शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

विद्यार्थ्यांकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:29 IST

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या नगर नियोजन पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्धा जिल्ह्याची निवड करून आठही तालुक्यातील गावातील नागरिक,....

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करणार : शैलेश नवाल यांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या नगर नियोजन पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्धा जिल्ह्याची निवड करून आठही तालुक्यातील गावातील नागरिक, तलाठी, तहसील, वीज, बस, रेल्वे, पाणी पुरवठा, शेती, पर्यटन, पशुसंवर्धन, धरणे, कृषी, आपतकालीन, अधिकोष, डाक व तार आदी विभागाच्या विकासात्मक कार्यपद्धतीच्या कामाचा आढावा घेवून त्यात काय सुधारणा करता येईल यावर संशोधन केले आहे.वर्धा जिल्ह्याच्या आठ तालुक्याचा अभ्यास व विकासात्मक नियोजनचा सर्वे करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी व वरिष्ठ विभागांना सादर करणार असल्याची माहिती प्रा. डॉ. संजीवकुमार सोनार व प्रा. डॉ. आरती पेटकर यांनी दिली आहे. प्रादेशिक योजनांचे नियोजन करण्यासाठी आणि सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. वर्धा जिल्हा ही महात्मा गांधीजी व संत विनोबांजीेंची प्रयोग व कर्मभूमी राहिली आहे. अशा ऐतिहासिक जिल्ह्याची नगर विकासाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. गांधीजींच्या विचारावरील गोपुरी, महात्मा गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र आदी संस्थानाना भेटी देवून त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली आहे. ग्रामीण भाग सर्व दृष्टीने चांगला असून विकासासाठी संधी आहे. सर्व प्रकारची नैसर्गिक साधन संपदा असून दिशा व मार्गदर्शनाची गरज आहे. यावर विद्यार्थी अहवाल तयार करून तो सादर करणार आहे. १६ तारखेपर्यंत अभ्यासाचे कार्य चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांशी सेवाग्राम आश्रमात संवाद साधून विकासात्मक कार्याचे नियोजन करण्याची संधी मिळाली. चांगला अभ्यास करून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सर्वे पूर्ण करावा. वर्धा जिल्ह्याची निवड करून आम्हाला चांगल्या नियोजनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सदर प्राध्यापक विद्यार्थ्यांची व्यवस्था सेवाग्राम आश्रमच्या यात्री निवासात करण्यात आली असून मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांचे सहकार्य विद्यार्थ्यांना लाभत असल्याचे डॉ. संजीवकुमार सोनार यांनी सांगितले आहे.पुणे ते वर्धा असा प्रवास केला. वर्धा जिल्ह्या शांतीप्रिय जिल्हा आहे. येथील नागरिक जिल्ह्याबाहेरून आलेल्यांना चांगला प्रतिसाद व सहकार्य करतात. नागरिक व अधिकाºयांकडून अधिकची माहिती मिळाली. ग्रामीण क्षेत्राच्या विकासाचे नियोजन होणे गरजचे असून त्यावरच आमचा अधिक भर राहणार आहे. तळापासून शिखरापर्यंतच्या समान विकासाच्या सुत्राचा आम्ही विचार केल्याचे विद्यार्थी सांगतात.