शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

विश्वशांतीसाठी ‘नागराज’ची सायकलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:32 IST

ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली.

ठळक मुद्देदररोज ८० कि.मी.चा प्रवास : २०१७ पासून जगभ्रमंतीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली. येथे दोन दिवस मुक्काम करुन पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर तेलंगणाकडे रवाना होणार आहे.नागराज गौडा मल्लेगौडा (५०) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मुळचा कर्नाटकातील हासन येथील आहे; मुंबईत आल्याने त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या ठिकाणाहून ही सायकल यात्रा ३ डिसेंबर २०१७ ला सुरु केली. पाणी बचाव-हरियाली बचाव, जिओ और जिने दो, गोरक्षा, सनातन, सर्वधर्म समभाव, देशभक्ती विश्वशांती, हेल्थ ईज वेल्थ अशी जनजागृतीकरित नागराज यांनी आपला प्रवास सुरु केला. ते दररोज सायकलने ८० कि.मी.चा प्रवास करतात. त्यांनी मुंबईनंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व नागपूर मार्गे वर्ध्यात प्रवेश केला आहे. सेवाग्राम आश्रमात मुक्कामी असून पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर ते तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, बंगाल, झारखंड व बिहार या ठिकाणीही जाणार असल्याचे सांगितले.ना राहण्याचे नियोजन ना खाण्यापिण्याचेमुंबई येथून निघालेली नागराज यांची सायकलस्वारी सतत सुरु आहे. कोणत्या गावाला कुठे थांबायचे, कुणाकडे जेवन करायचे याचे काहीही नियोजन नाही. वाटेत जे गाव लागेत त्या गावात थांबायचे मिळेल ते खायचे, असाच यांचा दिनक्रम सुरु आहे. त्यांना या जगभ्रमंतीमध्ये मंदिर, आश्रम, गुरुव्दारा, आर्य समाज भवन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आदिंचे सहकार्य मिळत आहे.जगातील शांती नांदावी याकरिता ही सायकलवारी सुरु केली असून आता सेवाग्राम येथून तेलंगणा, कर्नाटकला जाणार. कर्नाटक मुळ गाव असल्याने येथे पावसाच्या दिवसांत दोन महिने मुक्काम करणार आहे. त्यानंतर पुढील प्रवास सुरु होईल. प्रवासदरम्यान मार्गावर असलेले मार्ग दाखविणारे फलकच प्रवासाकरिता मार्गदर्शक ठरत आहे. अडचण आल्यास नागरिकांना विचारुन पुढील प्रवास सुरु करतो. या प्रवासात नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.- नागराज गौडा, यात्रेकरू.