शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

२७२ एकरांवर तुतीची लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:58 IST

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी रेशीम शेती ही महत्त्वाची ठरणारी आहे, असे कृषितज्ज्ञ सांगतात. दिवसेंदिवस रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. यंदा जिल्ह्यात २७२ एकर शेतजमिनीवर तुतीची लागवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरेशीम शेतीत वर्धा तालुका अव्वल तर सेलू द्वितीय स्थानी

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी रेशीम शेती ही महत्त्वाची ठरणारी आहे, असे कृषितज्ज्ञ सांगतात. दिवसेंदिवस रेशीम शेतीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कलही वाढत आहे. यंदा जिल्ह्यात २७२ एकर शेतजमिनीवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेती करण्यात जिल्ह्यात वर्धा तालुका अव्वल असून सेलू तालुका द्वितीय स्थानी असल्याचे सांगण्यात आले.वर्धा जिल्ह्यात एकूण ४७८ रेशीम कोश प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ३५३ उद्योग हे स्वत: शेतकरीच चालवितात. ३५३ शेतकऱ्यांकडून केल्या जात असलेल्या रेशीम शेतीमुळे सुमारे २ हजार ९० गरजूंना रोजगार मिळत आहे. पारंपरिक शेती ही न परवडणारी असल्याचे लक्षात आल्यावर सदर कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनात रेशीम शेतीकडे वळल्याचे सांगण्यात येते.रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना शासन मनरेगाअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान देते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड होऊन शेतकरी सक्षम व्हावा, यासाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांनीही रेशीम शेती करावी, यासाठी संबंधित विभागाच्यावतीने प्रभावी जनजागृतीही केली जात आहे.१०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्यरेशीम शेती करू इच्छिणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याला मनरेगाअंतर्गत एकरी २ लाख ९२ हजार ६२५ रुपयांचे अर्थसहाय्य १०० टक्के अनुदानावर दिले जाते. इतकेच नव्हे, तर एससी, एसटी व एनटी तसेच महिला कुटुंब प्रमुख प्रवर्गातील शेतकऱ्याला जमिनीची मर्यादेची अट वगळता एकरी तितकेच अर्थसहाय्य केले जाते. शेतकऱ्याने तीन वर्षांपर्यंत तुतीची जोपासना करीत भरघोस उत्पन्न घ्यावे, हा शासकीय अनुदान देण्यामागील मुख्य उद्देश आहे.उद्योगावर उपराजधानीत होते शिक्कामोर्तबरेशीम कोश प्रक्रिया उद्योग उभारणी संदर्भातील प्रस्ताव वर्धेत जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयात स्वीकारले जात असले तरी प्राप्त आवेदन मंजुरीसाठी नागपूर येथील कार्यालयात पाठविले जातात. तेथेच त्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब होते. यंदा प्राप्त झालेला एक प्रस्ताव उपराजधानीतील कार्यालयात पाठविण्यात आला होता. तर मागीलवर्षी एकही प्रस्ताव पाठविण्यात आला नव्हता.रेशीम धागा तयार करण्याचा उद्योग नाचणगावातजिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने रेशीम शेतीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी १५ ते २९ डिसेंबर हा कालावधी जनजागृती पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. या कालावधीत शेतकऱ्याना रेशीम शेतीचे फायदे पटवून देण्यात येतात. असे असले तरी थेट रेशीम धागा तयार करण्याचा एकमेव उद्योग देवळी तालुक्यातील नाचणगाव येथे असल्याचे सांगण्यात आले.गुणवंत कुचेवार यांचा प्रस्ताव फेटाळलायंदाच्या वर्षी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाला गुणवंत कुचेवार नामक तरुणाचा रेशीम कोश प्रक्रिया उद्योगासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाला होता. तो कार्यालयाने नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला. परंतु, हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात एकूण ४७८ रेशीम कोश प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ३५३ उद्योग हे स्वत: शेतकरीच चालवितात. यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत २७२ एकरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत १०० टक्के अनुदानावर अर्थसहाय्य केले जाते. मागील वर्षी रेशीम कोश प्रक्रिया उद्योगासंदर्भात एकही प्रस्ताव प्राप्त झाला नव्हता. यंदा कुचेवार यांचा प्रस्ताव आला होता. तो नामंजूर झाला आहे.- प्यारेसिंग पाडवी,रेशीम विकास अधिकारी, वर्धा.