शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रहस्यमयरीत्या मुलगी बेपत्ता

By admin | Updated: November 9, 2016 00:52 IST

सोयाबीन कापणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात गेलेल्या कुटुंबातील कोकीळा नामक मुलगी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रहस्यमयरित्या बेपत्ता झाली.

पालकांत घबराट : शोधूनही मिळाली नसल्याने रेल्वे पोलिसांत केली तक्रारवर्धा : सोयाबीन कापणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात गेलेल्या कुटुंबातील कोकीळा नामक मुलगी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीय चांगलेच धास्तावले आहेत. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न मिळाल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार केली. सदर मुलीचे अपहरण तर झाले नसावे वा काही अनुचित प्रकार तर घडला नाही ना, अशी शंका या प्रकारातून व्यक्त केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव येथील बाळकृष्ण उर्फ बाळू सहारे हे कुटुंबीय गावातील काही लोकांसह सोयाबीन कापणीसाठी चांदुर रेल्वे जि. अमरावती येथील गोवर्धन कळमकर यांच्या शेतात दिवाळीपूर्वी गेले होते. काम आटोपल्यानंतर ते सोमवारी चांदुर रेल्वे येथून विदर्भ एक्सप्रेसने वर्धा येथे आले. वर्धा रेल्वे स्थानकावरून बल्लारशाह येथे जाण्याकरिता रेल्वेगाडी नसल्याने ते सेवाग्राम रेल्वे स्थानकावर गेले. बाळकृष्ण यांची पत्नी व सोबत असलेले सहकारी तिकीट काढण्याकरिता गेले. दरम्यान, त्यांची मुलगी कोकीळा ही काही कामासाठी थोडी दूर गेली आणि परत आली नाही. बराच वेळ ती परतली नसल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला; पण ती आढळून आली नाही. या प्रकारामुळे सहारे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत बाळकृष्ण यांनी सेवाग्राम रेल्वे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून नोंद घेण्यात आली आहे. यामुळे या मुलीचे अपहरण तर करण्यात आले नाही ना, किंवा तिच्यासोबत काही अनुचित प्रकार तर घडला नसावा ना, अशी शंका त्यांच्याकडून उपस्थित केली जात आहे. रेल्वे पोलिसांनी मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चारही दिशांना जाण्याकरिता रेल्वेची सुविधा असलेल्या या रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेमुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)