शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

लीज नूतनीकरण व हस्तांतरण प्रक्रियेसाठी शिबिरांची गरज

By admin | Updated: February 21, 2016 01:31 IST

शहरातील अर्ध्याधिक भागात असलेल्या लीजधारकांच्या हस्तांतरण व नूतनीकरणाचा मार्ग १० वर्षांनी मोकळा झाला.

१० वर्षांनी ५ हजार ५०० व्यवहार सुरूवर्धा : शहरातील अर्ध्याधिक भागात असलेल्या लीजधारकांच्या हस्तांतरण व नूतनीकरणाचा मार्ग १० वर्षांनी मोकळा झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी तब्बल ५ हजार ५०० लीज जमीनधारक आता व्यवहार करू शकतील. ही प्रक्रिया अधिक सोपी व्हावी म्हणून प्रत्येक प्रभागात लीज नूतनीकरण, हस्तांतरण प्रक्रियेसाठी शिबिरांची मागणी होत आहे. १० वर्षांपासून शहरातील लीज धारकांच्या हस्तांतरण, नूतनीकरणाचा प्रश्न अधांतरी होता. तक्रारी करूनही मार्ग निघत नव्हता. १० वर्षांत आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबेसह अन्य नागरिकांनी एकनाथ खोब्रागडे, जयश्री भोज, अनुपकुमार यादव, एन. नवीन सोना या जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. नवीन परिपत्रक काढून नागरिकांना न्याय देण्याची मागणी लोकशाही दिनात केली; पण कुणीही हा विषय गंभीरतेने घेतला नाही. या प्रश्नाची विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. त्यांनी मध्यस्थी करीत गंभीरता शासनाच्या निदर्शनास आणून दिली. शिवाय कठोर भूमिकेमुळे अनेकांचे हस्तांतरण व नूतनीकरण रखडले. परिणामी, महसूल बुडत असल्याचे निक्षून सांगितले. यावरून शासनाने सकारात्मक पाऊल उचलत नवीन अध्यादेश जारी केला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व लीजधारकांना नूतनीकरण करण्याचे आवाहन केले. लीज जमिनीचे हस्तांतरण व नूतनीकरणाचा प्रश्न दहा वर्षांपासून रेंगाळला होता. शहरातील ४० पैकी २० वॉर्डात लीजधारक आहे. यामुळे प्रत्येक चार वॉर्ड मिळून पाच ठिकाणी शिबिरांचे आयोजन करावे. यातून एका महिन्यात प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल, अशी मागणी आहे.(कार्यालय प्रतिनिधी)