शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पालिका प्रशासनाला ठरावाचा विसर

By admin | Updated: April 5, 2015 02:02 IST

हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

वर्धा : हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. २००१ मध्ये स्थानिक प्रशासनाने श्रद्धानंद प्राथमिक शाळेजवळ काही गाळे बांधून देण्याचा ठराव घेतला होता; पण अद्यापही याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही़ यामुळे पालिका प्रशासनाला या ठरावाचा विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़हिंगणघाट शहरात १९९८ मध्ये पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती़ त्यावेळी अतिक्रमणात ज्यांची दुकाने गेली, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीच्यावतीने ८ आॅगस्ट २००१ रोजी सभा घेऊन एक ठराव पारित करण्यात आला होता़ या ठरावानुसार श्रद्धानंद प्राथमिक शाळेच्या पुर्वेकडील भागात २० दुकाने बांधून देण्याचे सर्वानुमते मंजूर करण्यात आले होते़ या परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे ही या सभेत मंजूर करण्यात आले होते़ त्यानुसार २७ सप्टेंबर २००१ रोजी काही व्यावसायिकांनी दुकानांसाठी काही पैसेही पालिकेकडे जमा केले होते़ शिवाय आवश्यक ती संपूर्ण कारवाईही पूर्ण करण्यात आली होती़ आज या ठरावाला सुमारे १४ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ अद्यापही २००१ च्या ठरावावर कारवाई करण्यात आलेली नाही़ श्रद्धानंद शाळेजवळ गाळे बांधण्याच्या कामलाही सुरूवात झाली नाही. या प्रकारामुळे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम तर पालिका प्रशासन करीत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ १९९८ मध्ये काढलेल्या अतिक्रमणातील विस्थापितांचे पुनर्वसन अद्याप केले नाही़ आता पुन्हा तीच कारवाई झाल्याने बेरोजगारांचे काय, हा प्रश्नच आहे़ यामुळे या कामाला त्वरित सुरूवात करावी व २० गाळे बांधून द्यावे, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह एसडीओ, तहसीलदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे़(शहर प्रतिनिधी)