शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

विश्वशांतीसाठी ‘नागराज’ची सायकलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:32 IST

ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली.

ठळक मुद्देदररोज ८० कि.मी.चा प्रवास : २०१७ पासून जगभ्रमंतीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली. येथे दोन दिवस मुक्काम करुन पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर तेलंगणाकडे रवाना होणार आहे.नागराज गौडा मल्लेगौडा (५०) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मुळचा कर्नाटकातील हासन येथील आहे; मुंबईत आल्याने त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या ठिकाणाहून ही सायकल यात्रा ३ डिसेंबर २०१७ ला सुरु केली. पाणी बचाव-हरियाली बचाव, जिओ और जिने दो, गोरक्षा, सनातन, सर्वधर्म समभाव, देशभक्ती विश्वशांती, हेल्थ ईज वेल्थ अशी जनजागृतीकरित नागराज यांनी आपला प्रवास सुरु केला. ते दररोज सायकलने ८० कि.मी.चा प्रवास करतात. त्यांनी मुंबईनंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व नागपूर मार्गे वर्ध्यात प्रवेश केला आहे. सेवाग्राम आश्रमात मुक्कामी असून पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर ते तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, बंगाल, झारखंड व बिहार या ठिकाणीही जाणार असल्याचे सांगितले.ना राहण्याचे नियोजन ना खाण्यापिण्याचेमुंबई येथून निघालेली नागराज यांची सायकलस्वारी सतत सुरु आहे. कोणत्या गावाला कुठे थांबायचे, कुणाकडे जेवन करायचे याचे काहीही नियोजन नाही. वाटेत जे गाव लागेत त्या गावात थांबायचे मिळेल ते खायचे, असाच यांचा दिनक्रम सुरु आहे. त्यांना या जगभ्रमंतीमध्ये मंदिर, आश्रम, गुरुव्दारा, आर्य समाज भवन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आदिंचे सहकार्य मिळत आहे.जगातील शांती नांदावी याकरिता ही सायकलवारी सुरु केली असून आता सेवाग्राम येथून तेलंगणा, कर्नाटकला जाणार. कर्नाटक मुळ गाव असल्याने येथे पावसाच्या दिवसांत दोन महिने मुक्काम करणार आहे. त्यानंतर पुढील प्रवास सुरु होईल. प्रवासदरम्यान मार्गावर असलेले मार्ग दाखविणारे फलकच प्रवासाकरिता मार्गदर्शक ठरत आहे. अडचण आल्यास नागरिकांना विचारुन पुढील प्रवास सुरु करतो. या प्रवासात नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.- नागराज गौडा, यात्रेकरू.