शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पालिकेचा ‘एम-मित्र’ अडगळीत

By admin | Updated: May 10, 2015 01:35 IST

शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास गती मिळावी व काही आवश्यक सूचना देण्याकरिता ...

रूपेश खैरी वर्धाशहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास गती मिळावी व काही आवश्यक सूचना देण्याकरिता सहज सुलभ सोय म्हणून वर्धा नगर परिषदेने ‘एम-मित्र’ ही सुविधा सुरू केली होती. अशी सुविधा देणारी वर्धा पालिका राज्यातील पहिली ठरली होती. सुविधा सुरू होवून वर्षाचा कालावधी लोटत नाही तोच ती अडगळीत पडली आहे. यामुळे नागरिकांकरिता उपयोगी असलेली ही सुविधा कुचकामी ठरत आहे. वर्धा नगर परिषदेत सत्तांतरण झाल्यानंतर भाजपाला अध्यक्षपद मिळाले होते. त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून पदभार सांळणाऱ्या अतुल तराळे यांच्या पुढाकाराने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. तिचे लोकर्पण करण्याकरिता पालिकेच्यावतीने जंगी कार्यक्रम घेतला होता. ही सुविधा सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. यातून त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. ही सुविधा सुरू करण्याकरिता पालिकेला दीड लाख रुपयांचा खर्च आला होता. एवढा खर्च करून सुरू केलेली ही अद्ययावत पद्धती पालिकेतील राजकरणामुळे निरुपयोगी ठरत आहे. राज्यभरात इ गव्हरनेस सुरू असताना वर्धा पालिकेच्यावतीने त्यापुढे पाऊल टाकत ही सुविधा सुरू केली. ‘एम मित्र’ या प्रक्रियेत तयार करण्यात आलेले अ‍ॅप्स वर्धेत अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकांनी तयार केलेले आहे. हे अ‍ॅप्स समस्येची माहिती घेण्याकरिता लाभदायक ठरणारे असे असताना पालिकेच्यावतीने ते केवळ राजकीय द्वेषापोटी अडगळीत टाकल्याची माहिती आहे. पालिकेत सध्या सत्तेत असलेल्यांना या प्रणालीचे महत्त्वच कळले नसल्याची चर्चा येथील काही कर्मचारी व पदाधिकारी दबक्या स्वरुपात करीत आहेत.