शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

महावितरणकडे अडीच हजार मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:16 IST

ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे.

ठळक मुद्देग्राहकांना फटका : डिमांड भरले; पण प्रतीक्षा कायमच

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाºयांना विचारले असता सारेच आलबेल असल्याचा दिखावा करीत आहे. परंतु, खºया अर्थाने ग्राहकांना मीटरअभावी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.राज्यभरात मागील काही महिन्यापासून केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन विद्युत जोडण्या देण्यात आल्या. तसेच जुनी इलेक्ट्रो-मेकॅनीकल मिटर व नादुरुस्त मिटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली; पण या मोहिमेंदरम्यान मिटरच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात महावितरण मागे पडले. परिणामी विद्युत जोडण्यांबाबत ग्राहकांकडून डिमांड भरल्यानंतरही मिटर उपलब्ध होऊ शकले नाही. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट विभागात जवळपास घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक उपयोगातील जवळपास २ हजार ५४७ मिटरची प्रतीक्षा कायम आहे. त्यापैकी तब्बल २ हजार १४० घरांमध्ये मिटर अभावी विद्युत पुरवठा पोहचू शकला नाही. नागरिकांना वेळेवर मिटर उपलब्ध न झाल्याने महावितरणच्याच कर्मचाºयांकडून ग्राहकांना चोरटा रस्ता दाखविला जात आहे. परिणामी ग्राहक पोलवरुन विद्युत चोरीचा पर्याय निवडत आहे. असाच प्रकार नुकताच घडलेल्या शहरातील एका घटनेवरुन चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे महावितरणच्या नियोजनशुन्यतेमुळे ग्राहकांवर विद्युत चोरीची वेळ आल्याची ओरड होत आहे.२ हजार ७३८ कृषीपंपाना मिळाले नाही मीटरशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून मागील त्याला कृषीपंपासाठी विद्युत जोडणी देण्याची घोषणा शासनाने केली. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ विद्यूत जोडणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही महावितरणला करण्यात आल्या होत्या; पण अधिकाऱ्यांनी फारसे कानावर घेतले नसल्याने हल्ली जिल्ह्यात २ हजार ७३८ शेतकºयांच्या कृषीपंपाना मिटरमुळे विद्युत मिळू शकली नाही. यामध्ये आर्वी विभागातील आर्वी, आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा व पुलगांव उपविभागत ७७६ मिटर पेंडींग आहे. हिंगणघाट विभागाच्या हिंगणघाट व समुदपूर उपविभागात १ हजार १७१ तर वर्धा विभागातील देवळी,सेलू व वर्धा उपविभागात ७०१ शेतकºयांना विद्युत मिटरची प्रतीक्षा आहे.आता मिटर उपलब्ध झाले आहे. जेथे कमतरता असेल त्यांनी मागणी केल्यानंतर मिटर उपलब्ध होईल. मिटर वापराबाबती प्रक्रियापूर्ण केल्याशिवाय मिटर वापरता येत नाही. त्यामुळे थोडा विलंब झाला आहे, हा काही फारसा मोठा विषय नाही.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा.