शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

पालिका प्रशासनाला ठरावाचा विसर

By admin | Updated: April 5, 2015 02:02 IST

हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

वर्धा : हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. २००१ मध्ये स्थानिक प्रशासनाने श्रद्धानंद प्राथमिक शाळेजवळ काही गाळे बांधून देण्याचा ठराव घेतला होता; पण अद्यापही याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही़ यामुळे पालिका प्रशासनाला या ठरावाचा विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़हिंगणघाट शहरात १९९८ मध्ये पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती़ त्यावेळी अतिक्रमणात ज्यांची दुकाने गेली, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीच्यावतीने ८ आॅगस्ट २००१ रोजी सभा घेऊन एक ठराव पारित करण्यात आला होता़ या ठरावानुसार श्रद्धानंद प्राथमिक शाळेच्या पुर्वेकडील भागात २० दुकाने बांधून देण्याचे सर्वानुमते मंजूर करण्यात आले होते़ या परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे ही या सभेत मंजूर करण्यात आले होते़ त्यानुसार २७ सप्टेंबर २००१ रोजी काही व्यावसायिकांनी दुकानांसाठी काही पैसेही पालिकेकडे जमा केले होते़ शिवाय आवश्यक ती संपूर्ण कारवाईही पूर्ण करण्यात आली होती़ आज या ठरावाला सुमारे १४ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ अद्यापही २००१ च्या ठरावावर कारवाई करण्यात आलेली नाही़ श्रद्धानंद शाळेजवळ गाळे बांधण्याच्या कामलाही सुरूवात झाली नाही. या प्रकारामुळे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम तर पालिका प्रशासन करीत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ १९९८ मध्ये काढलेल्या अतिक्रमणातील विस्थापितांचे पुनर्वसन अद्याप केले नाही़ आता पुन्हा तीच कारवाई झाल्याने बेरोजगारांचे काय, हा प्रश्नच आहे़ यामुळे या कामाला त्वरित सुरूवात करावी व २० गाळे बांधून द्यावे, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह एसडीओ, तहसीलदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे़(शहर प्रतिनिधी)