शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गार्इंच्या संरक्षणातच राष्ट्राची प्रगती

By admin | Updated: September 30, 2014 23:39 IST

भारतीय संस्कृतीत अहिंसेला सर्वोच्च स्थान असून प्राण्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी जागरूकपणे कार्य करतांनाच गाईसारख्या प्राण्यांची हत्या होवू नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी समाजासोबतच शासनाने

मुनीश्री समतासागर यांचे प्रतिपादन : गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी मूक मोर्चावर्धा : भारतीय संस्कृतीत अहिंसेला सर्वोच्च स्थान असून प्राण्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी जागरूकपणे कार्य करतांनाच गाईसारख्या प्राण्यांची हत्या होवू नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी समाजासोबतच शासनाने कायदा करावा व गार्इंच्या संवर्धनाची हमी द्यावी, असे प्रतिपादन मुनीश्री समतासागर महाराज यांनी केले. गोमाता ही राष्ट्रमाता आहे, तिचे संरक्षण करा, यासाठी निघालेल्या अहिंसा, जनजागरण, मुकमोर्चाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अहिंसा, जनजागरण, मूक मोर्चाचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज चार्तुमास सेवा समितीतर्फे तसेच स्थानिक सर्व संघटनातर्फे करण्यात आले होते. हा मूकमोर्चा मुनीश्री समतासागर महाराज, मुनीश्री अरहसागर महाराज व एलकश्री निश्चयसागर महाराज यांच्या आशीर्वादात निघाला. यावेळी भारतीय जैन संघटना अध्यक्ष वीरेंद्र भागवतकर, किरीट ओरा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुलचंद बडजाते, सयाजी महाराज, देवेंद्र बडजाते यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी गोवंश हत्या प्रतिबंध करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. अहिंसा, जनजागरण मुकमोर्चामध्ये वर्धा शहरासोबतच विदर्भातील तसेच मध्यप्रदेशातील असंख्य जैन बांधव सहभागी झाले होते.मुनीश्री समतासागर महाराज यांनी संपूर्ण गोवंश हत्या करण्यावर बंदी लागावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. सर्वधर्म अहिंसेच्या मार्गावर जात असताना कुठल्याही प्राण्यांची हत्या करणे हे अहिंसेत बसत नाही. जगा आणि जगू द्या, या तत्त्वानुसार कुठल्याही प्राण्यांना इजा पोहचवली जावू नये, त्यांचे संवर्धन करणे हे राष्ट्राचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.शेती पिकविली तर ती हिरवी होवू शकते. त्यामुळे देशवासियांना अन्नधान्य मिळू शकते; परंतु कत्तलखाने काढले तर त्याचा समाजावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. भारतामध्ये कत्तलखान्यांना परवानगी देवू नये यासाठी अहिंसेच्या मार्गाने विनंती करण्यासाठी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अहिंसेची ज्योत आणि हे अभियान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहनही मुनीश्री समतासागर महाराज यांनी केले. मूकमोर्चाला सर्कस ग्राऊंड येथून सुरुवात झाली. त्यानंतर अनेकांत स्वाध्याय मंदिर, सराफा लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विसर्जित झाला. मूकमोर्चामध्ये हजारो जैन बांधव सहभागी होते.(प्रतिनिधी)