शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

निसर्गकोपात अठराशे शेतकऱ्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

सुहास घनोकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोविड-१९ विषाणूचे संकट घोंगावत असतानाच जिल्ह्यामध्ये जून महिन्यांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीचाही सामना ...

ठळक मुद्देनऊ जणांचे गेले बळी : १ हजार २० हेक्टरवरील पिकांना फटका, शासकीय मदतीचा दुष्काळ

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ विषाणूचे संकट घोंगावत असतानाच जिल्ह्यामध्ये जून महिन्यांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागत आहे. जूनपासून तर ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत आठही तालुक्यातील १ हजार ८१७ शेतकऱ्यांचे १ हजार २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण झाले असून अद्याप शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाच्या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे आटोपून ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाची लागवड केली. पण, सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. विद्युल्लतेच्या कडकडाटासह बरसणाऱ्या या पावसाने आतापर्यंत जिल्ह्यात ९ जणांचा बळी घेतला आहे. यात देवळी तालुक्यात एक, वर्ध्यात तीन, कारंजा(घाडगे) मध्ये एक, समुद्रपूर एक तर आर्वी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.यापैकी कारंजा व आर्वी तालुक्यातील प्रत्येकी एका मृताच्या कुटुंबीयाला नुकसानभरपाई मिळाली असून सहा जणांचा परिवार अद्याप मोबदल्याचा प्रतीक्षेत आहे. तसेच आर्वी येथील एकाचा पुरात वाहत गेल्याने मृत्यू झाला आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांचा परिवार उघड्यावर आला असून त्यांना तत्काळ शासकीय मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.पुराचा फटका, मिळाला दुप्पट निधीजिल्हा अधिकारी कार्यालयाकडे शेतीच्या नुकसानीची ऑगस्टपर्यंतची माहिती असून जनावरे व घरांच्या नुकसानीची संख्या सप्टेंबरपर्यंत प्राप्त झाली आहे. घरांच्या व जनावरांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाकडे निधी मागितला आहे. विशेषत: ऑगस्ट महिन्यात पुराचा मोठा तडाखा बसल्याने ५०५.९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने ३४ लाख ३९ हजार ७७२ रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पण, महापुराचा फटका बसल्याने केंद्र व राज्य शासनाकडून नुकसानभरपाईकरिता ६९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती असून शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळणार आहे. लवकरच ही नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे.सतरा जनावरेही दगावलीजूनपासून जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे दुधाळू तसेच शेतीकामाकरिता वापरली जाणारी १७ जनावरे दगावली आहे. यात जून महिन्यात सहा, जुलै व आॅगस्ट महिन्यामध्ये प्रत्येकी एक तर सप्टेंबर महिन्यात तब्बल ९ जणावरे दगावली आहेत.दुधाळू जनावरांच्या मोबदला म्हणून प्रती जनावर ३० हजार रुपये तर ओढकामाकरिता वापरल्या जाणाऱ्या जनावरांचा मोबदला म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये शासनाकडून दिले जातात. मृत जनावरांचा मोबदला प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

टॅग्स :Natureनिसर्गagricultureशेती