शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

पालिका प्रशासनाला ठरावाचा विसर

By admin | Updated: April 5, 2015 02:02 IST

हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

वर्धा : हिंगणघाट शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. २००१ मध्ये स्थानिक प्रशासनाने श्रद्धानंद प्राथमिक शाळेजवळ काही गाळे बांधून देण्याचा ठराव घेतला होता; पण अद्यापही याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही़ यामुळे पालिका प्रशासनाला या ठरावाचा विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़हिंगणघाट शहरात १९९८ मध्ये पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती़ त्यावेळी अतिक्रमणात ज्यांची दुकाने गेली, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीच्यावतीने ८ आॅगस्ट २००१ रोजी सभा घेऊन एक ठराव पारित करण्यात आला होता़ या ठरावानुसार श्रद्धानंद प्राथमिक शाळेच्या पुर्वेकडील भागात २० दुकाने बांधून देण्याचे सर्वानुमते मंजूर करण्यात आले होते़ या परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे ही या सभेत मंजूर करण्यात आले होते़ त्यानुसार २७ सप्टेंबर २००१ रोजी काही व्यावसायिकांनी दुकानांसाठी काही पैसेही पालिकेकडे जमा केले होते़ शिवाय आवश्यक ती संपूर्ण कारवाईही पूर्ण करण्यात आली होती़ आज या ठरावाला सुमारे १४ वर्षांचा कालावधी लोटला आहे़ अद्यापही २००१ च्या ठरावावर कारवाई करण्यात आलेली नाही़ श्रद्धानंद शाळेजवळ गाळे बांधण्याच्या कामलाही सुरूवात झाली नाही. या प्रकारामुळे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम तर पालिका प्रशासन करीत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ १९९८ मध्ये काढलेल्या अतिक्रमणातील विस्थापितांचे पुनर्वसन अद्याप केले नाही़ आता पुन्हा तीच कारवाई झाल्याने बेरोजगारांचे काय, हा प्रश्नच आहे़ यामुळे या कामाला त्वरित सुरूवात करावी व २० गाळे बांधून द्यावे, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह एसडीओ, तहसीलदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे़(शहर प्रतिनिधी)