शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वितरिकेच्या पाण्यामुळे शेताला आले तळ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 06:00 IST

कोटंबा येथील शेतकऱ्यांना केळझर मुख्य वितरिकेतून रब्बीच्या पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावरून गेलेल्या उपवितरिका बुजल्यामुळे कालव्याचे पाणी वितरिकेच्या बाहेर येत कोटंबा मौजातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले व शेताला तळ्याचे स्वरूप आले. यात शेतकरी रमेश रामभाऊ घुमडे यांचे पाऊन एकर हरभरा पाण्याने खरडून निघाला.

ठळक मुद्देहरभरा पिकाचे नुकसान : पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : सिंचन विभागाच्या बांधापर्यंत जाणाऱ्या वितरिका बुजल्यामुळे केळझर मुख्य वितरीकेतून सोडलेले बोरधरणचे पाणी शेतकऱ्यांच्या हरभरा पिकात गेल्यामुळे हरबरा पीक वाहून गेले आहे. सिंचन विभागाच्या गलथान कारभारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी कोटंबा येथील शेतकरी रमेश रामभाऊ घुमडे यांनी केली आहे.कोटंबा येथील शेतकऱ्यांना केळझर मुख्य वितरिकेतून रब्बीच्या पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावरून गेलेल्या उपवितरिका बुजल्यामुळे कालव्याचे पाणी वितरिकेच्या बाहेर येत कोटंबा मौजातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले व शेताला तळ्याचे स्वरूप आले. यात शेतकरी रमेश रामभाऊ घुमडे यांचे पाऊन एकर हरभरा पाण्याने खरडून निघाला. त्यासोबतच सतीश चंपत घुमडे, गंगाधर घुमडे, मारोतराव गुणाजी गाठे, चंपत गुणाजी गाठे, महेश बबन भावरकर यांचे एक ते दोन एकरापर्यंत हरबरा पिकाचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीस सिंचन विभाग कारणीभूत असून पाटचऱ्यांची वेळोवेळी साफसफाई केल्या जात नसल्याने त्या पूर्णत: बुजून नामशेष होत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प