शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

‘त्या’ भूखंडांवर भलतीच नावे

By admin | Updated: September 10, 2016 00:31 IST

प्रशासनाची एखादी चूक सामान्य नागरिकांना कशी त्रासदायक ठरते, याचा प्रत्यय एका प्रकरणातून आला आहे.

प्रशासनाचा गलथानपणा : नावे कमी करण्यासाठी महिलेचा खटाटोपवर्धा : प्रशासनाची एखादी चूक सामान्य नागरिकांना कशी त्रासदायक ठरते, याचा प्रत्यय एका प्रकरणातून आला आहे. भूखंडावर त्या भूखंड मालकाचे नाव असताना त्यावर पुन्हा नावाची नोंद झाली आहे. वास्तविक, ती व्यक्त कोण, कुठे राहते, याचा काहीही थांगपत्ता नाही, हे विशेष. आता हे नाव कमी करण्यासाठी संबंधितांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे.मौजा आलोडी येथे श्रीकांत भुरे यांच्या नावाने सर्व्हे क्र. ४८ मध्ये १, २, ३, २३ व ३४ अनुक्रमे आराजी क्षेत्र १६९.६४ व उर्वरित सर्व १८५.७८ चौ.मी. आहे. भूखंड मालक राजेंद्र भुरे यांचा २४ एप्रिल २०१६ रोजी मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या वारसानाची नोंद करण्यासाठी त्यांची पत्नी विणा राजेंद्र भुरे यांनी नालवाडी तलाठी कार्यालयातून सातबारा मिळविला असता त्यातील भूखंड क्र. १, २ व ३ च्या सातबारावरून राजेंद्र भुरे यांचे नाव कमी केलेले आहे. भूखंड क्र. १ वर मिलिंद अजाब बोकडे, भूखंड क्र. २ वर नरेश अजाबराव कडू व भूखंड क्र. ३ वर राजेश नागोराव रोकडे यांच्या नावाची नोंद असल्याचे दिसून आले. उर्वरित भूखंडांवर मात्र राजेंद्र भुरे यांचे नाव कायम आहे. वास्तविक, भूखंड क्र. १, २ व ३ सदर व्यक्तींना विकले वा बक्षिसपत्र, वाटणी व दानपत्र करून दिलेले नाही. याबाबत वर्धा, देवळी व पुलगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातही असे व्यवहार झाल्याची नोंद नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, सातबारा मधील फेरफार क्र. ४०४४, ३५३७ व ८७९० या पंजीमध्येही सदर व्यक्तींच्या नावाची नोंद नसताना सदर भूखंडांवर बोगस व्यक्ती व खोट्या नावाची नोंद कशी झाली, हे न उलगडणारे कोडेच आहे. प्रशासनाचा गलभानपणामुळे त्रस्त होऊन सदर बोगस नावे कमी करण्यासाठी राजेंद्र भुरे यांच्या पत्नी विणा भुरे या संबंधित विभागात चकरा मारत आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)