शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

राष्ट्रीय पेयजल; ५८ पैकी ८ कामेच पूर्ण

By admin | Updated: December 29, 2014 01:56 IST

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; पण यातही निधी अप्राप्तीचा खोडा आड येत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील ५८ पैकी केवळ ८ गावांतील योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ ...

वर्धा : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; पण यातही निधी अप्राप्तीचा खोडा आड येत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील ५८ पैकी केवळ ८ गावांतील योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ अद्यापही ५० गावांतील कामे निधी अप्राप्त असल्याने रखडल्याची माहिती पूढे आली आहे़राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत २०१४-१५ मधील जिल्ह्यातील ५८ गावांपैकी केवळ आठच कामे पूर्ण होऊ शकली आहेत़ या कामांकरिता उपलब्ध निधी ८ कोटी ७२ लाख ३९ हजार रुपयांपैकी केवळ ६० टक्के निधी खर्च झाला आहे. अद्यापही निधी प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ५० कामे रखडल्याचेही सांगण्यात आले आहे़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ४२६ गावांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता़ यापैकी ३२८ गावांकरिता अद्यापही निधी प्राप्त झालेला नाही़ आठ दिवसांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे़ यावरून या वर्षीचा निधी पाठविण्यात आला; परंतु मागील वर्षीचा निधी रोखून धरण्यात आला आहे़ याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत दिली. यावर उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी टंचाईचा निधी वेगळाच असतो़ सदर निधी त्वरित मिळणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधले. टंचाईकरिता तालुकानिहाय आढावा बैठक बोलविण्याबाबत अध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी पत्र पाठविण्याची सूचना शिक्षण व आरोग्य सभापती मिलिंद भेंडे यांनी केली. शिवाय ज्यावेळी आराखडा मंजूर केला जातो, त्याचवेळी ४० टक्के निधी मंजूर करण्याबाबतचा ठराव घेण्यात यावा आणि तो ग्रामविकास व पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात यावा, याकडेही लक्ष वेधण्यात आले. या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाई संदर्भातील मागणी घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून देण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.निधी प्राप्त न झाल्याने आर्वी तालुक्यातील पाचोड, गुमगाव, सालफळ, निझामपूर, बेढोणा, हिवरा, हिवरा (तांडा), बोदड, वाढोणा, खुबगाव, पाचोड, बोथली आणि खरांगणा येथील कामे रखडलेली आहेत़(जिल्हा प्रतिनिधी)योजनेची कामे रखडलेली गावेआष्टी तालुक्यातील वडाळा, सत्तारपूर, धाडी, आबादकिन्ही, तळेगाव (श्या़पं़), काकडदरा, बोरखेडी, अजितपूर. आनंदवाडी, गोदावरी, टेकोडा व चिस्तूर, देवळी तालुक्यातील गुंजखेडा, हिवरा (हाडके), निमसडा, भोजनखेडा आणि इंझाळा येथील कामे रखडली आहेत़ हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव, वेळा, वेणी, आजनसरा, डोरला, इंझाळा व कारंजा तालुक्यातील भालेवाडी, गारपीट, जोगा व मदनीचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (मिर्झापूर), बोडखा, झुणका, कोरा, समुद्रपूर, निंबाळा, जिरा तसेच सेलू तालुक्यातील कोटंबा, केळझर तर वर्धा तालुक्यातील धुळवा या गावांतील कामेही रखडलेली आहेत़