शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

२७२ एकरांवर तुतीची लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:58 IST

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी रेशीम शेती ही महत्त्वाची ठरणारी आहे, असे कृषितज्ज्ञ सांगतात. दिवसेंदिवस रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. यंदा जिल्ह्यात २७२ एकर शेतजमिनीवर तुतीची लागवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरेशीम शेतीत वर्धा तालुका अव्वल तर सेलू द्वितीय स्थानी

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी रेशीम शेती ही महत्त्वाची ठरणारी आहे, असे कृषितज्ज्ञ सांगतात. दिवसेंदिवस रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. यंदा जिल्ह्यात २७२ एकर शेतजमिनीवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेती करण्यात जिल्ह्यात वर्धा तालुका अव्वल असून सेलू तालुका द्वितीय स्थानी असल्याचे सांगण्यात आले.वर्धा जिल्ह्यात एकूण ४७८ रेशीम कोश प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ३५३ उद्योग हे स्वत: शेतकरीच चालवितात. ३५३ शेतकऱ्यांकडून केल्या जात असलेल्या रेशीम शेतीमुळे सुमारे २ हजार ९० गरजूंना रोजगार मिळत आहे. पारंपरिक शेती ही न परवडणारी असल्याचे लक्षात आल्यावर सदर कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनात रेशीम शेतीकडे वळल्याचे सांगण्यात येते.रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना शासन मनरेगाअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान देते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड होऊन शेतकरी सक्षम व्हावा, यासाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांनीही रेशीम शेती करावी, यासाठी संबंधित विभागाच्यावतीने प्रभावी जनजागृतीही केली जात आहे.१०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्यरेशीम शेती करू इच्छिणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याला मनरेगाअंतर्गत एकरी २ लाख ९२ हजार ६२५ रुपयांचे अर्थसहाय्य १०० टक्के अनुदानावर दिले जाते. इतकेच नव्हे, तर एससी, एसटी व एनटी तसेच महिला कुटुंब प्रमुख प्रवर्गातील शेतकऱ्याला जमिनीची मर्यादेची अट वगळता एकरी तितकेच अर्थसहाय्य केले जाते. शेतकऱ्याने तीन वर्षांपर्यंत तुतीची जोपासना करीत भरघोस उत्पन्न घ्यावे, हा शासकीय अनुदान देण्यामागील मुख्य उद्देश आहे.उद्योगावर उपराजधानीत होते शिक्कामोर्तबरेशीम कोश प्रक्रिया उद्योग उभारणी संदर्भातील प्रस्ताव वर्धेत जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयात स्वीकारले जात असले तरी प्राप्त आवेदन मंजुरीसाठी नागपूर येथील कार्यालयात पाठविले जातात. तेथेच त्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब होते. यंदा प्राप्त झालेला एक प्रस्ताव उपराजधानीतील कार्यालयात पाठविण्यात आला होता. तर मागीलवर्षी एकही प्रस्ताव पाठविण्यात आला नव्हता.रेशीम धागा तयार करण्याचा उद्योग नाचणगावातजिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने रेशीम शेतीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी १५ ते २९ डिसेंबर हा कालावधी जनजागृती पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. या कालावधीत शेतकऱ्याना रेशीम शेतीचे फायदे पटवून देण्यात येतात. असे असले तरी थेट रेशीम धागा तयार करण्याचा एकमेव उद्योग देवळी तालुक्यातील नाचणगाव येथे असल्याचे सांगण्यात आले.गुणवंत कुचेवार यांचा प्रस्ताव फेटाळलायंदाच्या वर्षी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाला गुणवंत कुचेवार नामक तरुणाचा रेशीम कोश प्रक्रिया उद्योगासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाला होता. तो कार्यालयाने नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला. परंतु, हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात एकूण ४७८ रेशीम कोश प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ३५३ उद्योग हे स्वत: शेतकरीच चालवितात. यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत २७२ एकरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत १०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य केले जाते. मागील वर्षी रेशीम कोश प्रक्रिया उद्योगासंदर्भात एकही प्रस्ताव प्राप्त झाला नव्हता. यंदा कुचेवार यांचा प्रस्ताव आला होता. तो नामंजूर झाला आहे.- प्यारेसिंग पाडवी,रेशीम विकास अधिकारी, वर्धा.