शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वर्धा नदीवरून पाणी घेण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:10 IST

वणी शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे यंदा पावसाभावी वाळवंट झाल्याने .....

ठळक मुद्देवणीत भीषण पाणी टंचाईचे सावट : नवरगाव धरण तळ गाठण्याच्या स्थितीत

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे यंदा पावसाभावी वाळवंट झाल्याने व निर्गुडा नदीच्या माध्यमातून वणी शहरापर्यंत पाणी पोहचविणारे नवरगाव धरण तळ गाठण्याच्या स्थितीत असल्याने वणी शहरावर भीषण पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.दरम्यान, या संकटावर मात करण्यासाठी वणी नगरपालिकास्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. वणी तालुक्यातील रांगणा गावाजवळून वाहणाºया वर्धा नदीच्या डोहातून वणी शहराची तहान भागविण्यासाठी पाणी घेतले जाणार आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून तसा ठरावही पालिकेने घेतला आहे. रांगणा ते वणीपर्यंत पाईप लाईन टाकण्यात येणार असून त्याचा खर्च आठ ते १२ कोटीपर्यंतच्या घरात आहे. हा निधी कोणत्या मार्गाने उपलब्ध करायचा, याचेही चिंतन पालिकास्तरावर सुरू आहे. यासोबतच वणी शहरासाठी स्वर्णजयंती योजनेअंतर्गत वर्धा नदीवर ८० कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना तयार करण्याच्याही हालचाली सुरू असून या कामासाठीची निविदा ‘अपलोड’ करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. यासाठी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ना.हंसराज अहीर हेदेखील प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या नवरगाव धरणात केवळ २८ टक्के जलसाठा असून तो अगदी काही महिने पुरेल ईतका आहे....तर उद्रेक होण्याची भीतीयंदा वणी उपविभागात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याने नदी, नाले, धरण कोरडे होण्याच्या स्थितीत आहेत. या पाणी टंचाईचा फटका वणी शहराला मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे. आजच उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईच्या काळात पालिकेच्या नगरसेवकांसह पदाधिकाºयांना नागरिकांच्या उदे्रकाला सामोरे जावे लागणार आहे.येत्या डिसेंबरपर्यंत वर्धा नदीत पाईपलाईन टाकून पाणी घेण्याचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता नवरगाव धरणातून पुन्हा दोन क्युबिक मीटर पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सोबतच शहरात नव्याने १३ ट्युबवेल तयार करण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.-तारेंद्र बोर्डेनगराध्यक्ष वणी.