शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडे अडीच हजार मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:16 IST

ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे.

ठळक मुद्देग्राहकांना फटका : डिमांड भरले; पण प्रतीक्षा कायमच

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्राहकाच्या हिताच्या बाता करणाऱ्या महावितरणकडे मागील दीड ते दोन महिन्यांपासून विद्यूत मीटरचा तुटवडा जाणवत असल्याने ग्राहकांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. ग्राहकांनी डिमांड भरल्यानंतरही मीटर मिळत नसल्याने महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आल्याची ओरड ग्राहक करीत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाºयांना विचारले असता सारेच आलबेल असल्याचा दिखावा करीत आहे. परंतु, खºया अर्थाने ग्राहकांना मीटरअभावी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.राज्यभरात मागील काही महिन्यापासून केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन विद्युत जोडण्या देण्यात आल्या. तसेच जुनी इलेक्ट्रो-मेकॅनीकल मिटर व नादुरुस्त मिटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली; पण या मोहिमेंदरम्यान मिटरच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात महावितरण मागे पडले. परिणामी विद्युत जोडण्यांबाबत ग्राहकांकडून डिमांड भरल्यानंतरही मिटर उपलब्ध होऊ शकले नाही. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट विभागात जवळपास घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक उपयोगातील जवळपास २ हजार ५४७ मिटरची प्रतीक्षा कायम आहे. त्यापैकी तब्बल २ हजार १४० घरांमध्ये मिटर अभावी विद्युत पुरवठा पोहचू शकला नाही. नागरिकांना वेळेवर मिटर उपलब्ध न झाल्याने महावितरणच्याच कर्मचाºयांकडून ग्राहकांना चोरटा रस्ता दाखविला जात आहे. परिणामी ग्राहक पोलवरुन विद्युत चोरीचा पर्याय निवडत आहे. असाच प्रकार नुकताच घडलेल्या शहरातील एका घटनेवरुन चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे महावितरणच्या नियोजनशुन्यतेमुळे ग्राहकांवर विद्युत चोरीची वेळ आल्याची ओरड होत आहे.२ हजार ७३८ कृषीपंपाना मिळाले नाही मीटरशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून मागील त्याला कृषीपंपासाठी विद्युत जोडणी देण्याची घोषणा शासनाने केली. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ विद्यूत जोडणी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही महावितरणला करण्यात आल्या होत्या; पण अधिकाऱ्यांनी फारसे कानावर घेतले नसल्याने हल्ली जिल्ह्यात २ हजार ७३८ शेतकºयांच्या कृषीपंपाना मिटरमुळे विद्युत मिळू शकली नाही. यामध्ये आर्वी विभागातील आर्वी, आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा व पुलगांव उपविभागत ७७६ मिटर पेंडींग आहे. हिंगणघाट विभागाच्या हिंगणघाट व समुदपूर उपविभागात १ हजार १७१ तर वर्धा विभागातील देवळी,सेलू व वर्धा उपविभागात ७०१ शेतकºयांना विद्युत मिटरची प्रतीक्षा आहे.आता मिटर उपलब्ध झाले आहे. जेथे कमतरता असेल त्यांनी मागणी केल्यानंतर मिटर उपलब्ध होईल. मिटर वापराबाबती प्रक्रियापूर्ण केल्याशिवाय मिटर वापरता येत नाही. त्यामुळे थोडा विलंब झाला आहे, हा काही फारसा मोठा विषय नाही.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा.