शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

राकाँ इव्हीएमसह मनुस्मृतीचे दहन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:20 IST

देशातील सत्तारूढ सरकारकडून संविधान बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी व संविधानांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देफौजिया खान :१७ ला नागपुरात संविधान बचाव आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सत्तारूढ सरकारकडून संविधान बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी व संविधानांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात प्रतिकात्मक इव्हीएम मशीन तसेच मनुस्मृतीचे दहन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष फौजिया खान यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.खान पुढे म्हणाल्या, ज्या संविधानाच्या आधारावर देशाची लोकशाही बळकट व सर्वसमावेशक आहे. त्या बदल करून सत्तारूढ सरकार समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने १७ जुलैला नागपूर येथे संविधान बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात दिल्ली येथून संविधान बचाव आंदोलनाला सुरूवात झाली. त्यानंतर मुंबई येथे सुध्दा हे आंदोलन करण्यात आले. विभागीयस्तरावर पहिले संविधान बचाव आंदोलन नागपूर येथे करण्यात येत आहे. शरद पवार यांच्यासह राकॉचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.माजी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या की, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लक्ष केंद्रीत करून आहे. यापूर्वी हल्लाबोल यात्रा विदर्भातून काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याची जाणीव वैदर्भीय शेतकºयांना आहेच, असेही त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला माजी आमदार सुरेश देशमुख, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, जिल्हाध्यक्ष शरयु वांदीले, किशोर माथनकर उपस्थित होते.विचारधारेवर नव्हे विरोधकांवर हल्लालोकशाही प्रधान देशात प्रत्येकाला समान अधिकार आहेत. मात्र, केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारकडून त्या अधिकारांचे हनन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या जनहित विरोधी धोरण अवलंबुन विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विचारधारेचा विरोध मान्य आहे. मात्र, त्यांच्यावर हल्ले करून संपविणे हा प्रकार निंदनीयच असल्याची घनाघाती टिकाही यावेळी सरकारवर फौजिया खान यांनी केली.