शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

‘तो’ साधतो गीत गायनातून राष्ट्रीय एकात्मता

By admin | Updated: January 13, 2015 23:05 IST

राष्ट्रप्रेम व देशभक्ती व्यक्त करण्यासाठी शिक्षण जात आणि धर्म कधीही अडसर ठरू शकत नाही. त्यासाठी पाहिजे फक्त आंतरीक इच्छा आणि सातत्याचा प्रामाणिक प्रयत्न. या प्रामाणिक

कारंजा (घा.) : राष्ट्रप्रेम व देशभक्ती व्यक्त करण्यासाठी शिक्षण जात आणि धर्म कधीही अडसर ठरू शकत नाही. त्यासाठी पाहिजे फक्त आंतरीक इच्छा आणि सातत्याचा प्रामाणिक प्रयत्न. या प्रामाणिक प्रयत्नातूनच तालुक्यातील ठाणेगाव येथील बारावी शिकलेल्या आणि शिवणकामाच्या व्यवसाय करणाऱ्या सुरेश मलवे याने सिद्ध करून दाखविले आहे. त्याच्या अंगी असलेल्या गायानाच्या कलेतून तो देशभक्तीपर गीत सादर करून राष्ट्रीय एकात्मिकतेचा प्रयत्न करीत आहे. १९९९ पासून तर आजपर्यंतच्या १५ वर्षांच्या काळात त्याने वर्धा, नागपूरख अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रगान या सदराखाली १,५०० कार्यक्रम सादर केले. विद्यार्थी आणि जनतेत देशप्रेम, देशभक्ती आदि भावना तेवत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या कार्यक्रमात ते वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा अभिनय आणि पहाडी आवाजात स्वरचित गितांच्या माध्यमातून देशभक्ती साक्षरता व्यसनमुक्ती, स्त्रीभू्रणहत्या, एड्स माणसानी माणूस जागृत करणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, हुंडाबळी या सर्व ज्वलंत समस्यांवर अत्यंत तळमळीने समाजप्रबोधन करीत आहे. तिरंगा, याद करो कुर्बानी हे राष्ट्रभक्तीपर गिताचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. २००१ मध्ये फुले, शाहू, आंबेडकरी साहित्य संमेलनातही त्याने काव्य सादर केले. फिरत्या मोबाईल व्हॅन मधून न्याय आपुल्या दारी या कार्यक्रमांतर्गत कलापथकाद्वारे जनजागृती केली. महाराष्ट्र लोककला संघ वर्धा सभासद म्हणून काम करतो आहे. सन २०१४ येथील राज्यस्तरीय संमेलनात स्वरचित देशभक्तांला काव्य सादर केल्याबद्दल, त्याचा शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला. यासह विविध कार्यक्रमात त्याचा सत्कार झाला आहे.(तालुका प्रतिनिधी)