शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीमुळे चार व्यक्तींसह सहा प्राण्यांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

सततच्या पावसामुळे तालुक्यातील ८६ घरांची पडझड झाल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. या नुकसानग्रस्तांपैकी काहींना १७ लाख ५८ हजारांची शासकीय मदत देण्यात आली आहे, तर ७९ लाख २३ हजारांचा निधी अद्यापही मिळालेला नसल्याने नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या उसंत घेत पाऊस सुरू आहे. अशातच सोयाबीन उत्पादकांकडून सोयाबीनच्या मळणीला गती दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : यंदाच्या वर्षी नैसर्गिक आपत्तीने तालुक्यातील शेतकऱ्यांसह पशुपालकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसामुळे १०१८ हेक्टरवरील उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून, तालुक्यातील चार व्यक्तींचा, तसेच सहा पाळीव प्राण्यांचा यंदाच्या वर्षी नैसर्गिक आपत्तीने बळी घेतला आहे, तर सततच्या पावसामुळे तालुक्यातील ८६ घरांची पडझड झाल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. या नुकसानग्रस्तांपैकी काहींना १७ लाख ५८ हजारांची शासकीय मदत देण्यात आली आहे, तर ७९ लाख २३ हजारांचा निधी अद्यापही मिळालेला नसल्याने नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या उसंत घेत पाऊस सुरू आहे. अशातच सोयाबीन उत्पादकांकडून सोयाबीनच्या मळणीला गती दिली जात आहे. पण पावसामुळे यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात घट येण्याची भीती वर्तविली जात असल्याने सोयाबीन उत्पादकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे.

मृतांसह जखमींच्या कुटुंबियांना मदत- तालुका प्रशासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे गतप्राण झालेल्या चार व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले आहे, तर वीज पडून एक व्यक्ती जखमी झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना ४ हजार ३०० रुपये तातडीची मदत देण्यात आली आहे. - २५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्या कुटुंबाला शासकीय मदत म्हणून १.२५ लाख वितरित करण्यात आले आहे. पावसामुळे पाच घरांचे पूर्णत: नुकसान झाल्याने या कुटुंबीयांना २९ हजार ७०० रुपये वितरित करण्यात आले आहे.

सहा घरांचे पूर्णत: तर ८० घरांचे अंशत: नुकसान- तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे चार व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. तर सहा घरांचे पूर्णतः तसेच ८० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच पाच  गोठे  पूर्णतः पडल्याने शेतीला पशूपालनाची जोड देणाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसामुळे १८४५ शेतकऱ्यांच्या १०१८.६३ हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ७१.१४ लाखांची मागणी करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती