शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

एनसीसी प्रशिक्षणातून सुजाण नागरिक घडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समय सूचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची देशाला नितांत गरज ...

ठळक मुद्देरामदास तडस : छात्र सेनेचा स्थापनादिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समय सूचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची देशाला नितांत गरज आहे. नवा भारत घडविण्यासाठी देशप्रेमाने भारावलेली तरुणाई तयार होणे काळाची गरज आहे. सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेम निर्माण करणारे प्रशिक्षण देण्याची गरज असून हे प्रशिक्षण एन.सी.सी. मधुन मिळते. यातून सुजाण नागरिक घडतात, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.राष्ट्रीय छात्र सेनेच्या ६९ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते छात्रसैनिकांना मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. रामदास तडस, उद्घाटक प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय तर प्रमुख अतिथी २१ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल पद्मभान जोशी, प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल अमिताभ सिंह, माजी सैनिक वैद्यकीय सेवा विभागाचे प्रमुख मेजर हरजिंदर सिंग, मोहन अग्रवाल, इमरान राही, अमोल वनकर, मुरलीधर बेलखोडे, माजी एन.सी.सी. अधिकारी मारोतराव रेवतकर व विजय धाबे, कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात परेड संचलनाने झाली. परेडचे नेतृत्व सिनिअर अंडर आॅफीसर स्वप्नील शिंगाडे यांनी केले. प्लॅटूनचे नेतृत्व अंडर आॅफीसर धिरज कामडी, सार्जेट अपूर्वा कठाणे, कॅडेट राजेश सुरजुसे यांनी केले. बेस्ट कॅडेट कमांडर पुरस्काराने गौरविण्यात आले. बॉम्ब हल्ल्याचे प्रात्यक्षिक आकर्षण ठरले. देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. माजी एन.सी.सी. अधिकारी मारोतराव रेवतकर व विजय धाबे यांना एन.सी.सी. मधील प्रदीर्घ सेवेकरिता स्मृतीचिन्ह देवून सन्मानित केले.कर्नल जोशी म्हणाले, युवापिढीत प्रचंड क्षमता असून त्यांच्या शक्तीचा सदुपयोग झाल्यास नवा भारत घडू शकतो. या दृष्टीकोनातून राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्य प्रशसंनिय आहे. मोहन अग्रवाल यांनी भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी युवक-युवतींनी समोर येण्याचे आवाहन केले. कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर म्हणाले, राष्ट्रीय छात्र सेनेचा मुख्य उद्देश सैनिकी प्रशिक्षणातून कृतीशिल व आदर्श नागरिक घडवून त्यांच्यात शिस्त, जागरुकता, निर्भयता, राष्ट्रभक्ती व सामाजिक जाण निर्माण केली जाते.कार्यक्रमाचे संचालन सार्जेट कोमल गोमासे यांनी केले तर आभार प्रा. सुनिल राठी यांनी मानले. यशस्वीतेकरिता रवी बकाले, पूजा गिरडकर, वैभव भोयर, अमोल तडस, पवन भोयर, एन.सी.सी. छात्रसैनिकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता हम सब भारतीय है या एन.सी.सी. गीताने करण्यात आली. सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.