शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
4
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
5
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
6
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
7
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
8
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
9
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
10
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
11
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
12
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
13
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
15
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
16
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
17
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
18
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
19
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
20
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

गार्इंच्या संरक्षणातच राष्ट्राची प्रगती

By admin | Updated: September 30, 2014 23:39 IST

भारतीय संस्कृतीत अहिंसेला सर्वोच्च स्थान असून प्राण्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी जागरूकपणे कार्य करतांनाच गाईसारख्या प्राण्यांची हत्या होवू नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी समाजासोबतच शासनाने

मुनीश्री समतासागर यांचे प्रतिपादन : गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी मूक मोर्चावर्धा : भारतीय संस्कृतीत अहिंसेला सर्वोच्च स्थान असून प्राण्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी जागरूकपणे कार्य करतांनाच गाईसारख्या प्राण्यांची हत्या होवू नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी समाजासोबतच शासनाने कायदा करावा व गार्इंच्या संवर्धनाची हमी द्यावी, असे प्रतिपादन मुनीश्री समतासागर महाराज यांनी केले. गोमाता ही राष्ट्रमाता आहे, तिचे संरक्षण करा, यासाठी निघालेल्या अहिंसा, जनजागरण, मुकमोर्चाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अहिंसा, जनजागरण, मूक मोर्चाचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज चार्तुमास सेवा समितीतर्फे तसेच स्थानिक सर्व संघटनातर्फे करण्यात आले होते. हा मूकमोर्चा मुनीश्री समतासागर महाराज, मुनीश्री अरहसागर महाराज व एलकश्री निश्चयसागर महाराज यांच्या आशीर्वादात निघाला. यावेळी भारतीय जैन संघटना अध्यक्ष वीरेंद्र भागवतकर, किरीट ओरा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुलचंद बडजाते, सयाजी महाराज, देवेंद्र बडजाते यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी गोवंश हत्या प्रतिबंध करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. अहिंसा, जनजागरण मुकमोर्चामध्ये वर्धा शहरासोबतच विदर्भातील तसेच मध्यप्रदेशातील असंख्य जैन बांधव सहभागी झाले होते.मुनीश्री समतासागर महाराज यांनी संपूर्ण गोवंश हत्या करण्यावर बंदी लागावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. सर्वधर्म अहिंसेच्या मार्गावर जात असताना कुठल्याही प्राण्यांची हत्या करणे हे अहिंसेत बसत नाही. जगा आणि जगू द्या, या तत्त्वानुसार कुठल्याही प्राण्यांना इजा पोहचवली जावू नये, त्यांचे संवर्धन करणे हे राष्ट्राचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.शेती पिकविली तर ती हिरवी होवू शकते. त्यामुळे देशवासियांना अन्नधान्य मिळू शकते; परंतु कत्तलखाने काढले तर त्याचा समाजावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. भारतामध्ये कत्तलखान्यांना परवानगी देवू नये यासाठी अहिंसेच्या मार्गाने विनंती करण्यासाठी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अहिंसेची ज्योत आणि हे अभियान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहनही मुनीश्री समतासागर महाराज यांनी केले. मूकमोर्चाला सर्कस ग्राऊंड येथून सुरुवात झाली. त्यानंतर अनेकांत स्वाध्याय मंदिर, सराफा लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विसर्जित झाला. मूकमोर्चामध्ये हजारो जैन बांधव सहभागी होते.(प्रतिनिधी)