शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

राष्ट्रीय पेयजल; ५८ पैकी ८ कामेच पूर्ण

By admin | Updated: December 29, 2014 01:56 IST

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; पण यातही निधी अप्राप्तीचा खोडा आड येत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील ५८ पैकी केवळ ८ गावांतील योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ ...

वर्धा : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; पण यातही निधी अप्राप्तीचा खोडा आड येत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील ५८ पैकी केवळ ८ गावांतील योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ अद्यापही ५० गावांतील कामे निधी अप्राप्त असल्याने रखडल्याची माहिती पूढे आली आहे़राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत २०१४-१५ मधील जिल्ह्यातील ५८ गावांपैकी केवळ आठच कामे पूर्ण होऊ शकली आहेत़ या कामांकरिता उपलब्ध निधी ८ कोटी ७२ लाख ३९ हजार रुपयांपैकी केवळ ६० टक्के निधी खर्च झाला आहे. अद्यापही निधी प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ५० कामे रखडल्याचेही सांगण्यात आले आहे़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ४२६ गावांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता़ यापैकी ३२८ गावांकरिता अद्यापही निधी प्राप्त झालेला नाही़ आठ दिवसांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे़ यावरून या वर्षीचा निधी पाठविण्यात आला; परंतु मागील वर्षीचा निधी रोखून धरण्यात आला आहे़ याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत दिली. यावर उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी टंचाईचा निधी वेगळाच असतो़ सदर निधी त्वरित मिळणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधले. टंचाईकरिता तालुकानिहाय आढावा बैठक बोलविण्याबाबत अध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी पत्र पाठविण्याची सूचना शिक्षण व आरोग्य सभापती मिलिंद भेंडे यांनी केली. शिवाय ज्यावेळी आराखडा मंजूर केला जातो, त्याचवेळी ४० टक्के निधी मंजूर करण्याबाबतचा ठराव घेण्यात यावा आणि तो ग्रामविकास व पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात यावा, याकडेही लक्ष वेधण्यात आले. या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाई संदर्भातील मागणी घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.निधी प्राप्त न झाल्याने आर्वी तालुक्यातील पाचोड, गुमगाव, सालफळ, निझामपूर, बेढोणा, हिवरा, हिवरा (तांडा), बोदड, वाढोणा, खुबगाव, पाचोड, बोथली आणि खरांगणा येथील कामे रखडलेली आहेत़(जिल्हा प्रतिनिधी)योजनेची कामे रखडलेली गावेआष्टी तालुक्यातील वडाळा, सत्तारपूर, धाडी, आबादकिन्ही, तळेगाव (श्या़पं़), काकडदरा, बोरखेडी, अजितपूर. आनंदवाडी, गोदावरी, टेकोडा व चिस्तूर, देवळी तालुक्यातील गुंजखेडा, हिवरा (हाडके), निमसडा, भोजनखेडा आणि इंझाळा येथील कामे रखडली आहेत़ हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव, वेळा, वेणी, आजनसरा, डोरला, इंझाळा व कारंजा तालुक्यातील भालेवाडी, गारपीट, जोगा व मदनीचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (मिर्झापूर), बोडखा, झुणका, कोरा, समुद्रपूर, निंबाळा, जिरा तसेच सेलू तालुक्यातील कोटंबा, केळझर तर वर्धा तालुक्यातील धुळवा या गावांतील कामेही रखडलेली आहेत़