शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रहस्यमयरीत्या मुलगी बेपत्ता

By admin | Updated: November 9, 2016 00:52 IST

सोयाबीन कापणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात गेलेल्या कुटुंबातील कोकीळा नामक मुलगी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रहस्यमयरित्या बेपत्ता झाली.

पालकांत घबराट : शोधूनही मिळाली नसल्याने रेल्वे पोलिसांत केली तक्रारवर्धा : सोयाबीन कापणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात गेलेल्या कुटुंबातील कोकीळा नामक मुलगी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीय चांगलेच धास्तावले आहेत. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न मिळाल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार केली. सदर मुलीचे अपहरण तर झाले नसावे वा काही अनुचित प्रकार तर घडला नाही ना, अशी शंका या प्रकारातून व्यक्त केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव येथील बाळकृष्ण उर्फ बाळू सहारे हे कुटुंबीय गावातील काही लोकांसह सोयाबीन कापणीसाठी चांदुर रेल्वे जि. अमरावती येथील गोवर्धन कळमकर यांच्या शेतात दिवाळीपूर्वी गेले होते. काम आटोपल्यानंतर ते सोमवारी चांदुर रेल्वे येथून विदर्भ एक्सप्रेसने वर्धा येथे आले. वर्धा रेल्वे स्थानकावरून बल्लारशाह येथे जाण्याकरिता रेल्वेगाडी नसल्याने ते सेवाग्राम रेल्वे स्थानकावर गेले. बाळकृष्ण यांची पत्नी व सोबत असलेले सहकारी तिकीट काढण्याकरिता गेले. दरम्यान, त्यांची मुलगी कोकीळा ही काही कामासाठी थोडी दूर गेली आणि परत आली नाही. बराच वेळ ती परतली नसल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला; पण ती आढळून आली नाही. या प्रकारामुळे सहारे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत बाळकृष्ण यांनी सेवाग्राम रेल्वे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून नोंद घेण्यात आली आहे. यामुळे या मुलीचे अपहरण तर करण्यात आले नाही ना, किंवा तिच्यासोबत काही अनुचित प्रकार तर घडला नसावा ना, अशी शंका त्यांच्याकडून उपस्थित केली जात आहे. रेल्वे पोलिसांनी मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चारही दिशांना जाण्याकरिता रेल्वेची सुविधा असलेल्या या रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेमुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)