शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांचा शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:32 IST

केंद्र सरकार २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ज्या सूचना सुचविल्या आहेत, त्यातील एकही सूचना व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

ठळक मुद्देतिगावात कार्यक्रम : पंतप्रधानाच्या सूचनेनंतर क्षेत्रात परिषदांचे आयोजन

आॅनलाईन लोकमतवर्धा : केंद्र सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ज्या सूचना सुचविल्या आहेत, त्यातील एकही सूचना व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनांना केेंद्रस्थानी ठेऊन तिगाव येथे शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खा. तडस यांनी शेतकऱ्यांची संवाद साधला.आपल्या भागातील शेतकऱ्यांकडून काही सूचना असेल तर त्या स्वीकारून त्या सूचना पोहचविण्याचे कार्य करावे अश्या सूचना सर्व खासदारांना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने तिगाव येथे शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर यांच्या सहकार्याने शेतकरी सवांद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, माजी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जयंत येरावार, जयंत कावळे, सुनील गफाट, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती, गजानन कार्लेकर, जि.प. सदस्य पंकज सायंकार, विमल वर्भे यांची उपस्थिती होती.खा. रामदास तडस म्हणाले की, महाराष्ट्राच्या नैसर्गिक, भौगोलिक स्थानामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य शेती, मधमाशी पालन तसेच पशुपालन क्षेत्रात जोडधंदे करणे शक्य आहे. त्याचबरोबर बागायती शेती, फळझाडांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. कृषी आणि पशुपालन हे दोन्ही व्यवसाय परस्परांवर आधारित असून परस्परांच्या सोबतीनेच ते विकसीत होतात. छत्तीसगड सारख्या राज्यातील शेतकऱ्यांनी असे प्रयोग केले आहेत. त्यांचा आदर्श ठेवल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. खाजगी क्षेत्र व अन्य भागधारकांमध्ये सहकार्य वाढविण्यासह नवे दृष्टिकोण स्वीकारल्यास २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय साध्य करता येईल, असे सांगितले.शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, विद्युत जोडणी, पांदण रस्ते, शासकीय योजनेतून विहीर, कुकुट पालन, शेळी पालन, शेततळ यासाठी भरीव अनुदान सरकारने दिले पाहिजे. तसेच शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनीही गरजुंना विविध शासकीय योजनांचा लाभ झटपट मिळेल या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.केंद्र व राज्य सरकार शेतकरी हितार्थ विविध योजना राबवित असून त्याचा लाभ शेतकºयांनी घेतला पाहिजे. पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत प्रत्येक शेतामध्ये पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांनी केले.कार्यक्रमादरम्यान काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विविध समस्यांचा पाढाच वाचला. शिवाय या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी मागणी केली. सदर शेतकरी सवांद परिषद कार्यक्रमाचे संचालन मिलिंद भेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नंदकिशोर झोटिंग यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध शासकीय योजनांची माहितीही उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केलेकार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध शेतकरी हितार्थ योजनांची माहिती दिली. यावेळी काही शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या खासदारांसमक्ष मांडल्या. शिवाय सदर समस्या निकाली कशा निघेल यासाठी तातडीने प्रयत्न करावे, अशी मागणीही केली.