शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

एनसीसी प्रशिक्षणातून सुजाण नागरिक घडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समय सूचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची देशाला नितांत गरज ...

ठळक मुद्देरामदास तडस : छात्र सेनेचा स्थापनादिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समय सूचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची देशाला नितांत गरज आहे. नवा भारत घडविण्यासाठी देशप्रेमाने भारावलेली तरुणाई तयार होणे काळाची गरज आहे. सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेम निर्माण करणारे प्रशिक्षण देण्याची गरज असून हे प्रशिक्षण एन.सी.सी. मधुन मिळते. यातून सुजाण नागरिक घडतात, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.राष्ट्रीय छात्र सेनेच्या ६९ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते छात्रसैनिकांना मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. रामदास तडस, उद्घाटक प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय तर प्रमुख अतिथी २१ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल पद्मभान जोशी, प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल अमिताभ सिंह, माजी सैनिक वैद्यकीय सेवा विभागाचे प्रमुख मेजर हरजिंदर सिंग, मोहन अग्रवाल, इमरान राही, अमोल वनकर, मुरलीधर बेलखोडे, माजी एन.सी.सी. अधिकारी मारोतराव रेवतकर व विजय धाबे, कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात परेड संचलनाने झाली. परेडचे नेतृत्व सिनिअर अंडर आॅफीसर स्वप्नील शिंगाडे यांनी केले. प्लॅटूनचे नेतृत्व अंडर आॅफीसर धिरज कामडी, सार्जेट अपूर्वा कठाणे, कॅडेट राजेश सुरजुसे यांनी केले. बेस्ट कॅडेट कमांडर पुरस्काराने गौरविण्यात आले. बॉम्ब हल्ल्याचे प्रात्यक्षिक आकर्षण ठरले. देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. माजी एन.सी.सी. अधिकारी मारोतराव रेवतकर व विजय धाबे यांना एन.सी.सी. मधील प्रदीर्घ सेवेकरिता स्मृतीचिन्ह देवून सन्मानित केले.कर्नल जोशी म्हणाले, युवापिढीत प्रचंड क्षमता असून त्यांच्या शक्तीचा सदुपयोग झाल्यास नवा भारत घडू शकतो. या दृष्टीकोनातून राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्य प्रशसंनिय आहे. मोहन अग्रवाल यांनी भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी युवक-युवतींनी समोर येण्याचे आवाहन केले. कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर म्हणाले, राष्ट्रीय छात्र सेनेचा मुख्य उद्देश सैनिकी प्रशिक्षणातून कृतीशिल व आदर्श नागरिक घडवून त्यांच्यात शिस्त, जागरुकता, निर्भयता, राष्ट्रभक्ती व सामाजिक जाण निर्माण केली जाते.कार्यक्रमाचे संचालन सार्जेट कोमल गोमासे यांनी केले तर आभार प्रा. सुनिल राठी यांनी मानले. यशस्वीतेकरिता रवी बकाले, पूजा गिरडकर, वैभव भोयर, अमोल तडस, पवन भोयर, एन.सी.सी. छात्रसैनिकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता हम सब भारतीय है या एन.सी.सी. गीताने करण्यात आली. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.