महोत्सवात वर्धेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. शेतकर्‍यांनी तयार केलेली तुरीची दाळ ग्राहकांसाठी अत्यंत अल्प दरात या महोत्सवाचे माध्यमातून उपलब्ध झाली आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी धान्य महोत्सवाचे उद्घाटन केले व शेतकर्‍यांनी धान्य महोत्सवात आणलेल्या विविध उत्पादनांची माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बºहाटे यांनी स्वागत करून धान्य महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी देवळी येथील सतीश दाणी यांचा ऋषीकेश या मुलाला दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. यावेळी प्रकल्प संचालक दीपक पटे, जिल्हा कृषी अधिकारी आर.के. गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एम. शिंदे, अरुण पलसाने, हुमने तंत्र अधिकारी चनशेट्टी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कडू यांनी केले तर आभार रमेश शिंदे यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)