शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

सेवाग्राम स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरुप

By admin | Updated: April 7, 2017 01:57 IST

वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता गुरुवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन झाले.

वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन : अनुचित घटना घडू नये म्हणून तगडा बंदोबस्तवर्धा : वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता गुरुवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन झाले. आंदोलनकर्ते नेमके कुठे रेल्वे रोको करतील, याबाबत पोलीस अनभिज्ञ असल्याने सेवाग्राम रेल्वे स्थानकापासून तर आंंदोलनकर्ते जमा झालेल्या ठिकाणापर्यंत पोलीसच पोलीस दिसत होते. मात्र मोर्चा स्थळापासूनच शांततेत निघाला आणि सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोहचला. यानंतर आंदोलनही शांततेत पार पडताच पोलिसांना खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, पोलिसांचा बंदोबस्त अभूतपूर्व असाच होता. पोलिसांच्या या चोख बंदोबस्तामुळे आंदोलन होणार अथवा नाही, अशी स्थिती असताना आंदोलकांनी त्यांचा रेल्वे स्थानकावर येण्याचा मार्ग बदलविल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. बुधवारी रात्रीपासूनच आंदोलनेकर्ते वर्धेत दाखल होणे सुरू होते. यामुळे नेमके किती आंदोलक येतील याचा अंदाज पोलिसांना आला, यानुसार पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला. सेवाग्राम रेल्वे स्थानकाला सकाळपासूनच पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. या परिसरात ठिकठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी म्हणून पोलिसांच्या गाड्या सज्ज करण्यात आल्या होत्या. पोलीस कर्मचारी वेळोवेळी वरिष्ठांना आंदोलकांबाबत अपडेट देत होते. दुपारची १२ वाजताची वेळ. सूर्य डोक्यावर असून आग ओकत होता. उन्हातान्हाची तमा न बाळगता १२.३० वाजता मोर्चाच्या नियोजनस्थळापासून मोर्चाला प्रारंभ झाला. आंदोलकांची संख्या पाहुन अनेकांनी तोंडात बोटे घातली. मोर्चा निघताच कोणतीहीची अनुचित घटना घडून नयू म्हणून पोलीस पथक मोर्चाकडे वळली. सुमारे १५ मिनिटात मोर्चा सेवाग्राम रेल्वे स्थानकावर धडकला. पोलिसांची संख्या बघता रेल्वे रोको होणार वा नाही, याची उत्सुकता ताणलेली होती. मात्र आंदोलनकर्ते आणि पोलिसांनी संयम बाळगल्याने आणि आंदोलन हा लोकशाहीचा अधिकार असल्याची बाब पुढे आल्याने अखेर आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रोखली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे इंजिनावर चढून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे फलक झळकावले. मोर्चात महिलांची संख्याही लक्षणीय होती. दरम्यान, रेल्वे स्थानकावर चोहोबाजुने आंदोलनकर्ते आणि खाकी वर्दीतील पोलिसच दिसत होते. खबरदारी म्हणून राज्य पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरीगेट्स लावण्यात आले होते. रेल्वे स्थानकावर प्रवेश घेण्याकरिता असलेल्या दारावर चोख बंदोबस्त होता. परिस्थिती हाताळण्याकरिता राज्य पोलीस दलाचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल स्वत: आपल्या कर्मचाऱ्यांसह परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी जातीने हजर होते. रेल्वे रोको आंदोलनादरम्यान आंदोलकांनी तामीळनाडू एक्सप्रेस रोखली असता पोलिसांनी त्यांना रुळाच्या बाजुला केले. काही काळ आंदोलकांनी रूळावर रेंगाळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस दलासमोर त्यांनी नमते घेतले. सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर आंदोलकांनी रेल्वे रूळ सोडत ज्या मार्गे रेल्वे स्थानक गाठले त्याच मार्गे परतही निघाले घेतला. अखेर कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन सकाळपासून तैनात असलेल्या पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. (प्रतिनिधी) अश्रू धुराचे नळकांडे आंदोलनादरम्यान कुठलिही अनुचित घटना घडल्यास आंदोलकांना पांगविण्याकरिता पोलिसांच्यावतीने अश्रू धुराच्या नळकांड्याचीही व्यवस्था करण्यात आली; मात्र आंदोनही सामज्यस्याने झाल्याने त्याची पडली नाही.रायफलधारी पोलीसही तैनात या बंदोबस्तत राज्य व रेल्वे पोलीस दलाचे रायफलधारी पोलीसही तैनात होते. आंदोलन शांततेत झाल्याने त्यांचा उपयोग झाला नाही. जिल्ह्यातील तिसरे मोठे रेल रोको आंदोलनशेतकरी संघटनेने वर्धेत यापूर्वी दोनदा रेल्वे राको आंदोलन केले. यापूर्वी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्चात सन १९८२ आणि त्यानंतर १९९४-९५ मध्ये मुख्य रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको केला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यामुळे या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती.