शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ होतेय कडवट; चौकशीचे धडकले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:11 IST

शहरात अमृत योजनेंतर्गत विविध कामांसह हरित योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांची विश्वेश्वरय्या नॅशनल इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलोजी ( व्हीएनआयटी) नागपूर या संस्थेमार्फत सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करीत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा,

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले पत्र : पंकज भोयर यांच्या तक्रारीवरुन घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात अमृत योजनेंतर्गत विविध कामांसह हरित योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांची विश्वेश्वरय्या नॅशनल इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलोजी ( व्हीएनआयटी) नागपूर या संस्थेमार्फत सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करीत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे शहरासाठी ‘अमृत’ ठरणारी योजना नियोजनाअभावी ‘कडवट’ होताना दिसून येत आहे.अमृत योजनेंतर्गत सुरु असलेल्या भूमिगत पाणी पुरवठा योजना, भूमिगत मलनिस्सारण योजना तसेच हरित योजनेंतर्गत उद्यानांची कामे सुरु आहेत. या कामांबाबत स्थानिक नागरिक, नगरसेवक व विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्याने या सर्व कामांची सखोल चौकशी करुन संबंधित दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राव्दारे केली होती. तसेच या सर्व कामांची पाहणी करीत आमदार भोयर यांनी जोपर्यंत फोडलेल्या रस्त्याची दुरुस्ती होणार नाही; तोपर्यंत योजनेतील पुढील काम सुरु करु नये, अशा सूचना देत काम बंद पाडले आहे.याबाबत आयुक्त संजीव कुमार आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनाही या कामांतील नियोजनशुन्यता लक्षात आणून दिली. परिणामी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून या योजनेची व्हीएनआयटी नागपूर मार्फत चौकशी करुन कार्यवाही करावी तसेच एक महिन्याच्या आत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले आहे. त्यामुळे आता या योजनेच्या चौकशीला गती मिळणार असून काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आमदारांनी या तीन योजनेतील विविध मुद्यांकडे वेधले लक्षभूमिगत पाणी पुरवठाअधिकाऱ्यांकडून सर्व्हे बरोबर केला नसून जुनी पाईपलाईन व नवीन पाईपलाईन याचा कुठेही ताळमेळ जुळत नाही. पाणी पुरवठा योजनेची जवळपास सहा कि.मी.पाईपलाईन शिल्लक राहिली आहे. जवळपास ६० टक्के लोकांना नळाच्या नवीन जोडण्या मिळाल्या नाही. कंत्राटदाराने मुख्य काम आटोपते घेत किरकोळ कामाकडे दुर्लक्ष केले आहे. मनुष्यबळ जास्त लागत असल्याने खोदलेले रस्ते, गट्टू व नालीचे काम अर्धवट सोडले आहे. नगर पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कामात कुठलाही ताळमेळ नसल्याने कंत्राटदाराची मनमर्जी सुरु आहेत. कामांवर देखरेख ठेवण्याकरिता अधिकारी उपस्थित राहत नाही.भूमिगत मलनिस्सारणसुरुवातीला ३ मीटर ते शेवटी ८ मीटर खोदकाम करायचे असून यानुसार कुठेही काम केलेले नाही. बनविलेल्या चेंबरचा दर्जा राखल्या जात नाही. या योजनेकरिता मजबूत रस्ते मधोमध फोडले आणि आडवेही फोडले जात आहे; पण दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील ९० टक्के नागरिकांचे शौचालय मागच्या बाजुने असून पाईप समोरुन टाकण्यात येत आहे. त्यामुळे शौचालय खाली आणि पाईप वर आल्यानेही अडचण वाढली आहे. या योजनेची सुरुवात करताना लोकप्रतिनिधींसह नागरिकांना विचारात घेऊन जनजागृती केलेली नाही.हरित योजनाया योजनेतून सुरु असलेल्या कामांची जागा काळ्या मातीची आणि भरपूर पाण्याची असल्याने केवळ पाच ते सहा फुटावरच कॉलम घेतले आहे. काही कामांना अल्पावधीतच तडे गेलेले दिसून येत आहे. कामाच्या प्रगतीची व दर्जाची कुठलीही शहानिशा न करता एकाच महिन्यात मोठी देयक कंत्राटदाराला अदा केली जात आहे. त्यामुळे या योजनेत अधिकारी व कंत्राटदार दोषी असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर