शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागण्यांकरिता लढणे हे माझे कर्तव्य

By admin | Updated: February 15, 2016 02:19 IST

शिक्षकांच्या मागण्या मान्य करून घेणे, ही माझी बांधिलकी आहे. त्यासाठी आपण पूर्ण ताकदीसह लढा देत आहे.

नागो गाणार : शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने शिक्षक मेळावा व तक्रार निवारण सभावर्धा : शिक्षकांच्या मागण्या मान्य करून घेणे, ही माझी बांधिलकी आहे. त्यासाठी आपण पूर्ण ताकदीसह लढा देत आहे. शिक्षकांच्या मागण्यांकरिता लढणे हे माझे कर्तव्यच आहे, असे मत शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले. शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने शिक्षक मेळावा व तक्रार निवारण सभा धुनिवाले मठ येथे घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते आ.डॉ. पंकज भोयर, जि.प. सदस्य मनोज चांदुरकर, विनोद पांढरे, पूजा चौधरी, बाबाराव देशमुख, नरेंद्र थुटे, सुभाष गोतमारे, मनोहर वाके, रमेश टपाले, बळीराम चव्हाण, अजय भोयर, अनिल टोपले आदी उपस्थित होते. आ. गाणार सारख्या व्यक्तीची शिक्षण क्षेत्राला नितांत गरज आहे. आपण त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहू, असे मत खा. तडस यांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सहकार्य करेल, असे मत आ.डॉ. भोयर यांनी व्यक्त केले. राज्यात मराठी शाळा टिकविणे शासनाची जबाबदारी आहे. मराठी शाळाबाबत शासनाने व्यवहाराची भाषा करणे योग्य नाही, असे मत तक्रार निवारण समितीचे कार्यवाह अजय भोयर यांनी व्यक्त केले.यावेळी माधूरी काळे, डॉ. रवींद्र घुगे, नीता मडावी, सुनील चिडाम, राजेंद्र चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्रात शिक्षकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष रमेश टपाले यांनी तर अहवाल वाचन भोयर यांनी केले. संचालन दत्ता भांगे यांनी केले तर आभार अनिल टोपले व पुंडलिक नागतोडे यांनी मानले. कार्यक्रमाला राजेंद्र तिरभाने, विनय बुरघाटे, राजू कारवटकर, विजय देशमुख, प्रकाश गांडोळे, देविदास गावंडे, सुनील गायकवाड, देविदास इंगोले, मदन बजाज, पुंडलिक नाकतोडे, रवींद्र जाने आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)शिक्षकांच्या समस्या केंद्रात मांडणार; खासदारांची ग्वाहीशिक्षक मेळावा व तक्रार निवारण सभेमध्ये जिल्ह्यातील शिक्षकांनी त्यांना येत असलेल्या विविध समस्यांचा पाढाच उपस्थित मान्यवरांसमोर वाचला. या समस्या सोडविण्याची मागणीही शिक्षकांकडून करण्यात आली. शिवाय शासनाकडून येत असलेल्या विविध अडचणी सोडविण्याकरिता जिल्ह्याचे खासदार व वर्धा विभागाच्या आमदारांनी पाऊल उचलण्याची मागणीही शिक्षकांकडून करण्यात आली. यावेळी खा. तडस यांनी शिक्षकांच्या समस्या केंद्रात मांडण्याचे आश्वासन दिले. मराठी शाळांच्या बचावाकरिता शिक्षकांनी एकत्र येऊन कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. केवळ शासनाकडे बोट दाखवून चालणार नाही तर याकरिता प्रत्येक शिक्षकाने कार्य करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मेळाव्यात व्यक्त केले.