शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

निसर्गकोपात अठराशे शेतकऱ्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

सुहास घनोकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोविड-१९ विषाणूचे संकट घोंगावत असतानाच जिल्ह्यामध्ये जून महिन्यांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीचाही सामना ...

ठळक मुद्देनऊ जणांचे गेले बळी : १ हजार २० हेक्टरवरील पिकांना फटका, शासकीय मदतीचा दुष्काळ

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ विषाणूचे संकट घोंगावत असतानाच जिल्ह्यामध्ये जून महिन्यांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागत आहे. जूनपासून तर ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत आठही तालुक्यातील १ हजार ८१७ शेतकऱ्यांचे १ हजार २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण झाले असून अद्याप शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाच्या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे आटोपून ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरिपाची लागवड केली. पण, सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. विद्युल्लतेच्या कडकडाटासह बरसणाऱ्या या पावसाने आतापर्यंत जिल्ह्यात ९ जणांचा बळी घेतला आहे. यात देवळी तालुक्यात एक, वर्ध्यात तीन, कारंजा(घाडगे) मध्ये एक, समुद्रपूर एक तर आर्वी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.यापैकी कारंजा व आर्वी तालुक्यातील प्रत्येकी एका मृताच्या कुटुंबीयाला नुकसानभरपाई मिळाली असून सहा जणांचा परिवार अद्याप मोबदल्याचा प्रतीक्षेत आहे. तसेच आर्वी येथील एकाचा पुरात वाहत गेल्याने मृत्यू झाला आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत ९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांचा परिवार उघड्यावर आला असून त्यांना तत्काळ शासकीय मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.पुराचा फटका, मिळाला दुप्पट निधीजिल्हा अधिकारी कार्यालयाकडे शेतीच्या नुकसानीची ऑगस्टपर्यंतची माहिती असून जनावरे व घरांच्या नुकसानीची संख्या सप्टेंबरपर्यंत प्राप्त झाली आहे. घरांच्या व जनावरांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाकडे निधी मागितला आहे. विशेषत: ऑगस्ट महिन्यात पुराचा मोठा तडाखा बसल्याने ५०५.९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने ३४ लाख ३९ हजार ७७२ रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पण, महापुराचा फटका बसल्याने केंद्र व राज्य शासनाकडून नुकसानभरपाईकरिता ६९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती असून शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळणार आहे. लवकरच ही नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे.सतरा जनावरेही दगावलीजूनपासून जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे दुधाळू तसेच शेतीकामाकरिता वापरली जाणारी १७ जनावरे दगावली आहे. यात जून महिन्यात सहा, जुलै व आॅगस्ट महिन्यामध्ये प्रत्येकी एक तर सप्टेंबर महिन्यात तब्बल ९ जणावरे दगावली आहेत.दुधाळू जनावरांच्या मोबदला म्हणून प्रती जनावर ३० हजार रुपये तर ओढकामाकरिता वापरल्या जाणाऱ्या जनावरांचा मोबदला म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये शासनाकडून दिले जातात. मृत जनावरांचा मोबदला प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

टॅग्स :Natureनिसर्गagricultureशेती