शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

भोसलेकालीन वैभवप्राप्त नाचणगाव उपेक्षितच

By admin | Updated: January 12, 2015 22:57 IST

राज्य शासनाने १३८ ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे; पण यात नाचणगावचा समावेश करण्यात आलेला नाही़ यामुळे विकासाच्या प्रतीक्षेत असलेले

पुलगाव : राज्य शासनाने १३८ ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे; पण यात नाचणगावचा समावेश करण्यात आलेला नाही़ यामुळे विकासाच्या प्रतीक्षेत असलेले भोसलेकालीन वैभवाची साक्ष देणारे नाचणगाव अद्यापही उपेक्षितच राहिले आहे़ या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़ राजकीयदृष्ट्या संवेदनशील, जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत, विस्तीर्ण क्षेत्र, राष्ट्रीय महामार्गावर वसलेले सुमारे २५ हजार लोकसंख्येचे नाचणगाव शासनाच्या वक्रदृष्टीमुळे आजपर्यंत उपेक्षित आहे़ विकासाचे स्वप्न उराशी बाळगून असलेले ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पालिकेत होणार म्हणून प्रतीक्षेत आहे़ राज्य शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये राज्यातील १३८ गावांतील ग्रामपंचायत नगर परिषदमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. यात जिल्ह्यातील आष्टी, कारंजा, सेलू व समुद्रपूर या गावांचा समावेश करण्यात आला; पण १७ सदस्यीय ग्रामपंचायत, शहरी लोकसंख्येची बरोबरी करणारे, जवळपास ७० ते ८० ले-आऊट असलेले नाचणगाव कित्येक वर्षांपासून उपेक्षितच राहिले आहे.गावात येण्यासाठी गल्ली-बोळातून खाचा-खळग्यांनी व्यापलेला मुख्य रस्ता, विद्युत उपकेंद्राचा अभाव, गुंजखेडा पाणी पुरवठा केंद्रातून होणारा पाणी पुरवठा आदी समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जाव लागत आहे़ विकासात्मक बाबीसाठी स्वतंत्र विकास निधी नाही, लोकप्रतिनिधी वा जि.प. कडून मिळणाऱ्या निधीतूनच काय तो ग्रामविकास होतो़ यामुळे गावात अनेक समस्या निर्माण होतात.आर्थिक कोंडीमुळे गावात आवश्यक सार्वजनिक शौचालय बांधता येत नाही. विकासात्मक स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या ग्रामस्थांच्या मागणीला बगल देत राज्य शासनाने १३८ गावांच्या यादीतून नाचणगाव बाद केले. भोसलेकालीन वैभवाची साक्ष देणारी वर्धा जिल्ह्यात सर्वात मोठी नाचणगाव ग्रा़पं़ उपेक्षितच राहणार काय, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतात़(तालुका प्रतिनिधी)