शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

बापूंपासून प्राकृतिक चिकित्सेचा वसा

By admin | Updated: May 24, 2014 00:04 IST

आधुनिक जीवनशैली आगामी पिढीकरिता एकप्रकारे शापच ठरत आहे़ स्पर्धा करताना आरोग्य आणि आहार याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते़ यातूनच नवनवीन व्याधी जन्माला येत असून

मुलाखत : मुलचंद बडजाते यांची माहिती

वर्धा : आधुनिक जीवनशैली आगामी पिढीकरिता एकप्रकारे शापच ठरत आहे़ स्पर्धा करताना आरोग्य आणि आहार याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते़ यातूनच नवनवीन व्याधी जन्माला येत असून आयुर्मर्यादा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येते़ संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या सुदृढ आरोग्याची पुंजी आहे़ हा मूलमंत्र महात्मा गांधी यांच्याकडून मिळाला. गांधीजींनी निसर्गाेपचारावर व्यापक काम केले आहे़ हाच वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे़ बदलते जीवनमान आणि ऋतूमान पाहता प्राकृतिक चिकित्सा ही काळाची गरज ठरत आहे, विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मुलचंद बडजाते यांनी व्यक्त केले़ जिल्ह्यात बडजाते यांनी निसर्गोपचार क्षेत्रात केलेले कार्यच त्यांची ओळख बनले आहे़ वय वर्षे ८९ असताना त्यांची ठणठणीत असणार्‍या तब्बेतीचे गुढ याच आदर्श जीवनशैलीत आहे़ गांधी विचारांचे समर्थक असणारे मुलचंद बडजाते यांच्याशी केलेल्या संवादात त्यांनी स्वातंत्र समर काळातील घटनांपासून ते भूदान चळवळ, कृष्ठरूग्णांकरिता विनोबांचे कार्य, सेंद्रीय शेती, गोधन यासर्व घटनांच्या स्मृती जागृत केल्या. या संवादातून त्यांचा जीवनपटही उलगडत गेला़ महात्मा गांधी १९३३ ला वर्धेत आले़ त्यावेळी मुलचंदजींचे शालेय शिक्षण सुरू होते़ त्यांचे काका चिरंजीलाल बडजाते जमनालाल बजाज यांचे निकटवर्ती असल्याने त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग असत़ किशोरवयातच मुलचंदजींची महात्मा गांधींचे कार्य जवळून पाहिले़ हेच संस्कार त्यांच्यावर होवून राष्ट्रभक्तीचे बीज रूजले़ याविषयी सांगताना ते म्हणतात, गांधीजींसोबत जंगल सत्याग्रहात भाग घेतला़ यादरम्यान ‘आरोग्यकी पुंजी’(की टू हेल्थ) हे पुस्तक वाचण्यात आले़ यातूनच आदर्श जीवनमानाचा मार्ग सापडला़ पुस्तकात निसर्गोपचार पद्धती सांगितल्या आहे़ त्याचा संगम स्वत:च्या जीवनात केला आणि प्रचार व प्रसार केला़ सुदृढ आरोग्याचे तेच रहस्य आहे़ पिढीजात कापड व्यवसाय करताना आहार आणि व्यायामाकडे दुर्लक्ष केले नाही़ नियमित योग प्राणायाम केल्यास व्याधींमुक्त जीवन जगता येत असल्याचे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)