शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वशांतीसाठी ‘नागराज’ची सायकलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:32 IST

ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली.

ठळक मुद्देदररोज ८० कि.मी.चा प्रवास : २०१७ पासून जगभ्रमंतीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ही सृष्टी अबाधित राहावी, जगातील सर्व प्राणीमात्रांनी गुण्यागोविंदाने नांदावे याकरिता अंधेरी मुंबई येथून एका अवलियाने सायकलव्दारे जगभ्रमंती सुरु केली आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी सुरु झाली ही सायकलवारी मंगळवारी सेवाग्राम आश्रमात पोहोचली. येथे दोन दिवस मुक्काम करुन पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर तेलंगणाकडे रवाना होणार आहे.नागराज गौडा मल्लेगौडा (५०) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मुळचा कर्नाटकातील हासन येथील आहे; मुंबईत आल्याने त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या ठिकाणाहून ही सायकल यात्रा ३ डिसेंबर २०१७ ला सुरु केली. पाणी बचाव-हरियाली बचाव, जिओ और जिने दो, गोरक्षा, सनातन, सर्वधर्म समभाव, देशभक्ती विश्वशांती, हेल्थ ईज वेल्थ अशी जनजागृतीकरित नागराज यांनी आपला प्रवास सुरु केला. ते दररोज सायकलने ८० कि.मी.चा प्रवास करतात. त्यांनी मुंबईनंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व नागपूर मार्गे वर्ध्यात प्रवेश केला आहे. सेवाग्राम आश्रमात मुक्कामी असून पवनार आश्रमला भेट दिल्यानंतर ते तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, बंगाल, झारखंड व बिहार या ठिकाणीही जाणार असल्याचे सांगितले.ना राहण्याचे नियोजन ना खाण्यापिण्याचेमुंबई येथून निघालेली नागराज यांची सायकलस्वारी सतत सुरु आहे. कोणत्या गावाला कुठे थांबायचे, कुणाकडे जेवन करायचे याचे काहीही नियोजन नाही. वाटेत जे गाव लागेत त्या गावात थांबायचे मिळेल ते खायचे, असाच यांचा दिनक्रम सुरु आहे. त्यांना या जगभ्रमंतीमध्ये मंदिर, आश्रम, गुरुव्दारा, आर्य समाज भवन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आदिंचे सहकार्य मिळत आहे.जगातील शांती नांदावी याकरिता ही सायकलवारी सुरु केली असून आता सेवाग्राम येथून तेलंगणा, कर्नाटकला जाणार. कर्नाटक मुळ गाव असल्याने येथे पावसाच्या दिवसांत दोन महिने मुक्काम करणार आहे. त्यानंतर पुढील प्रवास सुरु होईल. प्रवासदरम्यान मार्गावर असलेले मार्ग दाखविणारे फलकच प्रवासाकरिता मार्गदर्शक ठरत आहे. अडचण आल्यास नागरिकांना विचारुन पुढील प्रवास सुरु करतो. या प्रवासात नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.- नागराज गौडा, यात्रेकरू.