शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गकोपात अठराशे शेतकऱ्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

सुहास घनोकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोविड-१९ विषाणूचे संकट घोंगावत असतानाच जिल्ह्यामध्ये जून महिन्यांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीचाही सामना ...

ठळक मुद्देनऊ जणांचे गेले बळी : १ हजार २० हेक्टरवरील पिकांना फटका, शासकीय मदतीचा दुष्काळ

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ विषाणूचे संकट घोंगावत असतानाच जिल्ह्यामध्ये जून महिन्यांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागत आहे. जूनपासून तर ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत आठही तालुक्यातील १ हजार ८१७ शेतकऱ्यांचे १ हजार २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण झाले असून अद्याप शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाच्या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे आटोपून ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाची लागवड केली. पण, सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. विद्युल्लतेच्या कडकडाटासह बरसणाऱ्या या पावसाने आतापर्यंत जिल्ह्यात ९ जणांचा बळी घेतला आहे. यात देवळी तालुक्यात एक, वर्ध्यात तीन, कारंजा(घाडगे) मध्ये एक, समुद्रपूर एक तर आर्वी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.यापैकी कारंजा व आर्वी तालुक्यातील प्रत्येकी एका मृताच्या कुटुंबीयाला नुकसानभरपाई मिळाली असून सहा जणांचा परिवार अद्याप मोबदल्याचा प्रतीक्षेत आहे. तसेच आर्वी येथील एकाचा पुरात वाहत गेल्याने मृत्यू झाला आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांचा परिवार उघड्यावर आला असून त्यांना तत्काळ शासकीय मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.पुराचा फटका, मिळाला दुप्पट निधीजिल्हा अधिकारी कार्यालयाकडे शेतीच्या नुकसानीची ऑगस्टपर्यंतची माहिती असून जनावरे व घरांच्या नुकसानीची संख्या सप्टेंबरपर्यंत प्राप्त झाली आहे. घरांच्या व जनावरांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाकडे निधी मागितला आहे. विशेषत: ऑगस्ट महिन्यात पुराचा मोठा तडाखा बसल्याने ५०५.९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने ३४ लाख ३९ हजार ७७२ रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पण, महापुराचा फटका बसल्याने केंद्र व राज्य शासनाकडून नुकसानभरपाईकरिता ६९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती असून शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळणार आहे. लवकरच ही नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे.सतरा जनावरेही दगावलीजूनपासून जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे दुधाळू तसेच शेतीकामाकरिता वापरली जाणारी १७ जनावरे दगावली आहे. यात जून महिन्यात सहा, जुलै व आॅगस्ट महिन्यामध्ये प्रत्येकी एक तर सप्टेंबर महिन्यात तब्बल ९ जणावरे दगावली आहेत.दुधाळू जनावरांच्या मोबदला म्हणून प्रती जनावर ३० हजार रुपये तर ओढकामाकरिता वापरल्या जाणाऱ्या जनावरांचा मोबदला म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये शासनाकडून दिले जातात. मृत जनावरांचा मोबदला प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

टॅग्स :Natureनिसर्गagricultureशेती