शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

महावितरणकडे अडीच हजार मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:16 IST

ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे.

ठळक मुद्देग्राहकांना फटका : डिमांड भरले; पण प्रतीक्षा कायमच

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाºयांना विचारले असता सारेच आलबेल असल्याचा दिखावा करीत आहे. परंतु, खºया अर्थाने ग्राहकांना मीटरअभावी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.राज्यभरात मागील काही महिन्यापासून केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन विद्युत जोडण्या देण्यात आल्या. तसेच जुनी इलेक्ट्रो-मेकॅनीकल मिटर व नादुरुस्त मिटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली; पण या मोहिमेंदरम्यान मिटरच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात महावितरण मागे पडले. परिणामी विद्युत जोडण्यांबाबत ग्राहकांकडून डिमांड भरल्यानंतरही मिटर उपलब्ध होऊ शकले नाही. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट विभागात जवळपास घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक उपयोगातील जवळपास २ हजार ५४७ मिटरची प्रतीक्षा कायम आहे. त्यापैकी तब्बल २ हजार १४० घरांमध्ये मिटर अभावी विद्युत पुरवठा पोहचू शकला नाही. नागरिकांना वेळेवर मिटर उपलब्ध न झाल्याने महावितरणच्याच कर्मचाºयांकडून ग्राहकांना चोरटा रस्ता दाखविला जात आहे. परिणामी ग्राहक पोलवरुन विद्युत चोरीचा पर्याय निवडत आहे. असाच प्रकार नुकताच घडलेल्या शहरातील एका घटनेवरुन चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे महावितरणच्या नियोजनशुन्यतेमुळे ग्राहकांवर विद्युत चोरीची वेळ आल्याची ओरड होत आहे.२ हजार ७३८ कृषीपंपाना मिळाले नाही मीटरशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून मागील त्याला कृषीपंपासाठी विद्युत जोडणी देण्याची घोषणा शासनाने केली. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ विद्यूत जोडणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही महावितरणला करण्यात आल्या होत्या; पण अधिकाऱ्यांनी फारसे कानावर घेतले नसल्याने हल्ली जिल्ह्यात २ हजार ७३८ शेतकºयांच्या कृषीपंपाना मिटरमुळे विद्युत मिळू शकली नाही. यामध्ये आर्वी विभागातील आर्वी, आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा व पुलगांव उपविभागत ७७६ मिटर पेंडींग आहे. हिंगणघाट विभागाच्या हिंगणघाट व समुदपूर उपविभागात १ हजार १७१ तर वर्धा विभागातील देवळी,सेलू व वर्धा उपविभागात ७०१ शेतकºयांना विद्युत मिटरची प्रतीक्षा आहे.आता मिटर उपलब्ध झाले आहे. जेथे कमतरता असेल त्यांनी मागणी केल्यानंतर मिटर उपलब्ध होईल. मिटर वापराबाबती प्रक्रियापूर्ण केल्याशिवाय मिटर वापरता येत नाही. त्यामुळे थोडा विलंब झाला आहे, हा काही फारसा मोठा विषय नाही.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा.