शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

वर्धेतून धावणार नागपूर-मुंबई ‘बुलेट ट्रेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाकडून नागपूर - मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प नियोजित आहे. त्यासाठी जीपीएस टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. ही बुलेट ट्रेन वर्धा जिल्ह्यातून धावणार असून, सोमवार, २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहात याविषयी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीसाठी सेलडोह, खडकी, धोंडगाव, आमगाव, केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मेघे), मोहनपूर, कान्हापूर, गोंदापूर, सूरगाव, वानोडा, केळी या गावांमधील सरपंचांना पर्यावरण तसेच सामाजिक विचार याविषयी आपले म्हणणे मांडता येणार आहे. जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाला पाठवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बारा ठिकाणी राहणार थांबे२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या नागपूर - मुंबई या बुलेट ट्रेनचे तब्बल बारा ठिकाणी थांबे राहणार आहेत. यात वर्धा जिल्ह्यातील दोन ठिकाणांचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यातील केवळ २३ एकर जमीन होणार अधिग्रहितनागपूर - मुंबई ही बुटेल ट्रेन समृद्धी महामार्गाच्या शेजारून धावणार असून, त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करतानाच अर्ध्याहून अधिक जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी २३ एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पनॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लि.च्यावतीने पूर्णत्वास येणारा हा प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने होणार आहे. इतकेच नव्हे तर हा प्रकल्प राज्य व केंद्र शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर याचा राज्यातील तब्बल १३ जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प केंद्र सरकारकडून नियोजित असून, त्याबाबतची पर्यावरण व सामाजिक विचार-विनिमयाबाबतची सभा सोमवार, २२ नोव्हेंबरला आयोजित केली आहे. या सभेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती शासनाला पाठवली जाणार आहे.- मनोजकुमार खैरनार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वर्धा.

२५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार बुलेट ट्रेन

नागपूर ते मुंबईपर्यंतचा बुलेट ट्रेनचा एकूण मार्ग ७५३ किलोमीटरचा राहणार आहे. या रेल्वे मार्गावर ३५० किलोमीटर प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन धावेल, अशा गुणवत्तेचा हा रेल्वे रुळ राहणार आहे. इतकेच नव्हे तर ही बुलेट ट्रेन २५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे