शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘त्या’ भूखंडांवर भलतीच नावे

By admin | Updated: September 10, 2016 00:31 IST

प्रशासनाची एखादी चूक सामान्य नागरिकांना कशी त्रासदायक ठरते, याचा प्रत्यय एका प्रकरणातून आला आहे.

प्रशासनाचा गलथानपणा : नावे कमी करण्यासाठी महिलेचा खटाटोपवर्धा : प्रशासनाची एखादी चूक सामान्य नागरिकांना कशी त्रासदायक ठरते, याचा प्रत्यय एका प्रकरणातून आला आहे. भूखंडावर त्या भूखंड मालकाचे नाव असताना त्यावर पुन्हा नावाची नोंद झाली आहे. वास्तविक, ती व्यक्त कोण, कुठे राहते, याचा काहीही थांगपत्ता नाही, हे विशेष. आता हे नाव कमी करण्यासाठी संबंधितांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे.मौजा आलोडी येथे श्रीकांत भुरे यांच्या नावाने सर्व्हे क्र. ४८ मध्ये १, २, ३, २३ व ३४ अनुक्रमे आराजी क्षेत्र १६९.६४ व उर्वरित सर्व १८५.७८ चौ.मी. आहे. भूखंड मालक राजेंद्र भुरे यांचा २४ एप्रिल २०१६ रोजी मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या वारसानाची नोंद करण्यासाठी त्यांची पत्नी विणा राजेंद्र भुरे यांनी नालवाडी तलाठी कार्यालयातून सातबारा मिळविला असता त्यातील भूखंड क्र. १, २ व ३ च्या सातबारावरून राजेंद्र भुरे यांचे नाव कमी केलेले आहे. भूखंड क्र. १ वर मिलिंद अजाब बोकडे, भूखंड क्र. २ वर नरेश अजाबराव कडू व भूखंड क्र. ३ वर राजेश नागोराव रोकडे यांच्या नावाची नोंद असल्याचे दिसून आले. उर्वरित भूखंडांवर मात्र राजेंद्र भुरे यांचे नाव कायम आहे. वास्तविक, भूखंड क्र. १, २ व ३ सदर व्यक्तींना विकले वा बक्षिसपत्र, वाटणी व दानपत्र करून दिलेले नाही. याबाबत वर्धा, देवळी व पुलगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातही असे व्यवहार झाल्याची नोंद नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, सातबारा मधील फेरफार क्र. ४०४४, ३५३७ व ८७९० या पंजीमध्येही सदर व्यक्तींच्या नावाची नोंद नसताना सदर भूखंडांवर बोगस व्यक्ती व खोट्या नावाची नोंद कशी झाली, हे न उलगडणारे कोडेच आहे. प्रशासनाचा गलभानपणामुळे त्रस्त होऊन सदर बोगस नावे कमी करण्यासाठी राजेंद्र भुरे यांच्या पत्नी विणा भुरे या संबंधित विभागात चकरा मारत आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)