शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पालिका प्रशासनाला ठरावाचा विसर

By admin | Updated: April 5, 2015 02:02 IST

हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

वर्धा : हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. २००१ मध्ये स्थानिक प्रशासनाने श्रद्धानंद प्राथमिक शाळेजवळ काही गाळे बांधून देण्याचा ठराव घेतला होता; पण अद्यापही याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही़ यामुळे पालिका प्रशासनाला या ठरावाचा विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़हिंगणघाट शहरात १९९८ मध्ये पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती़ त्यावेळी अतिक्रमणात ज्यांची दुकाने गेली, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीच्यावतीने ८ आॅगस्ट २००१ रोजी सभा घेऊन एक ठराव पारित करण्यात आला होता़ या ठरावानुसार श्रद्धानंद प्राथमिक शाळेच्या पुर्वेकडील भागात २० दुकाने बांधून देण्याचे सर्वानुमते मंजूर करण्यात आले होते़ या परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे ही या सभेत मंजूर करण्यात आले होते़ त्यानुसार २७ सप्टेंबर २००१ रोजी काही व्यावसायिकांनी दुकानांसाठी काही पैसेही पालिकेकडे जमा केले होते़ शिवाय आवश्यक ती संपूर्ण कारवाईही पूर्ण करण्यात आली होती़ आज या ठरावाला सुमारे १४ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ अद्यापही २००१ च्या ठरावावर कारवाई करण्यात आलेली नाही़ श्रद्धानंद शाळेजवळ गाळे बांधण्याच्या कामलाही सुरूवात झाली नाही. या प्रकारामुळे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम तर पालिका प्रशासन करीत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ १९९८ मध्ये काढलेल्या अतिक्रमणातील विस्थापितांचे पुनर्वसन अद्याप केले नाही़ आता पुन्हा तीच कारवाई झाल्याने बेरोजगारांचे काय, हा प्रश्नच आहे़ यामुळे या कामाला त्वरित सुरूवात करावी व २० गाळे बांधून द्यावे, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह एसडीओ, तहसीलदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे़(शहर प्रतिनिधी)