शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

वर्धेतून धावणार नागपूर-मुंबई ‘बुलेट ट्रेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाकडून नागपूर - मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प नियोजित आहे. त्यासाठी जीपीएस टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे. जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाला पाठवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बारा ठिकाणी राहणार थांबे२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या नागपूर - मुंबई या बुलेट ट्रेनचे तब्बल बारा ठिकाणी थांबे राहणार आहेत. यात वर्धा जिल्ह्यातील दोन ठिकाणांचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यातील केवळ २३ एकर जमीन होणार अधिग्रहितनागपूर - मुंबई ही बुटेल ट्रेन समृद्धी महामार्गाच्या शेजारून धावणार असून, त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करतानाच अर्ध्याहून अधिक जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी २३ एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पनॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लि.च्यावतीने पूर्णत्वास येणारा हा प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने होणार आहे. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प राज्य व केंद्र शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर याचा राज्यातील तब्बल १३ जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प केंद्र सरकारकडून नियोजित असून, त्याबाबतची पर्यावरण व सामाजिक विचार-विनिमयाबाबतची सभा सोमवार, २२ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. या सभेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती शासनाला पाठवली जाणार आहे.- मनोजकुमार खैरनार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वर्धा.

२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार बुलेट ट्रेन

नागपूर ते मुंबईपर्यंतचा बुलेट ट्रेनचा एकूण मार्ग ७५३ किलोमीटरचा राहणार आहे. या रेल्वे मार्गावर ३५० किलोमीटर प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन धावेल, अशा गुणवत्तेचा हा रेल्वे रुळ राहणार आहे. इतकेच नव्हे तर ही बुलेट ट्रेन २५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे